शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले

By admin | Updated: October 16, 2015 22:31 IST

राज्यातील ऊस गळीत हंगामाला अखेर १५ आॅक्टोबरपासून सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी २० ते २५ साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले आहे

पुणे : राज्यातील ऊस गळीत हंगामाला अखेर १५ आॅक्टोबरपासून सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी २० ते २५ साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले आहे. यामध्ये यंदा साखर आयुक्त कार्यालयाकडे केवळ ५० साखर कारखान्यांनी गाळप परवाण्यासाठी प्रस्ताव दिले आहेत. त्या कारखान्यांच्या क्षेत्रांत उपलब्ध असलेला ऊस विचारात घेऊन व प्रस्तावाची पडताळणी करून ऊस गाळपाला परवानगी दिली जाणार आहे.राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा ऊसाच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. त्यामुळे अनेक साखर कारखान्यांना गाळप हंगामासाठी ऊस उपलब्ध नसल्याने त्यांचे बॉयलर पेटतील किंवा नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. परंतु, राज्याच्या ऊस गाळप हंगामाबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत धोरण निश्चित करण्यात आले असून, १५ आॅक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात पहिल्या दिवशी २० ते २५ साखर कारखान्यांनी बॉयलर पेटवले. प्रादेशिक स्तरावर १७२ कारखान्यांनी ऊस गाळप परवान्यासाठी अर्ज केले आहेत. त्यांची छाननी होऊन त्यातील ५० कारखान्यांचे प्रस्ताव साखर आयुक्त कार्यालयात अंतिम मान्यतेसाठी सादर झाले आहेत.यावेळी प्रथमच ऊस गाळप परवाना देताना संबंधित साखर कारखान्याने गेल्या हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसदराची एफआरपीची ७५ टक्के रक्कम देणे बंधनकारक आहे. गेल्या हंगामातील संपूर्ण जमाखर्चाला मान्यता घेणे बंधनकारक आहे. या सर्व बाबींची पडताळणी करून परवाना दिला जातो. या सर्व बाबींची पडताळणी करून परवाना दिला जातो. साखर आयुक्त कार्यालयाने अद्याप एकही गाळप परवाना दिलेला नाही. साखर कारखान्यांनी सध्या त्यांचे बॉयलर पेटविले आहेत. देशात अन्यत्र पावसाने फटका दिल्याने साखर उत्पादन घटणार असल्याचा अंदाज आहे.>>राज्यात दुष्काळामुळे मराठवाडा, सोलापूर आणि नगर जिल्ह्णांत उसाची उपलब्धता खूपच कमी आहे. त्यामुळे या काही जिल्ह्णाच्या गाळप हंगामाचे स्वतंत्रपणे नियोजन सुरू असून, याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे साखर आयुक्त कार्यालयातील अधिकृत सूत्रांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्रात पुरेसा ऊस उपलब्ध असल्याने ऊस उत्पादनावर मोठा परिणाम होणार नाही.>>साखर उद्योगाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, परवानगी मिळाल्यानंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर या बॉयलरमध्ये मुळी टाकून गाळप सुरू होण्याची शक्यता आहे. राज्यात यंदा सुमारे ७०० ते ७५० लाख मेट्रिक टन ऊस उत्पादनाचा अंदाज आहे.