शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

कारागृह प्रशासनाचा मोठा निर्णय! कैद्यांना वडापावपासून पुरणपोळीपर्यंतचा आस्वाद घेता येणार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 21:43 IST

कैद्यांना वडापावपासून पुरणपोळीपर्यंतचा आस्वाद घेता येणे शक्य होणार

पुणे : राज्यातील कारागृहांमध्ये सध्या ३६ हजारांपर्यंत कैद्यांची संख्या आहे. कोरोनाकाळात पोलिसांकडून कैद्यांची सर्वतोपरी काळजी घेतली. मास्क, सॅनिटायजर यांच्या वापराबाबत जनजागृती करतानाच लसीकरणाची मोहीम देखील राबविली आहे. आता पोलिसांनी  राज्यातील कारागृहांतील कैद्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. कैद्यांना वडापावपासून पुरणपोळीपर्यंतचा आस्वाद घेता येणे शक्य होणार आहे. कारागृह प्रशासनचा हा निर्णय कैद्यांना दिलासा आणि समाधान देणारा ठरणार आहे. 

अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कारागृहात असणाऱ्या कैद्यांना त्यांचे नातेवाईक भेटायला येत असतात. येतेवेळी त्यांच्यासाठी अनेक वस्तू आणतात. पण सध्या मुलाखतीचा कार्यक्रम बंद आहे.त्यामुळे कैद्यांना सण उत्सवांसह इतर दिवशी मिळणाऱ्या गोडधोड पदार्थ व जीवनावश्यक वस्तूंना मुकावे लागत होते. मात्र, आता कारागृह प्रशासनाने कैद्यांसाठी कारागृहातील कँटींनमध्ये सर्व प्रकारचे विविध खाद्यपदार्थ, दैनंदिन जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिले आहेत.

कैदी दरमहा साडेचार हजार रुपये खर्च करू शकतात. आता कॅन्टीनमध्ये कैद्यांना वडापाव, पनीर, जिलेबी, पेढे, शिरा, खीर, श्रीखंड, पेठा, बर्फी यांच्यासह अगदी गाईच्या तुपापासून अगदी पुरणपोळीपर्यंत असे सर्व प्रकारचे पदार्थ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 

एमपीएसमार्फत कारागृह अधिकाऱ्यांची भरती व्हावीकारागृहातील अधिकाऱ्यांची भरती ही स्वतंत्रपणे मुलाखतीद्वारे केली जाते. त्याऐवजी स्पर्धा परिक्षांद्वारे कारागृह अधिकाऱ्यांची भरती व्हावी, ज्यायोगे अधिक चांगले अधिकारी मिळतील, असा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे. त्याचबरोबर पोलीस दलातील अतिवरिष्ठ अधिकारी उपमहानिरीक्षक पदासाठी प्रतिनियुक्तीवर कारागृह प्रशासनात पाठविले जातात. पण इतर पदांसाठी पोलीस दलातील अधिकार्यांची नियुक्ती राज्यात होत नाही. अन्य राज्यात अशा नियुक्त्या केल्या जातात. आपल्याकडे त्या केल्या जाव्यात. सध्या रक्षकांची भरती पोलिसांबरोबर केली जाते. त्याचप्रमाणे पोलीस उपनिरीक्षकांप्रमाणे उपअधीक्षक, जेलर यांची भरती केली जावी, असा प्रस्ताव राज्य शासनाला दिला असल्याचे सुनिल रामानंद यांनी सांगितले.

पोलिसांप्रमाणे कारागृह रक्षकांना मिळावे संरक्षण कोणतीही एखादी घटना घडली व बळाचा वापर करावा लागला तर त्यात पोलिसांना कलम १९७ प्रमाणे सरंक्षण दिले आहे. मात्र, असे सरंक्षण कारागृहातील रक्षक, जेलर यांना मिळत नाही. त्यांच्यावर थेट खटला दाखल होतो. पोलिसांप्रमाणे कारागृह रक्षकांनाही सरंक्षण मिळावे, असे शासनाला सुचविण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेPrisonतुरुंगjailतुरुंगPoliceपोलिसfoodअन्नcorona virusकोरोना वायरस बातम्या