शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

सरावादरम्यान डोक्याला बंदुकीची गोळी लागून विद्यार्थ्याच्या मृत्यू; शिक्षकाला ७ वर्षांचा सश्रम कारावास

By नम्रता फडणीस | Updated: April 14, 2023 17:35 IST

तब्बल अकरा वर्षांनंतर मुलाच्या पालकांना न्याय मिळाला

पुणे : राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) सरावादरम्यान विद्यार्थ्याच्या डोक्याला बंदुकीची गोळी लागल्यानंतर जखमी होऊन उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणात संबंधित शिक्षकाला सात वर्षांचा सश्रम कारावास आणि पाच लाख रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.पी जाधव यांनी सुनावली. 

दंडाच्या रकमेतील तीन लाख रुपये मृत विद्यार्थ्याच्या पालकांना भरपाई स्वरुपात देण्यात यावे. दंड न भरल्यास एक वर्षाचा अतिरिक्त साधा कारावास भोगावा लागेल, असे निकालात नमूद आहे. तब्बल अकरा वर्षांनंतर मुलाच्या पालकांना न्याय मिळाला आहे. पराग देवेंद्र इंगळे असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो पाषाण येथील लॉयला शाळेचा विद्यार्थी होता. १ फेब्रुवारी २०१३ रोजी राष्ट्रीय छात्र सेनेच्या सरावादरम्यान त्याच्या डोक्याला बंदुकीची गोळी लागली होती. त्यानंतर त्याला लष्कराच्या कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली, मात्र त्यानंतर तीन वर्षे पराग कोमात होता. ७ जानेवारी २०१६ रोजी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी घाणेकर यांच्यावर डेक्कन पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आमोद घाणेकरवर दाखल सदोष मनुष्य वधाचे कलम वगळण्यात यावे, अशी मागणी घाणेकर यांनी न्यायालयात केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी बाजू मांडली.

एनसीसी सरावादरम्यान जमिनीवर झोपून गोळीबार करण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. त्यावेळी पराग अचानक उठून उभा राहिला आणि त्या वेळी त्याचे प्रशिक्षक आमोद घाणेकर यांच्या बंदुकीतील गोळी परागच्या डोक्याला लागली होती. दरम्यान, शिक्षकाचे काम विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्याचे होते. त्यांच्याच मागे उभे राहून शिक्षक फायरींग करत होता यातून निष्काळजीपणा दिसून येतो, असे न्यायालयात सुनावणीदरम्यान मांडण्यात आले होते.

परागने तीन वर्षे मृत्युशी झुंज दिली. घटना घडल्यानंतर आरोपीने आपल्या कृत्याची कबुली दिली. मात्र, सुनावणीदरम्यान वेगळी भूमिका घेऊन खटला लांबविण्याचा प्रयत्न केला. मृत मुलगा, त्याचे पालक आणि साक्षीदारांची अनावश्यक उलटतपासणी घेण्यात आली. प्रकरण जाणून बुजून किचकट करण्यात आले. ज्या मुलाचे पालन पोषण केले. स्वत:च्या हाताने त्याचेच अंत्यसंस्कार करण्याची वेळ पालकांवर आली. स्वत:चा मुलगा गमावण्याचे पालकांचे दु:ख मोजले जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने निकालपत्रात नमूद केले आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसStudentविद्यार्थीCourtन्यायालयDeathमृत्यूhospitalहॉस्पिटल