शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

श्वानदंश जीवघेणा; दीड वर्षात १९ जणांचा झाला मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 05:08 IST

शहरात श्वानदंशाच्याच नव्हे, तर रेबिजची लागण होण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. श्वानदंश पुणेकरांना मृत्यूच्या दाढेत ढकलत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दीड वर्षात १९ जणांना रेबिजमुळे प्राण गमवावे लागले असून, तीन व्यक्ती मृत्यूशी झुंज देत आहेत.

- विशाल शिर्केपुणे : शहरात श्वानदंशाच्याच नव्हे, तर रेबिजची लागण होण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. श्वानदंश पुणेकरांना मृत्यूच्या दाढेत ढकलत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दीड वर्षात १९ जणांना रेबिजमुळे प्राण गमवावे लागले असून, तीन व्यक्ती मृत्यूशी झुंज देत आहेत.श्वानदंशाच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शहरात जानेवारी ते जुलै दरम्यान ५ हजार ५८४ नागरिकांना श्वानदंश झाल्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागात करण्यात आली आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक १ हजार २४४ श्वानदंशाच्या घटना घडल्या. त्यानंतर उपचारात झालेल्या विलंबामुळे तब्बल १० जणांना रेबिजची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यातील ७ जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण मृत्यूशी झुंज देत आहेत. मार्च, एप्रिल महिन्यात प्रत्येकी १ आणि जूनमध्ये २ आणि जुलैमध्ये तीन जणांचा रेबिजने मृत्यू झाला आहे.शहरात २०१७ मध्येदेखील अशीच स्थिती होती. त्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत तब्बल ९ हजार ३८७ जणांनाश्वानदंश झाला होता. आॅक्टोबर २०१७ मध्ये सर्वाधिक ११४५जणांना श्वानदंश झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे झाली होती. त्यातील १२ जणांना पुढे रेबिजची लागण झाल्याने आपले प्राण गमवावे लागले.सर्वाधिक ४ मृत्यूची मे २०१७मध्ये नोंद झाली होती. जानेवारी आणि नोव्हेंबरमध्ये प्रत्येकी दोन, जून,आॅगस्ट महिन्यात प्रत्येकी १ मृत्यूझाला होता. श्वानदंशानंतर उपचार घेण्यात केलेल्या दुर्लक्षामुळे रेबिज लागण होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून नोंदविण्यात आले आहे.दुर्लक्ष नको : कुत्र्यांचे लसीकरण झाले असल्यासही धोका श्वानदंशाबाबत माहिती देताना जनरल पॅ्रक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण दरक म्हणाले की, श्वानदंश झाल्यानंतर, त्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करू नये.जखम झाल्यानंतर, ती धारेच्या पाण्यात साबणाने स्वच्छ करावी. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने चार लशींचा डोस घ्यावा. हा डोस संपूर्ण घेतलाच पाहिजे; अन्यथा रेबिजचा धोका कायम राहतो.भटक्या आणि पाळीव श्वानाच्या चाव्यामुळे देखील रेबिजचा धोका असतो. पाळीव श्वानाला लसीकरण केले असले, तरी देखील धोक्याची तीव्रता कायम असते.- महापालिकेच्या वतीने सन २००७ मध्ये शहरातील भटक्या कुत्र्यांची गणना करण्यात आली. त्या वेळी संपूर्ण पुणे शहरामध्ये ४० हजार भटकी कुत्री असल्याचे स्पष्ट झाले होते. आता ही संख्या तब्बल २ लाखांच्या घरात गेली असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.- शहराचा वाढता विस्तार, रस्त्यावर टाकला जाणारा कचरा, या भटक्या कुत्र्यांवर प्रेम करून, त्यांना खाऊ घालणारे नागरिक यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने नियमित पणे या कुत्र्यांची नसबंदी करण्यात येते. सध्या दररोज सरासरी ७० कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात येते.श्वानदंशानंतर जखम २० मिनिटे नळाच्या पाण्याखाली धरून साबणाने धुतली पाहिजे. त्यानंतर तत्काळ आपल्या फॅमिली डॉक्टर अथवा सरकारी दवाखान्यातून उपचार घेतले पाहिजे. श्वान, मांजर, डुक्कर अशा प्राण्यांच्या चाव्यामुळे अथवा नखाने ओरबडल्याने झालेल्या जखमेमुळेदेखील रेबिज होऊ शकतो. जखम कोणत्या भागात झाली यावरून लशीचा प्रकार ठरतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने पूर्ण उपचार घेतले पाहिजेत. श्वानदंशाचे प्रमाण कमी करण्यासाठी महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर आळा घातला पाहिजे.- प्रवीण दरक,अध्यक्ष, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन

टॅग्स :Puneपुणेdogकुत्रा