शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

विस्थापित भामा आसखेड धरणग्रस्ताने घेतली जलसमाधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 20:56 IST

भामा आसखेड धरणामध्ये विस्तापित झालेल्या धरणग्रस्तांपैकी पुर्नवसनासाठी कोर्टच्या आदेशाने पात्र ठरलेल्या ३८८ प्रकल्पग्रस्तांपैकी एका तरुणाने प्रशासनाच्या कारभाराला कंटाळून अखेर जलसमाधी घेतली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाच्या उदासिनतेचा बळी कागदपत्रांसाठी हेलपाटे मारावे लागत असल्याने आले नैराश्य

पाईट : भामा आसखेड धरणामध्ये विस्तापित झालेल्या धरणग्रस्तांपैकी पुर्नवसनासाठी कोर्टच्या आदेशाने पात्र ठरलेल्या ३८८ प्रकल्पग्रस्तांपैकी एका तरुणाने प्रशासनाच्या कारभाराला कंटाळून अखेर जलसमाधी घेतली आहे. वारंवार इशारा देऊनही पुनर्वसनासाठी कोणतीही हालचाल होत नाहीच शिवाय कागदपत्रांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने अखेर जलसमाधीचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. ही घटना शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली.

        ज्ञानेश्वर शांताराम गुंजाळ - सुतार (वय ३६) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. भामा आसखेड जलाशयात रौंधळवाडी गावच्या हद्दीत बबन सखाराम रौधळ यांच्या घरासमोरील जागेत आत्महत्या केली.. यावेळी काही महिला कपडे धुत होत्या. त्यांच्या समोरच गुंजाळ यांनी पाण्यामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली.  गुंजाळ यांची भामा आसखेड धरणामध्ये जमीन संपादित झालेली आहे. ६५ टक्के रक्कम भरून घेऊन जमीन मिळावी, यासाठी न्यायालयामध्ये त्यांनी दाद मागीतली होती. पात्र ३८८ खातेदारांना ६५ टक्के रक्कम भरून त्यांचे पुर्नवसन करा असे न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. मात्र, भामा आसखेडचे प्रशासनाने त्यातील पात्र अपात्रच्या फेऱ्यात खातेदारांना घेतले आहे. वारंवार हेलपाटे मारुनही फाईल मारण्याचे प्रशासनाच्या धोरणाला कंटाळून गुंजाळ याने जलसमाधी घेतली.

         गुंजाळ यांना ४ एकर देय क्षेत्र मंजुर झाले होते. परंतू, पात्रता यादीवर कुटुंब संख्या न लिहल्याने व त्यासाठीची कागदपत्रे वारंवार मागितल्याने ते निराश झाले होते. त्यांच्या एकत्र  कुटुंबातील सदस्य संख्या २१ होती. त्याचे देय क्षेत्र ७ एकर मिळणे अपेक्षीत होते. परंतू, त्यासाठी लागणारी कागदपत्रे मिळविण्यात तो अपयशी ठरला होता. त्याकडे १९८९ सालची कागदपत्रे वारंवार मागितली जात होती. त्यातच उदरनिवार्हाचे साधन दुसरे नसल्याने कर्ज झालेले होते. सेक्शन १८ / २ ८ मध्ये जमिनीचा मोबदल्यासाठी दावा होता. त्याचेही वाढीव पेमेंट मिळणे बाकी होते. यामुळे आलेल्या नैराश्यामधून त्यांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.गुंजाळ यांनी आत्महत्या केल्याची माहिती समजताच पंचक्रोशीतील नागरिकांनी तलावाकडे धाव घेतली. याठिकाणी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मृतदेह शोधण्यासाठी प्रथम स्थानिकांची मदत घेण्यात आली. त्यानंतर ‘एनडीआरएफ’च्या १४ जवानांच्या दोन पथकांनी  शोधकार्य सुरु केले. रात्री उशिरापर्यंत त्यांचा मृतदेह मिळून आला नव्हता

टॅग्स :PuneपुणेDamधरणSuicideआत्महत्या