शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

पतंग उडवताना या गाेष्टींची घ्या काळजी ; महावितरणाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 16:56 IST

पतंगाेत्सव साजरा करताना पतंग वीजयंत्रणांमध्ये अडकणार नाहीत याची काळजी घेण्याचे तसेच वीज वाहिन्यांमध्ये अडकेलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करुन नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

पुणे : मकर संक्रांत अवघ्या तीन दिवसांवर आली आहे. संक्रांतीच्या दिवशी पतंग उडविण्याची परंपरा आहे. पतंग उडविताना अनेकदा अपघात हाेतात. त्यामुळे पतंग उडविताना वीजवाहिन्या, रोहित्र, फीडर पिलर आणि वीजयंत्रणेपासून काळजी घेण्याचे आवाहन महावितरणाच्यावतीने करण्यात आले आहे. 

    मकर संक्रांतीनिमित्त नागरिक माेठ्याप्रमाणावर पतंग उडवत असतात. शहरात महावितरणच्या उच्च आणि लघुदाबाच्या वीज वाहिन्या, रोहित्र तसेच इतर वीजयंत्रणा अस्तित्वात आहेत. अनेकदा पतंग महावितरणाच्या वीज वाहिन्यांमध्ये अडकतात. त्या काढताना वीजेचा झटका बसण्याची शक्यता असते. तसेच राेहित्रकांमध्ये अडकणाऱ्या पतंग काढण्याचा प्रयत्न देखील लहान मुलांकडून हाेत असताे. त्यामुळे वीज वाहिण्या, राेहितके यांच्यापासून पतंग उडवताना खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणाकडून करण्यात आले आहे. पतंगाच्या मांज्यामुळे शाॅट सर्किट हाेऊन वीज प्रवाह खंडित हाेण्याची तसेच एखादा अपघात घडण्याची शक्यता असते. 

    त्यामुळे नागरिकांनी विशेषकरुन लहान मुलांनी गजबजीच्या ठिकाणाऐवजी माेकळ्या मैदानात पतंगाेत्सव साजरा करावा. तसेच पालकांनी लहान मुले पतंग उडवत असताना त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे. वीजयंत्रणेमध्ये अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करु नये असे आवाहन सुद्धा महावितरणकडून करण्यात आले आहे.     

टॅग्स :kiteपतंगmahavitaranमहावितरणAccidentअपघात