शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

विस्थापित भामा आसखेड धरणग्रस्ताने घेतली जलसमाधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 20:56 IST

भामा आसखेड धरणामध्ये विस्तापित झालेल्या धरणग्रस्तांपैकी पुर्नवसनासाठी कोर्टच्या आदेशाने पात्र ठरलेल्या ३८८ प्रकल्पग्रस्तांपैकी एका तरुणाने प्रशासनाच्या कारभाराला कंटाळून अखेर जलसमाधी घेतली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाच्या उदासिनतेचा बळी कागदपत्रांसाठी हेलपाटे मारावे लागत असल्याने आले नैराश्य

पाईट : भामा आसखेड धरणामध्ये विस्तापित झालेल्या धरणग्रस्तांपैकी पुर्नवसनासाठी कोर्टच्या आदेशाने पात्र ठरलेल्या ३८८ प्रकल्पग्रस्तांपैकी एका तरुणाने प्रशासनाच्या कारभाराला कंटाळून अखेर जलसमाधी घेतली आहे. वारंवार इशारा देऊनही पुनर्वसनासाठी कोणतीही हालचाल होत नाहीच शिवाय कागदपत्रांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने अखेर जलसमाधीचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. ही घटना शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली.

        ज्ञानेश्वर शांताराम गुंजाळ - सुतार (वय ३६) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. भामा आसखेड जलाशयात रौंधळवाडी गावच्या हद्दीत बबन सखाराम रौधळ यांच्या घरासमोरील जागेत आत्महत्या केली.. यावेळी काही महिला कपडे धुत होत्या. त्यांच्या समोरच गुंजाळ यांनी पाण्यामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली.  गुंजाळ यांची भामा आसखेड धरणामध्ये जमीन संपादित झालेली आहे. ६५ टक्के रक्कम भरून घेऊन जमीन मिळावी, यासाठी न्यायालयामध्ये त्यांनी दाद मागीतली होती. पात्र ३८८ खातेदारांना ६५ टक्के रक्कम भरून त्यांचे पुर्नवसन करा असे न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. मात्र, भामा आसखेडचे प्रशासनाने त्यातील पात्र अपात्रच्या फेऱ्यात खातेदारांना घेतले आहे. वारंवार हेलपाटे मारुनही फाईल मारण्याचे प्रशासनाच्या धोरणाला कंटाळून गुंजाळ याने जलसमाधी घेतली.

         गुंजाळ यांना ४ एकर देय क्षेत्र मंजुर झाले होते. परंतू, पात्रता यादीवर कुटुंब संख्या न लिहल्याने व त्यासाठीची कागदपत्रे वारंवार मागितल्याने ते निराश झाले होते. त्यांच्या एकत्र  कुटुंबातील सदस्य संख्या २१ होती. त्याचे देय क्षेत्र ७ एकर मिळणे अपेक्षीत होते. परंतू, त्यासाठी लागणारी कागदपत्रे मिळविण्यात तो अपयशी ठरला होता. त्याकडे १९८९ सालची कागदपत्रे वारंवार मागितली जात होती. त्यातच उदरनिवार्हाचे साधन दुसरे नसल्याने कर्ज झालेले होते. सेक्शन १८ / २ ८ मध्ये जमिनीचा मोबदल्यासाठी दावा होता. त्याचेही वाढीव पेमेंट मिळणे बाकी होते. यामुळे आलेल्या नैराश्यामधून त्यांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.गुंजाळ यांनी आत्महत्या केल्याची माहिती समजताच पंचक्रोशीतील नागरिकांनी तलावाकडे धाव घेतली. याठिकाणी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मृतदेह शोधण्यासाठी प्रथम स्थानिकांची मदत घेण्यात आली. त्यानंतर ‘एनडीआरएफ’च्या १४ जवानांच्या दोन पथकांनी  शोधकार्य सुरु केले. रात्री उशिरापर्यंत त्यांचा मृतदेह मिळून आला नव्हता

टॅग्स :PuneपुणेDamधरणSuicideआत्महत्या