शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

वाचिक कट्टा रंगणार , अभिनयातून नाटकाची गोष्ट उलगडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 04:15 IST

नाटक म्हणजे प्रगल्भ शब्दांचे भांडार! महाराष्ट्राला रंगभूमीची समृद्ध परंपरा लाभली आहे. रंगभूमीने कलावंत, रसिकांना संवादातून, गीतांमधून शब्दांची पाखरण करीत समृद्ध केले.

पुणे - नाटक म्हणजे प्रगल्भ शब्दांचे भांडार! महाराष्ट्राला रंगभूमीची समृद्ध परंपरा लाभली आहे. रंगभूमीने कलावंत, रसिकांना संवादातून, गीतांमधून शब्दांची पाखरण करीत समृद्ध केले. युवा रंगकर्मींना रंगभूमीची समृद्धी ‘वाचिक रंग कट्टा’ मधून अनुभवता येणार आहे. अभिवाचनातून रंगभूमीचा प्रवास, बदलते प्रवाह यांचा इतिहास जिवंत होणार आहे. कीर्ती शिलेदार, दीप्ती भोगले यांच्या पुढाकाराने मराठी रंगभूमीच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे.रंगभूमीला उर्जितावस्था मिळावी, नाटक नव्या पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरूआहेत. रंगभूमीची व्याप्ती खूप मोठी आहे. मुलुंड येथे झालेल्या नाट्य संमेलनामध्ये सादर झालेल्या भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांमधून ही व्याप्ती अनुभवता आली. संमेलनामध्ये अध्यक्षीय भाषण हा महत्त्वाचा भाग असतो. मेधा शिधये यांनी २००० सालापर्यंतच्या नाट्य संमेलनाध्यक्षांच्या भाषणाचे पुस्तक- रूपात संकलन केले आहे. प्रत्येक नाट्य संमेलनाध्यक्षांचे रंगभूमीवरील योगदान, विचारांची शैैली याचे प्रतिबिंब अध्यक्षीय भाषणावर उमटलेले पाहायला मिळते. पु. बा. भावे, आचार्य अत्रे, वसंत देसाई, प्रभाकर पणशीकर आदींचे विचार वाचिक अभियानातून युवा रंगकर्मींसमोर मांडल्यास त्यांची जाण वाढेल, या विचाराने ‘वाचिक रंग कट्टा’ ही कल्पना प्रत्यक्षात येत असल्याची माहिती दीप्तीभोगले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर २७ जुलैै रोजी पु. बा. भावे यांच्या भाषणाने ‘वाचिक रंग कट्टा’ या अभिनव उपक्रमाचा श्रीगणेशा होणार आहे. कीर्ती शिलेदार यांच्यासह आणखी दोन रंगकर्मी भाषणाचे अभिवाचन करणार आहेत. नाटकांचे विचार अभिवाचनातून नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. अध्यक्षीय भाषणांप्रमाणेच जुने संदर्भग्रंथ, नाटकाचा प्रवास उधृत करण्यात आलेले ग्रंथ अशा विविध विषयांचा अभिवाचनात समावेश करण्यात येणार आहे. यामुळे युवा पिढी नाटकातील विविधांगी घटकांचा विचार करण्यास प्रवृत्त होईल. सध्याच्या पिढीतील वाचनाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यातही रंगभूमीशी संबंधित लिखाण कमी प्रमाणात वाचले जाते.वाचण्यापेक्षा नाटकाची गोष्ट ऐकायला मिळाल्यास ही पिढी जास्त प्रमाणात आकृष्ट होईल आणि अभिवाचनाची नवी चळवळ उभारी घेईल, अशी आशा दीप्ती भोगले यांनी व्यक्त केली.दर महिन्याला आयोजन; सूरसंगतपासून श्रीगणेशावाचिक रंग कट्टा दर महिन्यातून एकदा रंगणार आहे. दर महिन्याच्या उपक्रमाला विविधांगी पद्धतीने सादर केले जाणार आहे.जयराम शिलेदार यांच्या ‘सूरसंगत’ या आत्मचरित्रातील काही ओळींमधून श्रीगणेशा करण्यात आला आहे. ‘पूजनीय किर्लोस्करांमुळे मी सहजतेने बोलू शकतो, देवलांमुळे घरगुती रंग भरू शकतो, खाडिलकरांमुळे समर्थपणे शब्द उच्चारू शकतो.गडकऱ्यांमुळे शब्दांच्या जादूचा अनुभव येतो. एरव्हीच्या साध्या बोलण्यातूनही काही प्रगल्भ शब्दांचा सहजच वापर होतो. महान नाटककारांचे शब्द बोलल्यामुळे या लेखकांची भाषा, महान दिग्दर्शकांनी आमच्याकडून घोकून घेतल्यामुळे उच्चार कधी स्पष्ट झाले हे कळलेच नाही.४नाटक करता करता शब्दांच्या भांडारात मुक्तपणे हिंडून श्रीमंत झालो,’ अशा जयराम शिलेदार यांच्या भावना त्यांच्याच शब्दांत मांडण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या