शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

'आप' चा आता ‘स्वराज्य संवाद’; महाराष्ट्रात पक्षाचे ५ लाख सदस्य करण्याचा संकल्प

By राजू इनामदार | Updated: June 14, 2023 16:07 IST

राज्यातील शिंदे फडणवीस सरकार सर्वेक्षणातील आकडेवारीबद्दल कितीही सांगत असले तरी त्यात तथ्य नाही, 'आप' ची टीका

पुणे: दिल्ली, पंजाब नंतर आम आदमी पार्टीने (आप) महाराष्ट्राकडे नजर वळवली आहे. पंढरपूर ते रायगड अशा ८०० किलोमीटरच्या स्वराज्य यात्रेनंतर आप आता महाराष्ट्रात ‘स्वराज्य संवाद’  सुरू करत आहे. यात राज्यात पक्षाचे ५ लाख सदस्य करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत, पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी ही माहिती दिली. आम आदमी पार्टीला आता राष्ट्रीय राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, विशेषत: ग्रामीण भागात ग्रामपंचायत, तालुका पंचायतीत आप ने खाते उघडले आहे. आता मोठी राजकीय महत्वाकांक्षा बाळगत पक्षाने महाराष्ट्रात संघटना बांधणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंढरपूर ते रायगड अशी स्वराज्य यात्रा काढण्यात आली असे किर्दत यांनी सांगितले. या यात्रेला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेत आता स्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

या यात्रेत थेट मतदारांबरोबर संवाद करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागातही पक्ष कोपला सभा घेईल. त्यामध्ये नागरिकांना पक्षाची दिल्ली, पंजाब मधील कामगिरी सांगितली जाईल. दिल्ली महापालिका तसेच दिल्ली राज्यात सर्वसामान्य जनतेसाठी राबवलेल्या विविध योजना, त्यांना मिळालेला प्रतिसाद, लाभार्थी नागरिकांची मते याची माहीती नागरिकांना दिली जाणार आहे. गुजरात महापालिकेत भाजपच्या लाटेतही आप चे २३ नगरसेवक निवडून आणणारे पक्षाचे राज्याचे प्रभारी गोपाळ इटालिया या स्वराज्य यात्रेचे महाराष्ट्रातील मार्गदर्शक असतील असे किर्दत म्हणाले.

राज्यातील शिंदे फडणवीस सरकार सर्वेक्षणातील आकडेवारीबद्दल कितीही सांगत असले तरी त्यात तथ्य नाही. त्यांनीच पैसे देऊन नियुक्त केलेली संस्था त्यांनाा हवे तसे सर्वेक्षण करणार, हवा तसा निष्कर्ष काढणार हे राज्यातील जनतेला समजणार नाही असे त्यांना वाटते, आप ला या सरकारबद्दल तीव्र नाराजी दिसून आली आहे. त्यामुळेच पक्षाने राज्यातील संघटन वाढण्याचा निर्णय घेतला. ही मोहिम त्याचाच एक भाग असल्याचे किर्दत यांनी सांगितले. कुंभार तसेच अजित फाटके पाटील, एकनाथ ढोले शहर संघटक, धनंजय बनकर प्रवक्ते, अमित म्हसे यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेAam Admi partyआम आदमी पार्टीPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपा