शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

दोषींवर कठोर कारवाई केली जाईल; दीनानाथ रुग्णालयाच्या घटनेबाबत मिसाळ यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 16:03 IST

राज्यातील कुठल्याही रुग्णालयात ह्या पुढे अशी दुर्दैवी घटना घडणार नाही ह्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील

पुणे : सुसंस्कृत विद्येचे माहेरघर असणाऱ्या अन् मेडिकलचे हब असणाऱ्या पुण्यात दीनानाथ रुग्णालयाबाबत धक्कादायक घटना घडली आहे. पैशांच्या हव्यासापोटी उपचारात अडवणूक केल्याने एका गर्भवती महिलेला जीव गमावावा लागलाय. वेळीच उपचार मिळाले असते तर जन्मताच दोन नवजात बाळांवर मातृछत्र गमावण्याची वेळ आली नसती, अशा शब्दांत दीनानाथ रुग्णालयाविरोधात राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. रुग्णालयाच्या बाहेर पक्ष आणि संघटनांकडून आंदोलनही केले जात आहे. रुग्णालयावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे. महिला आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.   दीनानाथ रुग्णालयातील घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. ह्या चौकशीत जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. राज्यातील कुठल्याही रुग्णालयात ह्या पुढे अशी दुर्दैवी घटना घडणार नाही ह्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील असे मिसाळ यांनी सांगितले आहे. 

रुग्णालयावर कठोर कारवाई व्हावी - अमोल कोल्हे 

सात महिन्यांची गरोदर असलेली एक भगिनी प्रचंड रक्तस्त्रावात वेदनांमध्ये विव्हळत होती. अशा वेळी पुण्यातील एका नामांकित रुग्णालयाने १० लाख भरले नाही म्हणून त्या भगिनीला मृत्यूच्या दाढेत ढकललं. ही घटना समाज म्हणून अक्षरशः लज्जास्पद, माणुसकीला काळीमा फासणारी, व्यवस्था म्हणून आपला नाकर्तेपणा उघड करणारी आहे. विशेष म्हणजे पीडित भगिनी ही सत्ताधारी आमदारांशी संबंधित होत्या, त्यांच्यावर उपचार करावेत म्हणून मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून विनंतीही करण्यात आली होती, तरीही हे "धर्मादाय" रुग्णालय आपल्या असंवेदनशील भूमिकेवर ठाम राहिले. या भगिनीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या, तिच्या जुळ्या बाळांनी डोळे उघडायच्या आत त्यांचे मातृछत्र हिरावून घेणाऱ्या रुग्णालयावर कठोर कारवाई व्हावी. 

तर सर्वसामान्य जनतेचे काय होणार - सुप्रिया सुळे 

पुणे शहरातील रुग्णालयांत अद्ययावत सुविधा आहेत. परंतु जर पैशाअभावी त्या नाकारल्या जात असतील ही अतिशय गंभीर बाब आहे. पुण्यात एका नामांकित रुग्णालयाने एका सात महिन्यांच्या गरोदर महिलेला प्रचंड रक्तस्त्राव होत असतानाही केवळ पैशांअभावी उपचार नाकारल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. अगदी मंत्रालयातून फोन गेल्यानंतर देखील त्या महिलेवर वेळेत उपचार झाले नाहीत. ही महिला काही तास रुग्णालयाच्या दारात वेदनेने विव्हळत होती. पण मानवतेच्या भूमिकेतून देखील रुग्णालय प्रशासनाने विचार केला नाही. मंत्रालयातून विनंती करुनही जर रुग्णालय प्रशासन ऐकत नसेल तर सर्वसामान्य जनतेचे काय? शासनाने या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने नोंद घेऊन सखोल चौकशी करावी. याखेरीज तातडीचे उपचार आवश्यक असणाऱ्या रुग्णांना केवळ पैशांसाठी सेवा नाकारण्याच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी निश्चित दिशानिर्देश राज्यातील सर्व रुग्णालयांना द्यावेत.

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलMadhuri Misalमाधुरी मिसाळMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारHealthआरोग्य