शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

लठ्ठपणा सतावतोय? बॅरिऍट्रिक सर्जरी ठरतेय एक वरदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 20:37 IST

धावपळ, चुकीची जीवनशैली, फास्टफूड, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, वाढता ताण यांसारख्या कारणांनी लठ्ठपणाची समस्या सतावते आहे...

- डॉ. शशांक शहा

लठ्ठपणा ही सध्या अतिशय सामान्य समस्या झाली आहे.  वजन वाढवणे एकवेळ जमू शकते, पण वाढलेले वजन कमी करणे हे एकप्रकारचे आव्हानच आहे. सध्याची धावपळ आणि चुकीची जीवनशैली, आहार, व्यायामाचा अभाव हे वजन वाढण्याचे मुख्य कारण असले, तरी फास्टफूडचे सेवन, प्रक्रिया करून पिकवलेले अन्न, अपुरी झोप, वाढता ताण यांसारख्या कारणांनी लठ्ठपणाची समस्या सतावते. आपले वजन वाढल्याने आपण बेढब दिसू लागलो म्हणून किंवा काहीतरी इंटरनेटवर पाहून तात्पुरते उपाय केले जातात पण ते म्हणावे तितके प्रभावी ठरतातच असे नाही. मुळात लठ्ठपणाकडे आजही आपल्याकडे एक प्रमुख आजार व समस्या म्हणून पाहिले जात नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.बॅरिऍट्रिकची गरज काय ?बरेचदा लठ्ठ माणसाला कमी कॅलरीज जेवण व व्यायाम वाढविण्यास सांगितले जाते. संतुलित आहार व व्यायामाचा फायदा निश्चितच होतो. पण काही व्यक्तींना त्याचा फायदा होत नाही, अशावेळी मेटाबॉलिजम वाढविणारी औषध द्यावी लागतात. त्यानंतरही फारसा फरक पडत नसल्यास त्याचे रूपांतर आजारात होते. अशावेळी बलून ट्रिटमेंट, बॅरिऍट्रिक सर्जरीचा अवलंब करावा लागतो. शरीरातील मेटाबॉलिजम बिघडला की वाढलेल्या फॅटची मेंदूला सवय होते. त्यामुळे या बिघडलेल्या मेटाबॉलिजमचा परिणाम इतर अवयवांवर व्हायला सुरुवात होते. अशावेळी हे असंतुलन नियमित करण्यासाठी जठर व आतड्यांमधून तयार होणारे चुकीचे संदेश नॉर्मल करून फॅट चे रुपांतर ऊर्जेत होऊन मेटाबॉलिजम नियमित होतो. त्यासाठी बॅरिऍट्रिक सर्जरीचा वापर होतो.बॅरिऍट्रिक सर्जरीचे प्रकार :फक्त जठरावर होणारी शस्त्रक्रिया : जठराचा गोलाकार भाग जेथे जास्तीत जास्त हार्मोन्स तयार होतात तो दुर्बिणीच्या माध्यमातून काढणे.गॅस्ट्रिक बायपास : बायपास म्हणजे दुसरा समान रस्ता. जठराकडून आतड्याकडे जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता तयार केला जातो, ज्यामुळे फॅटचे शोषण कमी होते व भुकेचे प्रमाण मंदावते.बॅरिऍट्रिक समज-गैरसमज- कॅन्सर होऊ शकतो का?

या शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरची शक्यता कमी होते.- शस्त्रक्रिया संपूर्ण पोट कापून म्हणजेच ओपन होते का?दुर्बिणीच्या साह्याने जठरावर केली जाणारी ही शस्त्रक्रिया आहे.- साईड इफेक्ट आहेत का?कोणतीही शस्त्रक्रिया केल्यानंतर आपलं शरीर नॉर्मल होण्यासाठी काही कालावधी लागतोच. त्यासाठी योग्य संतुलित आहार, व्यायाम, आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करावाच लागतो. गेल्या ५० वर्षांपासून या शस्त्रक्रिया जगभरात होतात. योग्य आहार, पौष्टिक जेवण घेतले तर त्याचे रिझल्ट चांगलेच मिळतात.  वजन कमी झाल्यास लठ्ठपणा आणि या सगळ्या आजारांवर खात्रीने कायमची मात करणं शक्य आहे. या शस्त्रक्रियेमुळे हृदयरोग, स्लीप अप्निया, टाइप-२ मधुमेह, उच्च रक्तदाब, फॅटी लिव्हर आणि ब्रेन स्ट्रोक यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो. याशिवाय सांध्यातील वेदना, संधीवात, पीसीओएस आणि लठ्ठपणाशी संबंधित बऱ्याच कर्करोगाचा धोका कमी होतो. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स