शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

डुग्गु सुखरूप घरी; मात्र पोलिसांना त्याचा शोध का लागला नाही? सुटकेनंतरचे अनेक प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 15:11 IST

अपहरणकर्त्यानेच पुनावळे येथील एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी त्याला सोडल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत

पुणे : बाणेर परिसरातून चार वर्षांच्या मुलाची आठ दिवसांनंतर आज सुटका झाली. अपहरणकर्त्यानेच पुनावळे येथील एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी त्याला सोडून दिले. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. इतक्या जवळ असूनही पोलिसांनाअपहरणकर्त्यांचा शोध कसा लागला नाही, अपहरणकर्त्यांनी इतके दिवस मुलाला कसे ठेवले, त्यानंतर अचानक कसे सोडून दिले, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. केवळ १० किलोमीटरच्या परिसरात मुलगा असतानाही पोलिसांना त्याचा शोध लागू शकला नाही.

बाणेर येथील बालेवाडी पोलीस ठाण्याच्या जवळून ११ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास या मुलाचे अपहरण झाले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. चतुश्रुंगी पोलीस, गुन्हे शाखेची विविध पथके यांनी संपूर्ण परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज गोळा केले. त्या परिसराबरोबर तेथून जेथे जेथे रस्ते जातात, त्या सर्व परिसरातील सीसीटीव्ही, तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील फुटेज तपासण्यात आले. अगदी प्रत्येक इंच न् इंच तपासला. अपहरणकर्त्यांविषयीच्या सर्व शक्यता तपासून पाहिल्या जात होत्या. परंतु, अपहरणकर्त्यांविषयी काहीही माहिती मिळाली नाही.

अपहरणकर्त्यांनी अपहरण का केले? 

शेवटी अपहरणकर्त्यांनीच त्याची स्वत: हून सुटका केली. आजवरच्या अपहरणाच्या घटनांमध्ये खंडणीसाठी अपहरण केले जाते. मात्र, या प्रकरणात खंडणी मागितली गेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळेच एकूण सर्व प्रकरणातील गूढ वाढले आहे. जर खंडणी मागितली गेली नाही तर अपहरणकर्त्यांनी अपहरण का केले, नेमके अपहरणकर्ते किती आहेत, प्रथमदर्शनी स्वर्णवला पळवून घेऊन जाणाऱ्या एकाचेच सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे त्याचे अन्य साथीदार आहेत का?

चार वर्षांचा मुलगा इतके दिवस त्यांच्याबरोबर कसा राहिला?

सुटका झाल्यानंतर स्वर्णवकडे पाहिले असता तो व्यवस्थित दिसून येत आहे. त्याअर्थी या चार वर्षाच्या मुलाचा अपहरणकर्त्यांनी व्यवस्थित सांभाळ केलेला दिसून येत आहे. त्याला खाणे-पिणे व्यवस्थित दिलेले दिसून येत होते. त्यामुळेही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. स्वर्णव हा अपहरणकर्त्याला ओळखत होता का? चार वर्षांचा मुलगा इतके दिवस त्यांच्याबरोबर कसा राहिला?

 अजूनही अपहरणकर्त्यांपर्यंत पोहचण्यात पोलीस अयशस्वी 

पुणे पोलिसांनी यापूर्वी अशाच लहान मुलांच्या अपहरणाच्या घटनेत मुलाची सुटका करण्यात अल्पावधीत यश मिळविले होते. त्याचबरोबर अपहरणकर्ते जेरबंद झाले होते. मात्र, त्या प्रकरणात अजूनही अपहरणकर्त्यांपर्यंत पोहचण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसKidnappingअपहरणMONEYपैसाBalewadiबालेवाडी