शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

पुण्यात स्वाइन फ्लूू, डेंग्यूने घेतलेत आतापर्यंत शेकडो बळी; टीबीमुळे सर्वाधिक मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 11:59 IST

सांसर्गिक आजार टाळण्यासाठी खबरदारी हाच सर्वोत्तम उपाय

ठळक मुद्देअचानक उद्भवलेल्या या आजारामुळे यंत्रणांची चांगलीच धावपळ ; नागरिकांमध्ये भीतीची लाट

लक्ष्मण मोरे - पुणे : कोरोना विषाणूच्या दहशतीखाली संपूर्ण जग आलेले आहे. या विषाणूचा धसका यंत्रणांसह सर्वसामान्यांनी घेतला आहे. या आजाराची लागण झाल्यानंतर होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अगदी अल्प असल्याचा दावा केला जात आहे. हा सांसर्गिक आजार असल्याने पुण्यात काळजी घेतली जात आहे. परंतु, यापूर्वी आलेल्या स्वाइन फ्लू या एकट्या आजाराने गेल्या दहा वर्षांत ७६८ बळी घेतले आहेत. तर डेंग्यूने आतापर्यंत ४४ आणि क्षयरोगाने (टीबी) २ हजार ७८० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सांसर्गिक आजारांच्या पार्श्वभूमीवर महापालिका, जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य यंत्रणा वर्षभर काम करीत असतात. शासनाने क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू केलेला आहे. स्वाइन फ्लूची साथ ज्या वेळी आली त्या वेळी प्रशासन या आपत्तीला तोंड देण्याच्या तयारीत नव्हते. अचानक उद्भवलेल्या या आजारामुळे यंत्रणांची चांगलीच धावपळ उडाली होती. नागरिकांमध्ये भीतीची लाट पसरली होती. त्याचा परिणाम बाजारासह शाळा, महाविद्यालयांवरही झाला होता. पुण्यातील गणेशोत्सवावरही सलग दोन-तीन वर्षे या साथीचे सावट होते. या आजारांच्या तुलनेत कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. अद्याप तरी पुण्यासह महाराष्ट्रात कोरोनामुळे रुग्ण दगावल्याची घटना घडलेली नाही. रुग्णांची संख्याही तुलनेने कमी आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या बहुतांश लोकांच्या वैद्यकीय तपासणीचे अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत. जिल्हा प्रशासन, पालिका यांच्याकडून नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले जात आहे. स्वाइन फ्लूूच्या साथीचा ज्या वेळी फैलाव झाला त्या वेळी प्रशासन या आजारापासून अगदीच अनभिज्ञ होते. परंतु, कोरोनाच्याबाबतीत प्रशासनाने पूर्वतयारी केलेली होती. पालिकेने डॉ. नायडू रुग्णालयात महिनाभर आधीच कक्ष तयार केला होता. कोरोनाबाबतची चीनसह जगभरातील अद्ययावत माहिती सातत्याने घेतली जात होती. त्यादृष्टीने आरोग्य विभाग सतर्क होता. त्यामुळे या वेळी स्वाइन फ्लूूच्या वेळी जशी झाली तशी धावपळ आणि गडबड झाली नाही. ............अनेक वर्षांपासून डेंग्यूला आटोक्यात आणण्याकरिता प्रशासन प्रयत्न करीत आहे. वेळोवेळी फवारणी, तपासणी, जनजागृती यावर काम केले जाते. तरीदेखील गेल्या नऊ वर्षांत ४४ बळी डेंग्यूने घेतले आहेत. यासोबतच चिकुन गुनियासारखा आजारही अनेकांना झाला. या आजारामुळे जीवितहानी झाली नसली तरी आयुष्यभराचे दुखणे अनेकांच्या मागे लागले.  

आजारामधून बरे झालेल्या अनेकांचे सांधे अजूनही दुखतात. विशेषत: थंडीमध्ये त्यांना अधिक त्रास होतो. केंद्र-राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्था क्षयरोग नियंत्रणात ठेवण्याकरिता प्रयत्न करतात. उपचारांपासून जनजागृतीपर्यंत अनेक गोष्टी केल्या जातात. या आजारामुळे शहरात वर्षाला सरासरी १२५ रुग्ण दगावत असल्याची आकडेवारी आहे. .............पुणे शहरात आजारांमध्ये झालेले मृत्यूआजार                                        एकूण मृत्यूस्वाइन फ्लूू (२००९ ते २०१९)                ७६८डेंग्यू (२०१० ते २०१९)                          ४४क्षयरोग (२००५ ते २०१८)                     २,७८०

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यSwine Flueस्वाईन फ्लूdengueडेंग्यूcorona virusकोरोनाDeathमृत्यू