शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मधुचंद्राच्या रात्री दिलेल्या त्रासाने नवविवाहितेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 10:38 IST

नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली...

पुणे : लग्न झाल्यानंतर मधुचंद्राची रात्र ही प्रत्येक नववधूसाठी आणि वरासाठी संस्मरणीय रात्र असते. असे म्हणतात. पण, एका नववधूसाठी ती काळ रात्र ठरली. मधुचंद्राच्या रात्री पतीने चारित्र्याचा संशय घेऊन तिला असा काही त्रास दिला की, नवविवाहितेने नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.

हडपसर पोलिसांनी तिचा पती किशोर देवारामजी परमार (रा. औरंगाबाद) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मी किशोर परमान (वय २१, रा. मांजरी) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे.

याप्रकरणी तिचे वडील चेनाराम बोराना (रा. मांजरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी लक्ष्मी हिचे औरंगाबाद येथील किशोर परमार याच्याशी १२ डिसेंबर २१ रोजी राजस्थान येथील सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न झाले. त्यानंतर ते सासरी औरंगाबादला गेले. तिच्याबरोबर करवली म्हणून त्यांच्या नात्यातील मुलगी गेली होती.

आठवड्याभरानंतर लक्ष्मी पुन्हा माहेरी आली. किशोर व्यवसाय करण्यासाठी माहेरवरून ५ लाख रुपये घेऊन ये, असे सांगून आपला छळ करीत असल्याचे तिने वडिलांना सांगितले. त्यानंतर तिने १९ जानेवारी २२ रोजी माहेरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

या घटनेनंतर त्यांच्या दुसऱ्या मुलीने लक्ष्मी व किशोर यांच्यातील फोनवर झालेले रेकॉर्डिंग ऐकविले. त्यात किशोर इंस्टाग्राम व व्हॉटस्-ॲपवरील संदेशावरून तिच्या चारित्र्याचा संशय घेत असून, तिला जगावेसे वाटत नसल्याचे त्यात ती म्हणत होती. त्यानंतर त्यांनी तिच्याबरोबर करवली म्हणून केलेल्या मुलीला विचारले, तेव्हा तिने सांगितले की, मधुचंद्राच्या रात्रीनंतर दुसऱ्यादिवशी लक्ष्मीच्या चेहऱ्यावर डाग दिसले. त्याबद्दल विचारल्यावर किशोर चावल्याचे तिने सांगितल्याचे या करवलीने सांगितले. त्यानंतर लक्ष्मीच्या वडिलांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थान