शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

"कोल्हापूर उत्तरचा विजय जनतेचा कौल नाही..." 'मविआ'च्या विजयावर राजू शेट्टींची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 13:53 IST

कोल्हापूर उत्तर विधानसभा निकालावर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया...

पुणे :कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज होता. यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार काँग्रेसच्या जयश्री जाधव आणि भाजपचे सत्यजीत कदम यांच्यात लढत झाली. सध्याचे निकालाचे कल पाहिले तर ही निवडणूक जवळपास महाविकास आघाडीने जिंकली आहे. यावर बोलताना स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी म्हणाले, हा विजय जनतेचा कौल वगैरे काही नाही. आमची या निवडणूकीत भूमिकाच नव्हती. पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना शेट्टी यांनी कोल्हापुरच्या निवडणुकीवर प्रश्न विचारल्यावर प्रतिक्रिया दिली.

पुढे बोलताना शेट्टी म्हणाले, सध्या राज्यात भोंग्यावरून राजकारण सुरू आहे. दुसरीकडे वीज, शेती' विद्यार्थी बेरोजगारी, इंधन दरवाढ याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सध्या राज्यात पातळीहीन राजकारण सुरू आहे. महागाईमुळे सामान्य लोक त्रस्त आहेत. नागरिकांच्या हिताच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करत राजकारण सुरू आहे. शेती मालाला भाव नाही, योग्य नियोजन नाही, डाळी, तेल प्रचंड महागले आहे त्यात भोंगे कसले वाजवता असा प्रश्नही शेट्टी यांनी विचारला आहे.

"राज्य सरकारचा 'या' कारणामुळे पाठिंबा काढला"-

स्वाभिमानी पक्षाने काही दिवसांपूर्वी राज्य सरकारचा पाठिंबा काढल्याचे जाहीर केले होते. याचे कारण सांगताना शेट्टी म्हणाले, 'दोन टप्प्यात एफआरपी हा राज्य सरकारचा निर्णय चुकीचा आहे त्यामुळे स्वाभिमानीने पाठिंबा काढला.' 

पोटापाण्याचा धंदा म्हणून मी राजकारण करत नाही. आतापर्यंत बराच अनुभव घेतलाय. आता राज्यात शेतकऱ्यांचा दबावगट तयार करणार आहोत. आम्ही तयार केलेले आमदार आम्हाला सोडतात तर सोडू द्या, अशा गद्दारांना बरोबर ठेवून कधीच काम करणार नाही, असंही शेट्टी म्हणाले.

टॅग्स :Puneपुणेkolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीFarmerशेतकरी