शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

"कोल्हापूर उत्तरचा विजय जनतेचा कौल नाही..." 'मविआ'च्या विजयावर राजू शेट्टींची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 13:53 IST

कोल्हापूर उत्तर विधानसभा निकालावर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया...

पुणे :कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज होता. यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार काँग्रेसच्या जयश्री जाधव आणि भाजपचे सत्यजीत कदम यांच्यात लढत झाली. सध्याचे निकालाचे कल पाहिले तर ही निवडणूक जवळपास महाविकास आघाडीने जिंकली आहे. यावर बोलताना स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी म्हणाले, हा विजय जनतेचा कौल वगैरे काही नाही. आमची या निवडणूकीत भूमिकाच नव्हती. पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना शेट्टी यांनी कोल्हापुरच्या निवडणुकीवर प्रश्न विचारल्यावर प्रतिक्रिया दिली.

पुढे बोलताना शेट्टी म्हणाले, सध्या राज्यात भोंग्यावरून राजकारण सुरू आहे. दुसरीकडे वीज, शेती' विद्यार्थी बेरोजगारी, इंधन दरवाढ याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या राज्यात पातळीहीन राजकारण सुरू आहे. महागाईमुळे सामान्य लोक त्रस्त आहेत. नागरिकांच्या हिताच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करत राजकारण सुरू आहे. शेती मालाला भाव नाही, योग्य नियोजन नाही, डाळी, तेल प्रचंड महागले आहे त्यात भोंगे कसले वाजवता असा प्रश्नही शेट्टी यांनी विचारला आहे.

"राज्य सरकारचा 'या' कारणामुळे पाठिंबा काढला"-

स्वाभिमानी पक्षाने काही दिवसांपूर्वी राज्य सरकारचा पाठिंबा काढल्याचे जाहीर केले होते. याचे कारण सांगताना शेट्टी म्हणाले, 'दोन टप्प्यात एफआरपी हा राज्य सरकारचा निर्णय चुकीचा आहे त्यामुळे स्वाभिमानीने पाठिंबा काढला.' 

पोटापाण्याचा धंदा म्हणून मी राजकारण करत नाही. आतापर्यंत बराच अनुभव घेतलाय. आता राज्यात शेतकऱ्यांचा दबावगट तयार करणार आहोत. आम्ही तयार केलेले आमदार आम्हाला सोडतात तर सोडू द्या, अशा गद्दारांना बरोबर ठेवून कधीच काम करणार नाही, असंही शेट्टी म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेkolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी