शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
4
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
5
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
6
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
7
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
9
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
10
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
11
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
12
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
13
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
14
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
15
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
16
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
17
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
18
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
19
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
20
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार

वाहतूककोंडीचा ‘सरचार्ज’ प्रवाशांच्या माथी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 10:56 IST

दिल्लीप्रमाणे पुण्यातही सरचार्ज आकारू नये

ठळक मुद्देनागरिक विनाकारण त्रस्त, सरचार्ज माफ करण्याची मागणीशहरामध्ये बहुतेक प्रमुख रस्त्यांवर वाहनचालकांना वाहतूककोंडीचा दररोजच सामना

पुणे : वाहतूककोडींने त्रस्त झालेल्या पुणेकरांच्या खिशावरही ताण पडत आहे. शहरात सुरू असलेल्या ओला, उबेर व अन्य कंपन्यांच्या कॅब प्रवासादरम्यान वाहतूककोंडीमुळे प्रवाशांना सरचार्ज म्हणजे अतिरिक्त पैसे द्यावे लागत आहेत. नवी दिल्लीतील वाहतूककोंडीच्या पार्श्वभूमीवर तेथील कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी गर्दीच्या वेळी सरचार्ज न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसाच निर्णय पुणेकरांसाठी कधी होणार, असा अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहरामध्ये बहुतेक प्रमुख रस्त्यांवर वाहनचालकांना वाहतूककोंडीचा दररोजच सामना करावा लागत आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरे तसेच शहरालगतच्या रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. मागील काही महिन्यांपासून शहरात ठिकठिकाणी मेट्रोचे काम सुरू असल्याने या कोंडीत आणखी भर पडली आहे. स्वारगेट ते हडपसर, नगर रस्ता, चांदणी चौक, कर्वे रस्ता, हिंजवडी, येरवडा, मुंढवा, शिवाजीनगर, पुणे स्टेशन यांसह अन्य भागांमध्ये सातत्याने वाहतूककोंडी होत असते. याचा फटका सर्वसामान्य पादचाºयांनाही सहन करावा लागतोय. कोंडीमुळे वेळ आणि इंधनही मोठ्या प्रमाणावर वाया जाते. तसेच वाहनचालकांना मानसिक आणि शारीरिक त्रासही होतो. त्याचप्रमाणे प्रवाशांना आर्थिक भारही सोसावा लागत आहे. शहरात ओला, उबेर व अन्य कंपन्यांची कॅबसेवा सुरू आहे. या कॅब वाहतूककोंडीमध्ये अडकल्यानंतर त्यांच्या कडून प्रतिमिनिटाला अतिरिक्त शुल्क म्हणजे सरचार्ज आकारले जाते. सर्व कंपन्यांचे शुल्क वेगवेगळे आहे. साधारणपणे १ ते दीड रुपयांपर्यंत हे शुल्क घेतले जाते. प्रत्यक्ष कॅब बुक केल्यानंतर येणारे भाडे आणि वाहतूककोंडीत अडकल्यानंतर अंतिमत: येणारे भाडे यामध्ये फरक पडत आहे. पीएमपी प्रवासी मंचचे संजय शितोळे यांनी सांगितलेल्या अनुभवानुसार, ‘अंतिम बिलामध्ये बिबवेवाडी ते भोसरी या प्रवासादरम्यान पहिले १५ किलोमीटर अंतरासाठी १२० रुपयांचे भाडे दाखविले. तर शेवटच्या ११.६ किलोमीटरसाठी १८५.६ रुपये भाडे घेण्यात आले आहे. शेवटच्या काही किलोमीटरमध्ये झालेल्या वाहतूककोंडीमुळे पहिल्या १५ किलोमीटरपेक्षा ६५ रुपये अधिकचे भाडे द्यावे लागले. बेसिक फेअर, डिस्टन्स फेअर, राईड फेअर, टोल फी, टॅक्स या सर्वांचे मिळून एकूण भाडे ३६२ रुपये द्यावे लागले. त्यामध्ये वाहतूककोंडीमुळे ४२ रुपये अधिकचे भाडे झाले.’ असाच अनुभव इतर प्रवाशांना येत आहे..........४वाहतूककोंडीमध्ये अडकल्यानंतर आकरण्यात येणाºया सरचार्जबाबत ओला कंपनीच्या अधिकाºयांशी संपर्क करण्यात आला. मात्र, त्यांच्या जनसंपर्क विभागाकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया मिळणार नाही, असे सांगण्यात आले. कंपनीने लावलेल्या सरचार्जची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याला शासनानेही मान्यता दिलेली आहे, असे स्पष्ट करण्यात आले............

ओला, उबेरकडून मिनिटाप्रमाणे भाडे आकारले जात आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढला की त्यानुसार भाडे वाढत जात आहे. वाहतूककोंडी, रस्त्यावरील खड्डे यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो. त्याचा भुर्दंड नागरिकांना पडतो. कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून टोल घेतला जातो. पण रस्त्यांची सुधारणा होत नाही. त्यामुळे वाहतूककोंडीत वाहन अडकल्यानंतर त्याचा भुर्दंड प्रवाशांकडून घेतला जाऊ नये.- संजय शितोळे, प्रवास

........नवी दिल्लीमध्ये कॅब कंपन्यांनी वाहतूककोंडीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी सोमवार ते शनिवार या कालावधीत कोणताही सरचार्ज न आकारण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. दिल्लीमध्ये वाहतूककोंडीचे संकट मोठे आहे. त्यामुळे प्रवाशांना कॅबमधून प्रवास करताना खूप आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. यापार्श्वभूमीवर पुण्यातही असा निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस