शहरं
Join us  
Trending Stories
1
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
2
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
3
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
4
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
5
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
6
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
7
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
8
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
9
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
10
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
11
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

वीर, भाटघर, नीरा-देवघर धरणक्षेत्रांत दमदार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 14:37 IST

गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शहर आणि तालुक्यात अल्पपर्जन्यमान झाल्याने शेतकरीवर्ग अडचणीत आहे...

ठळक मुद्देगतवर्षीच्या तुलनेने धरणसाखळीत ७ टक्के पाणीसाठा कमी बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यांना प्रतीक्षा

बारामती : राज्यात सर्वत्र धुवाधार सुरू असताना बारामती शहर तालुका तुलनेने कोरडाच आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शहर आणि तालुक्यात अल्पपर्जन्यमान झाल्याने शेतकरीवर्ग अडचणीत आहे. अपेक्षित पाऊस न झाल्याने ऐन पावसाळ्यात बागायती भागातील शेतकऱ्यांना नीरा डावा कालव्याच्या पाण्याने आधार दिला; मात्र धरण क्षेत्रात चांगला पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ३० जुलैपर्यंत भाटघर ६९.५६ टक्के, नीरा-देवघर ७७.३७ टक्के, वीर ९८.१९ टक्के पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी ३० जुलै रोजी हाच पाणीसाठा धरणनिहाय भाटघर ८४.६४ टक्के, नीरा-देवघर ८४.९३ टक्के,वीर ९८.१९ टक्के असा पाणीसाठा होता. यंदा एकूण धरणसाखळीमध्ये ७८.०४ टक्के पाणीसाठा असून, गेल्यावर्षी हाच पाणीसाठा ८५.१४ टक्के होता.बारामतीच्या बागायती परिसराला मूळ पाणीस्रोत उपलब्ध नाही. नीरा डावा कालव्यामुळे खºया अर्थाने संजीवनी मिळाली आहे. नीरा खोऱ्यातील धरणांमुळेच तालुक्याचा काही भाग बागायती झाला. तर, पाण्यापासून वंचित राहिलेला भाग जिरायती बनला. या भागात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी देखील टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. नीरा डावा कालवा तालुक्याची जीवनदायिनी मानला जातो. त्याला कारणही तसेच आहे. बारामती शहर,परिसरात अल्प पाऊस पडून देखील केवळ नीरा डावा कालव्यावर शेती,पिण्याच्या पाण्याच्या योजना तारल्या जातात. त्यामुळे भाटघर, वीर, नीरा-देवघर धरणक्षेत्रातील पावसाकडेच बारामतीकरांच्या नजरा असतात.पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार : ३० जुलैपर्यंतचा धरणातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे.भाटघर धरण १६,३४८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे, तर सध्या या धरणात ९६७ दशलक्ष घनफूटने पावसाचे  पाणी येत आहे. नीरा-देवघर धरणात ९०७५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. या धरणात ११९६ दशलक्ष घनफूटने पाणी येत आहे.वीर धरणात ९२३८ दशलक्षघनफू ट पाणीसाठा असून ११६५ दशलक्षघनफूटने धरणात पावसाचे पाणी येत आहे.दर वर्षी वर्षभरात ५ आवर्तने नीरा डावा कालव्याच्या आवर्तनाचे नियोजन पाटबंधारे खात्याच्या वतीने करण्यात येते. यंदा मात्र अनेक वर्षांनंतर प्रथमच नीरा-देवघरचे नीरा डावा कालव्याला मिळणारे पाणी थांबविण्यात येणार आहे.भाजप खासदारांच्या मागणीनंतर जलसंपदा विभागाने नीरा-देवघर प्रकल्पातून मिळणारे पाणी रोखण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दर वर्षी शेतीला मिळणाऱ्या पाच आवर्तनात दीड ते दोन आवर्तनाची घट होणार आहे. नेमके किती पाणी शेतीच्या आवर्तनामध्ये घटणार, याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा लवकरच होण्याची अपेक्षा आहे. खरीप हंगामासाठी नीरा डावा कालव्याचे आवर्तन  १६ जुलैपासून सोडण्यात आले आहे. त्यामुळे बारामतीचा बागायती भाग पाऊस लांबून देखील कालव्याच्या पाण्यावर तरला आहे. पाटबंधारे उपविभागाच्या आकडेवारीनुसार आजपर्यंत  बारामती शहर परिसरात ३११ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

तालुक्यातील इतर पाऊस पुढीलप्रमाणे : वडगाव निंबाळकर ४०५,मानप्पावस्ती ३०८ मिमी, पणदरे २४४, माळेगाव कॉलनी ३०९,सणसर १७५ मिमी,अंथुर्णे ११९ मिमी, निमगाव केतकी १५३ मिमी, बावडा ९५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर, नाझरे परिसरात ४२९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

.........शेटफळ हवेली तलावात ११.४७ दशलक्षघनफूट पाणीसाठाइंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली तलावात अवघा ११.४७ दशलक्षघनफूट पाणीसाठा आहे.हा पाणीसाठा शून्य टक्के असल्यात जमा आहे. या तलावावर परिसरातील १२ गावांची शेती अवलंबून आहे.या तलावात वीर-भाटघर धरणातूनच पाणी सोडण्यात येते.त्यामुळे धरणांमध्ये ६० टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्यानंतरच, शेटफळ-हवेली तलावामध्ये पाणी नीरा डावा कालव्याद्वारे सोडण्यात येते. त्यामुळे या तलावात पाणी सोडल्यानंतरच, १२ गावांमधील शेतीला पाणी मिळणे शक्य होणार आहे.सध्या नीरा डावा कालव्याचे  शेती सिंचन आवर्तन सुरू आहे. शेती आवर्तन संपल्यानंतरच शेटफळ-हवेली तलावामध्ये पाणी सोडण्यात येणार आहे,अशी माहिती येथील प्रभारी अभियंता अजित जमदाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना .......पावसाने मारले, नीरा डावा कालव्याने तारलेबारामती तालुक्यात दोन मोठ्या साखर कारखान्यांचे कार्यक्षेत्र आहे. माळेगाव आणि भवानीनगर येथील श्री छत्रपती या दोन्ही कारखान्यांचे बारामती तालुक्यात हजारो एकर ऊसक्षेत्र आहे. ऊसपीक पूर्णपणे पाण्यावर अवलंबून आहे.ठिबक सिंचनाचा पर्याय वापरून कमी पाण्यावर ऊसपीक घेण्याचा मार्ग देखील दोन्ही कारखान्यांनी अवलंबला आहे; मात्र अल्प पर्जन्यमान झाल्यानंतर देखील नीरा डावा कालव्याच्या पाण्यावर हजारो एकर ऊसक्षेत्र जगविले जाते.त्यामुळे पावसाने  मारले तरी, नीरा डावा कालवा शेतकºयांना तारतो,असा कायमचा अनुभव आहे.याचे श्रेय ब्रिटिशांना दिले जाते.ब्रिटिशकालीन धरणे,कालव्यांमुळे ही किमया साधणे शक्य झाले आहे.......... पूल ४० हजार क्युसेक्स विसर्गास पाण्याखाली जाणार वीरधरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे वीर धरणातील विसर्ग वाढणार आहे. मंगळवारी (दि. ३०) सकाळी असणारा २३,५०० क्युसेक्सवर असणारा विसर्ग दुपारी ३४,५०० क्युसेक्स करण्यात आला. वीर धरणासमोरील पूल ४० हजार क्युसेक्स विसर्गास पाण्याखाली जाणार आहे. त्यामुळे संबंधितांनी आवश्यक दक्षता घ्यावी,असे आवाहन पाटबंधारे खात्याच्या वतीने करण्यात आले आहे.  

टॅग्स :BaramatiबारामतीDamधरणRainपाऊसdroughtदुष्काळ