शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी न्यायालयात; आरटीआयमध्ये माहिती देण्यास टाळाटाळ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 19:05 IST

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी राजर्षी शाहूमहाराज शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे; मात्र गरजू तसेच पात्र विद्यार्थ्यांना डावलल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे.

ठळक मुद्दे४ सप्टेंबरपासून आजपर्यंत जाहीर झालेल्या तीन याद्यांमध्ये डावलले पात्र विद्यार्थ्यांना माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती देण्यास अधिकारी करीत आहेत टाळाटाळ

धनाजी कांबळेपुणे : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी राजर्षी शाहूमहाराज शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे; मात्र गरजू तसेच पात्र विद्यार्थ्यांना डावलून या योजनेचा मंत्री आणि सचिव दर्जाच्या मुलांना लाभ देण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. ४ सप्टेंबरपासून आजपर्यंत जाहीर झालेल्या तीन याद्यांमध्ये विद्यार्थ्यांना डावलले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्यामार्फत समाज कल्याण विभागाकडे माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागितली होती; मात्र ती देण्यास अधिकारी टाळाटाळ करीत असल्याने आता न्यायालयात जाण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या कृती समितीने घेतला आहे.समाज कल्याण आयुक्तालया तर्फे या विद्यार्थ्यांचे अर्ज मागवणे; तसेच त्याची छाननी करून, ती यादी मंजुरीसाठी पाठवणे अशी प्रक्रिया राबविली जाते. या सर्व प्रक्रियेत विद्यानंद चेल्लावार यांची प्रमुख भूमिका होती; तसेच या योजनेबद्दलची माहिती देण्याची जबाबदारी चेल्लावार यांचीच होती. अंतरिक्ष वाघमारे आणि श्रुती बडोले यांचा या यादीत समावेश असल्याने आणि ऐनवेळी शासन निर्णय बदलल्याने माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे; तसेच कुणीच समाधानकारक उत्तर देत नसल्याने आम्ही विद्यार्थ्यांनी काय करावे, आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे, याकडे डोळेझाक करून अधिकारी मनमानी पद्धतीने काम करीत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला असून, आता न्यायालयात दाद मागणार असल्याचे कृती समितीतील विद्यार्थ्यांनी सांगितले. दरम्यान, यासंदर्भात समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.

मुख्यमंत्र्यांकडूनही न्याय नाहीविद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर झाल्यावर साधारण अनेक पात्र विद्यार्थ्यांना डावलण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती; तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन आॅफ इंजिनिअर्स फोरमनेही मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले होते. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले व सचिव दिनेश वाघमारे यांनी पदाचा गैरवापर करून, ३५ विद्यार्थ्यांची प्रथम निवड यादी जाहीर केली आहे. या विद्यार्थ्यांंचा क्यूएस वर्ल्ड रँकिंग क्र. २० ते १४० मधील आहे. ज्या विद्यार्थ्यांचा क्यूएस वर्ल्ड रँकिंग क्र. १ ते १९ मधील आहे, अशा विद्यार्थ्यांचा समावेश पहिल्या ३५ जणांच्या यादीत केला नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे; मात्र त्यांनीही या प्रकरणात फार लक्ष घातले नसल्याचे दिसून येत आहे.

दोन स्तरावर लढाई लढणारन्यायालयीन लढाईसोबतच आंदोलनाचीदेखील आमची तयारी असून, महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी संघटना; तसेच पक्षांचा आम्हाला पाठिंबा आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी यात योग्य तोडगा काढून पात्र विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी आमची मागणी आहे. यादी उशिराने जाहीर करण्याची चुकीची पद्धत सुरू केली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना व्हिसा मिळूनही परदेशांत विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येत नाही. सामाजिक न्याय विभागाने निवड प्रकियेत बदल करावा. अनेक पात्र विद्यार्थ्यांना तोंडी निकष लावून डावलण्यात आले आहे. ज्या अभ्यासक्रमांना डावलले त्याचा सरळ फायदा अंतरिक्ष वाघमारेला निवड यादीत सामावून घेण्यासाठी झाला आहे. ज्यांना डावलले आहे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी आग्रही मागणी विद्यार्थी कृती समितीचे शीलराज कोल्हे, आदिनाथ घाडगे, डॉ. तेजश्री एटम यांनी म्हटले आहे.

ऐनवेळी जीआर बदलल्याने पेचसमितीतील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी आग्रही मागणी सुरुवातीपासून धेंडे यांनी लावून धरली आहे. ऐनवेळी जीआर बदलून पात्र विद्यार्थ्यांना डावलून मोजक्या विद्यार्थ्यांचा यादीत समावेश करण्यात आल्याने याची चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड