शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

विस्थापित भामा आसखेड धरणग्रस्ताने घेतली जलसमाधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 20:56 IST

भामा आसखेड धरणामध्ये विस्तापित झालेल्या धरणग्रस्तांपैकी पुर्नवसनासाठी कोर्टच्या आदेशाने पात्र ठरलेल्या ३८८ प्रकल्पग्रस्तांपैकी एका तरुणाने प्रशासनाच्या कारभाराला कंटाळून अखेर जलसमाधी घेतली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाच्या उदासिनतेचा बळी कागदपत्रांसाठी हेलपाटे मारावे लागत असल्याने आले नैराश्य

पाईट : भामा आसखेड धरणामध्ये विस्तापित झालेल्या धरणग्रस्तांपैकी पुर्नवसनासाठी कोर्टच्या आदेशाने पात्र ठरलेल्या ३८८ प्रकल्पग्रस्तांपैकी एका तरुणाने प्रशासनाच्या कारभाराला कंटाळून अखेर जलसमाधी घेतली आहे. वारंवार इशारा देऊनही पुनर्वसनासाठी कोणतीही हालचाल होत नाहीच शिवाय कागदपत्रांसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने अखेर जलसमाधीचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. ही घटना शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली.

        ज्ञानेश्वर शांताराम गुंजाळ - सुतार (वय ३६) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. भामा आसखेड जलाशयात रौंधळवाडी गावच्या हद्दीत बबन सखाराम रौधळ यांच्या घरासमोरील जागेत आत्महत्या केली.. यावेळी काही महिला कपडे धुत होत्या. त्यांच्या समोरच गुंजाळ यांनी पाण्यामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली.  गुंजाळ यांची भामा आसखेड धरणामध्ये जमीन संपादित झालेली आहे. ६५ टक्के रक्कम भरून घेऊन जमीन मिळावी, यासाठी न्यायालयामध्ये त्यांनी दाद मागीतली होती. पात्र ३८८ खातेदारांना ६५ टक्के रक्कम भरून त्यांचे पुर्नवसन करा असे न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. मात्र, भामा आसखेडचे प्रशासनाने त्यातील पात्र अपात्रच्या फेऱ्यात खातेदारांना घेतले आहे. वारंवार हेलपाटे मारुनही फाईल मारण्याचे प्रशासनाच्या धोरणाला कंटाळून गुंजाळ याने जलसमाधी घेतली.

         गुंजाळ यांना ४ एकर देय क्षेत्र मंजुर झाले होते. परंतू, पात्रता यादीवर कुटुंब संख्या न लिहल्याने व त्यासाठीची कागदपत्रे वारंवार मागितल्याने ते निराश झाले होते. त्यांच्या एकत्र  कुटुंबातील सदस्य संख्या २१ होती. त्याचे देय क्षेत्र ७ एकर मिळणे अपेक्षीत होते. परंतू, त्यासाठी लागणारी कागदपत्रे मिळविण्यात तो अपयशी ठरला होता. त्याकडे १९८९ सालची कागदपत्रे वारंवार मागितली जात होती. त्यातच उदरनिवार्हाचे साधन दुसरे नसल्याने कर्ज झालेले होते. सेक्शन १८ / २ ८ मध्ये जमिनीचा मोबदल्यासाठी दावा होता. त्याचेही वाढीव पेमेंट मिळणे बाकी होते. यामुळे आलेल्या नैराश्यामधून त्यांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.गुंजाळ यांनी आत्महत्या केल्याची माहिती समजताच पंचक्रोशीतील नागरिकांनी तलावाकडे धाव घेतली. याठिकाणी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मृतदेह शोधण्यासाठी प्रथम स्थानिकांची मदत घेण्यात आली. त्यानंतर ‘एनडीआरएफ’च्या १४ जवानांच्या दोन पथकांनी  शोधकार्य सुरु केले. रात्री उशिरापर्यंत त्यांचा मृतदेह मिळून आला नव्हता

टॅग्स :PuneपुणेDamधरणSuicideआत्महत्या