शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'आप' चा आता ‘स्वराज्य संवाद’; महाराष्ट्रात पक्षाचे ५ लाख सदस्य करण्याचा संकल्प

By राजू इनामदार | Updated: June 14, 2023 16:07 IST

राज्यातील शिंदे फडणवीस सरकार सर्वेक्षणातील आकडेवारीबद्दल कितीही सांगत असले तरी त्यात तथ्य नाही, 'आप' ची टीका

पुणे: दिल्ली, पंजाब नंतर आम आदमी पार्टीने (आप) महाराष्ट्राकडे नजर वळवली आहे. पंढरपूर ते रायगड अशा ८०० किलोमीटरच्या स्वराज्य यात्रेनंतर आप आता महाराष्ट्रात ‘स्वराज्य संवाद’  सुरू करत आहे. यात राज्यात पक्षाचे ५ लाख सदस्य करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत, पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी ही माहिती दिली. आम आदमी पार्टीला आता राष्ट्रीय राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, विशेषत: ग्रामीण भागात ग्रामपंचायत, तालुका पंचायतीत आप ने खाते उघडले आहे. आता मोठी राजकीय महत्वाकांक्षा बाळगत पक्षाने महाराष्ट्रात संघटना बांधणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंढरपूर ते रायगड अशी स्वराज्य यात्रा काढण्यात आली असे किर्दत यांनी सांगितले. या यात्रेला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेत आता स्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

या यात्रेत थेट मतदारांबरोबर संवाद करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागातही पक्ष कोपला सभा घेईल. त्यामध्ये नागरिकांना पक्षाची दिल्ली, पंजाब मधील कामगिरी सांगितली जाईल. दिल्ली महापालिका तसेच दिल्ली राज्यात सर्वसामान्य जनतेसाठी राबवलेल्या विविध योजना, त्यांना मिळालेला प्रतिसाद, लाभार्थी नागरिकांची मते याची माहीती नागरिकांना दिली जाणार आहे. गुजरात महापालिकेत भाजपच्या लाटेतही आप चे २३ नगरसेवक निवडून आणणारे पक्षाचे राज्याचे प्रभारी गोपाळ इटालिया या स्वराज्य यात्रेचे महाराष्ट्रातील मार्गदर्शक असतील असे किर्दत म्हणाले.

राज्यातील शिंदे फडणवीस सरकार सर्वेक्षणातील आकडेवारीबद्दल कितीही सांगत असले तरी त्यात तथ्य नाही. त्यांनीच पैसे देऊन नियुक्त केलेली संस्था त्यांनाा हवे तसे सर्वेक्षण करणार, हवा तसा निष्कर्ष काढणार हे राज्यातील जनतेला समजणार नाही असे त्यांना वाटते, आप ला या सरकारबद्दल तीव्र नाराजी दिसून आली आहे. त्यामुळेच पक्षाने राज्यातील संघटन वाढण्याचा निर्णय घेतला. ही मोहिम त्याचाच एक भाग असल्याचे किर्दत यांनी सांगितले. कुंभार तसेच अजित फाटके पाटील, एकनाथ ढोले शहर संघटक, धनंजय बनकर प्रवक्ते, अमित म्हसे यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेAam Admi partyआम आदमी पार्टीPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपा