शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

"कोल्हापूर उत्तरचा विजय जनतेचा कौल नाही..." 'मविआ'च्या विजयावर राजू शेट्टींची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 13:53 IST

कोल्हापूर उत्तर विधानसभा निकालावर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया...

पुणे :कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज होता. यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार काँग्रेसच्या जयश्री जाधव आणि भाजपचे सत्यजीत कदम यांच्यात लढत झाली. सध्याचे निकालाचे कल पाहिले तर ही निवडणूक जवळपास महाविकास आघाडीने जिंकली आहे. यावर बोलताना स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी म्हणाले, हा विजय जनतेचा कौल वगैरे काही नाही. आमची या निवडणूकीत भूमिकाच नव्हती. पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना शेट्टी यांनी कोल्हापुरच्या निवडणुकीवर प्रश्न विचारल्यावर प्रतिक्रिया दिली.

पुढे बोलताना शेट्टी म्हणाले, सध्या राज्यात भोंग्यावरून राजकारण सुरू आहे. दुसरीकडे वीज, शेती' विद्यार्थी बेरोजगारी, इंधन दरवाढ याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या राज्यात पातळीहीन राजकारण सुरू आहे. महागाईमुळे सामान्य लोक त्रस्त आहेत. नागरिकांच्या हिताच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करत राजकारण सुरू आहे. शेती मालाला भाव नाही, योग्य नियोजन नाही, डाळी, तेल प्रचंड महागले आहे त्यात भोंगे कसले वाजवता असा प्रश्नही शेट्टी यांनी विचारला आहे.

"राज्य सरकारचा 'या' कारणामुळे पाठिंबा काढला"-

स्वाभिमानी पक्षाने काही दिवसांपूर्वी राज्य सरकारचा पाठिंबा काढल्याचे जाहीर केले होते. याचे कारण सांगताना शेट्टी म्हणाले, 'दोन टप्प्यात एफआरपी हा राज्य सरकारचा निर्णय चुकीचा आहे त्यामुळे स्वाभिमानीने पाठिंबा काढला.' 

पोटापाण्याचा धंदा म्हणून मी राजकारण करत नाही. आतापर्यंत बराच अनुभव घेतलाय. आता राज्यात शेतकऱ्यांचा दबावगट तयार करणार आहोत. आम्ही तयार केलेले आमदार आम्हाला सोडतात तर सोडू द्या, अशा गद्दारांना बरोबर ठेवून कधीच काम करणार नाही, असंही शेट्टी म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेkolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी