शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

आयटी कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम ; काही करून कपात करायची कंपन्याची खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2020 13:53 IST

कामावरून कमी करण्यासाठी शोधले जात आहेत विविध बहाणे 

ठळक मुद्देकंपन्यांनी कर्मचारी कपात करू नये असा केंद्र व राज्य सरकारचा कर्मचारी कपात करू नये आदेश कर्मचाऱ्यांनी दाद मागितल्यावर कामगार विभागाने बजावल्या अशा आयटी कंपन्यांना नोटीसा

शोधले जात आहेत विविध बहाणे पुणे : आयटी कंपन्यांमधून कर्मचारी कपातीची संख्या काही केल्या कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. आता कर्मचाऱ्यांना कामावरून करण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाकडून वेगवेगळे बहाणे शोधले जात आहेत. कर्मचाऱ्यांना बेंचवर बसवून, त्यानंतर दोन-तीन महिन्यांनी त्यांना थेट कामावरून कमी करण्याचे धोरण अवलंबण्यात येत आहे. त्यामुळे धास्तावलेल्या कर्मचाऱ्यांनी दाद मागितल्यावर कामगार विभागाने अशा आयटी कंपन्यांना नोटीसा बजावल्या आहेत. एकीकडे केंद्र व राज्य सरकारनेकर्मचारी कपात करू नये असे आदेश देऊन देखील काही आयटी कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना बेंचवर बसण्यास भाग पाडले जात आहे. यावर कामगार विभागाने पाठवलेल्या नोटिस मध्ये कोणत्याही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकू नका, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. कोरोनाचा दिवसेंदिवस वाढणारा कहर आणि लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकू नका, वेतन कपात करू नका, कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार द्या, असे निर्देश केंद्र आणि राज्य सरकारने सर्व खासगी आणि सार्वजनिक कंपन्यांना दिले आहेत. मात्र, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी, आयटीईएस, बीपीओ, केपीओ) काही कंपन्यांकडून या निदेर्शांना हरताळ फासला जात असून, कर्मचारी कपात, वेतन रोखून धरणे, सक्तीच्या रजेवर पाठविणे, अर्धे वेतन देणे, असे निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे आयटी कर्मचारी प्रचंड अडचणीत सापडले आहेत. या संदर्भात आयटी कर्मचारी संघटनांकडून तक्रारी आल्यानंतर पुणे जिल्हा कामगार उप आयुक्त कार्यालयाने संबंधित आयटी कंपन्यांना नोटीसा बजावल्या. त्यामुळे कामगारांना थेट कामावरून काढून न टाकता, त्यांना बेंचवर बसविण्याचा प्रकार आयटी कंपन्यांनी सुरू केला आहे. त्यामुळे धास्तावलेल्या आयटी कर्मचाऱ्यांनी ''नॅशनल इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉइज सिनेट'' या संघटनेमार्फत कामगार उप आयुक्त कार्यालयाकडे दाद मागितली आहे. 

........................

आतापर्यत 40 हजार कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या आयटी कंपन्यांनी बजावली नोटीस 

शहरात लहान मोठ्या अशा एकूण 200 हुन अधिक आयटी कंपनी असून एकट्या हिंजवडी आयटी पार्क मध्ये 80 आयटी कंपनी आहेत. राज्यातील आयटी कर्मचाऱ्यांची संख्या 32 लाख असून पुण्यात 12 लाख आयटी कर्मचारी काम करतात. लॉकडाऊन झाल्यानंतर आतापर्यत 40 हजार कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या आयटी कंपन्यांनी नोटीस बजावली असल्याची माहिती नॅशनल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉइजचे उपाध्यक्ष विवेक मेस्त्री यांनी दिली. 

 ..................................

एचआर किंवा व्यवस्थापनाकडून ब्लॅकलिस्ट करण्याची धमकी

एखाद्या कर्मचाऱ्याने या बेकायदा प्रक्रियेला विरोध केला, तर त्याला एचआर किंवा व्यवस्थापनाकडून ब्लॅकलिस्ट करण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे कर्मचारी कायम दहशतीच्या वातावरणात असतात. हेतुपूर्वक कर्मचाऱ्यांना बेंचवर बसविले जाते आणि दोन-तीन महिन्यांनंतर राजीनामा देण्यास भाग पाडले जाते, किंवा नवीन प्रोजेक्ट हाताळण्यास सक्षम नसल्याचे असल्याचे सांगून कर्मचाऱ्याला बेकायदेशीरपणे कामावरून काढून टाकले जाते. -हरप्रीत सलुजा, सरचिटणीस, नॅशनल इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉइज सिनेट

...........

टॅग्स :PuneपुणेITमाहिती तंत्रज्ञानEmployeeकर्मचारीcorona virusकोरोना वायरस बातम्याCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकार