शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

श्वानदंश जीवघेणा; दीड वर्षात १९ जणांचा झाला मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 05:08 IST

शहरात श्वानदंशाच्याच नव्हे, तर रेबिजची लागण होण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. श्वानदंश पुणेकरांना मृत्यूच्या दाढेत ढकलत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दीड वर्षात १९ जणांना रेबिजमुळे प्राण गमवावे लागले असून, तीन व्यक्ती मृत्यूशी झुंज देत आहेत.

- विशाल शिर्केपुणे : शहरात श्वानदंशाच्याच नव्हे, तर रेबिजची लागण होण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. श्वानदंश पुणेकरांना मृत्यूच्या दाढेत ढकलत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दीड वर्षात १९ जणांना रेबिजमुळे प्राण गमवावे लागले असून, तीन व्यक्ती मृत्यूशी झुंज देत आहेत.श्वानदंशाच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शहरात जानेवारी ते जुलै दरम्यान ५ हजार ५८४ नागरिकांना श्वानदंश झाल्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागात करण्यात आली आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक १ हजार २४४ श्वानदंशाच्या घटना घडल्या. त्यानंतर उपचारात झालेल्या विलंबामुळे तब्बल १० जणांना रेबिजची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यातील ७ जणांचा मृत्यू झाला असून, तीन जण मृत्यूशी झुंज देत आहेत. मार्च, एप्रिल महिन्यात प्रत्येकी १ आणि जूनमध्ये २ आणि जुलैमध्ये तीन जणांचा रेबिजने मृत्यू झाला आहे.शहरात २०१७ मध्येदेखील अशीच स्थिती होती. त्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत तब्बल ९ हजार ३८७ जणांनाश्वानदंश झाला होता. आॅक्टोबर २०१७ मध्ये सर्वाधिक ११४५जणांना श्वानदंश झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे झाली होती. त्यातील १२ जणांना पुढे रेबिजची लागण झाल्याने आपले प्राण गमवावे लागले.सर्वाधिक ४ मृत्यूची मे २०१७मध्ये नोंद झाली होती. जानेवारी आणि नोव्हेंबरमध्ये प्रत्येकी दोन, जून,आॅगस्ट महिन्यात प्रत्येकी १ मृत्यूझाला होता. श्वानदंशानंतर उपचार घेण्यात केलेल्या दुर्लक्षामुळे रेबिज लागण होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून नोंदविण्यात आले आहे.दुर्लक्ष नको : कुत्र्यांचे लसीकरण झाले असल्यासही धोका श्वानदंशाबाबत माहिती देताना जनरल पॅ्रक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण दरक म्हणाले की, श्वानदंश झाल्यानंतर, त्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करू नये.जखम झाल्यानंतर, ती धारेच्या पाण्यात साबणाने स्वच्छ करावी. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने चार लशींचा डोस घ्यावा. हा डोस संपूर्ण घेतलाच पाहिजे; अन्यथा रेबिजचा धोका कायम राहतो.भटक्या आणि पाळीव श्वानाच्या चाव्यामुळे देखील रेबिजचा धोका असतो. पाळीव श्वानाला लसीकरण केले असले, तरी देखील धोक्याची तीव्रता कायम असते.- महापालिकेच्या वतीने सन २००७ मध्ये शहरातील भटक्या कुत्र्यांची गणना करण्यात आली. त्या वेळी संपूर्ण पुणे शहरामध्ये ४० हजार भटकी कुत्री असल्याचे स्पष्ट झाले होते. आता ही संख्या तब्बल २ लाखांच्या घरात गेली असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.- शहराचा वाढता विस्तार, रस्त्यावर टाकला जाणारा कचरा, या भटक्या कुत्र्यांवर प्रेम करून, त्यांना खाऊ घालणारे नागरिक यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने नियमित पणे या कुत्र्यांची नसबंदी करण्यात येते. सध्या दररोज सरासरी ७० कुत्र्यांची नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात येते.श्वानदंशानंतर जखम २० मिनिटे नळाच्या पाण्याखाली धरून साबणाने धुतली पाहिजे. त्यानंतर तत्काळ आपल्या फॅमिली डॉक्टर अथवा सरकारी दवाखान्यातून उपचार घेतले पाहिजे. श्वान, मांजर, डुक्कर अशा प्राण्यांच्या चाव्यामुळे अथवा नखाने ओरबडल्याने झालेल्या जखमेमुळेदेखील रेबिज होऊ शकतो. जखम कोणत्या भागात झाली यावरून लशीचा प्रकार ठरतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने पूर्ण उपचार घेतले पाहिजेत. श्वानदंशाचे प्रमाण कमी करण्यासाठी महानगरपालिकेने भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर आळा घातला पाहिजे.- प्रवीण दरक,अध्यक्ष, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन

टॅग्स :Puneपुणेdogकुत्रा