शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

विस्थापित भामा आसखेड धरणग्रस्ताने घेतली जलसमाधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 20:56 IST

भामा आसखेड धरणामध्ये विस्तापित झालेल्या धरणग्रस्तांपैकी पुर्नवसनासाठी कोर्टच्या आदेशाने पात्र ठरलेल्या ३८८ प्रकल्पग्रस्तांपैकी एका तरुणाने प्रशासनाच्या कारभाराला कंटाळून अखेर जलसमाधी घेतली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाच्या उदासिनतेचा बळी कागदपत्रांसाठी हेलपाटे मारावे लागत असल्याने आले नैराश्य

पाईट : भामा आसखेड धरणामध्ये विस्तापित झालेल्या धरणग्रस्तांपैकी पुर्नवसनासाठी कोर्टच्या आदेशाने पात्र ठरलेल्या ३८८ प्रकल्पग्रस्तांपैकी एका तरुणाने प्रशासनाच्या कारभाराला कंटाळून अखेर जलसमाधी घेतली आहे. वारंवार इशारा देऊनही पुनर्वसनासाठी कोणतीही हालचाल होत नाहीच शिवाय कागदपत्रांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने अखेर जलसमाधीचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. ही घटना शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली.

        ज्ञानेश्वर शांताराम गुंजाळ - सुतार (वय ३६) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. भामा आसखेड जलाशयात रौंधळवाडी गावच्या हद्दीत बबन सखाराम रौधळ यांच्या घरासमोरील जागेत आत्महत्या केली.. यावेळी काही महिला कपडे धुत होत्या. त्यांच्या समोरच गुंजाळ यांनी पाण्यामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली.  गुंजाळ यांची भामा आसखेड धरणामध्ये जमीन संपादित झालेली आहे. ६५ टक्के रक्कम भरून घेऊन जमीन मिळावी, यासाठी न्यायालयामध्ये त्यांनी दाद मागीतली होती. पात्र ३८८ खातेदारांना ६५ टक्के रक्कम भरून त्यांचे पुर्नवसन करा असे न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. मात्र, भामा आसखेडचे प्रशासनाने त्यातील पात्र अपात्रच्या फेऱ्यात खातेदारांना घेतले आहे. वारंवार हेलपाटे मारुनही फाईल मारण्याचे प्रशासनाच्या धोरणाला कंटाळून गुंजाळ याने जलसमाधी घेतली.

         गुंजाळ यांना ४ एकर देय क्षेत्र मंजुर झाले होते. परंतू, पात्रता यादीवर कुटुंब संख्या न लिहल्याने व त्यासाठीची कागदपत्रे वारंवार मागितल्याने ते निराश झाले होते. त्यांच्या एकत्र  कुटुंबातील सदस्य संख्या २१ होती. त्याचे देय क्षेत्र ७ एकर मिळणे अपेक्षीत होते. परंतू, त्यासाठी लागणारी कागदपत्रे मिळविण्यात तो अपयशी ठरला होता. त्याकडे १९८९ सालची कागदपत्रे वारंवार मागितली जात होती. त्यातच उदरनिवार्हाचे साधन दुसरे नसल्याने कर्ज झालेले होते. सेक्शन १८ / २ ८ मध्ये जमिनीचा मोबदल्यासाठी दावा होता. त्याचेही वाढीव पेमेंट मिळणे बाकी होते. यामुळे आलेल्या नैराश्यामधून त्यांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.गुंजाळ यांनी आत्महत्या केल्याची माहिती समजताच पंचक्रोशीतील नागरिकांनी तलावाकडे धाव घेतली. याठिकाणी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मृतदेह शोधण्यासाठी प्रथम स्थानिकांची मदत घेण्यात आली. त्यानंतर ‘एनडीआरएफ’च्या १४ जवानांच्या दोन पथकांनी  शोधकार्य सुरु केले. रात्री उशिरापर्यंत त्यांचा मृतदेह मिळून आला नव्हता

टॅग्स :PuneपुणेDamधरणSuicideआत्महत्या