शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

राज्यातील ४२ लाख सातबारे झाले डिजिटल स्वाक्षरीयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 17:21 IST

शेतकऱ्यांना सात-बारा उतारा मिळणे सोयीचे जावे या साठी सरकारने १ मे पासून डिजिटल सातबारा उतारा देण्याची घोषणा केली होती. मात्र, जून आणि जुलै महिन्यात तांत्रिक अडचणीमुळे राज्यातील सर्व्हर ठप्प पडले होते.

ठळक मुद्देतिढा सर्व्हरचा : दहा दिवसांत पावणेतीन लाख सातबारा उताऱ्यांवर कामराज्यातील १० लाख नागरिकांनी या डिजिटल सेवेचा फायदा राज्यात १८ जुलै पर्यंत १ लाख ४१ हजार डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा वितरीत

पुणे : शेतकऱ्यांना सात-बारा उतारा मिळणे सोयीचे व्हावे या साठी सुरु केलेल्या डिजिटल मोहीमेअंतर्गत राज्यातील अडीच कोटी सातबारा उताऱ्यांपैकी तब्बल ४२ लाख सात-बारा उतारे डिजिटल स्वाक्षरीयुक्त झाले आहेत. डिजिटल सातबाराचे बंद पडलेले सर्व्हर पुन्हा सुरु झाले असून, गेल्या दहा दिवसांत पावणेतीन लाख सात-बारा उताºयांवर डिजिटल स्वाक्षरी झाली आहे. शेतकऱ्यांना सात-बारा उतारा मिळणे सोयीचे जावे या साठी सरकारने १ मे पासून डिजिटल सातबारा उतारा देण्याची घोषणा केली होती. मात्र, जून आणि जुलै महिन्यात तांत्रिक अडचणीमुळे राज्यातील सर्व्हर ठप्प पडले होते. त्यामुळे जवळपास पावणेदोन महिने राज्यातील विविध भागातील सात-बारा उताऱ्याची कामे ठप्प पडली होती. राज्यातील औरंगाबाद, नांदेड, नंदुरबार, लातूर आणि परभणी येथील सर्व्हर १९ जुलै रोजी सुरु झाले. या जिल्ह्यात सर्वात शेवटी सर्व्हरचे काम सुरु झाले. त्यानंतर वेगाने सात-बारा उताऱ्याचे काम सुरु करण्यात आले. राज्यात १८ जुलै पर्यंत १ लाख ४१ हजार डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा वितरीत करण्यात आले होते. त्यानंतर ३० जुलै अखेरीस ती संख्या ४ लाख १३ हजार १७२ झाली. म्हणजेच २ लाख ७२ हजार १७२ डिजिटल सातबारा उतारा त्या नंतरच्या अवघ्या दहा दिवसांतच वितरीत झाले.  सध्या राज्यातील १९ जिल्हे मुंबईतील स्टेट डाटा सेंटरशी जोडलेले असून, ८ जिल्हे बीएसएनएल क्लाऊड, ६ जिल्हे पुण्यातील एनआयसी आणि २ जिल्हे स्थानिक सर्व्हरशी जोडण्यात आले आहेत. प्रत्येक विभाग निहाय सर्व्हर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हे काम झाल्यानंतर डिजिटल स्वाक्षरीचे काम सुरु होईल.  राज्यातील १० लाख नागरिकांनी या डिजिटल सेवेचा फायदा घेतला आहे. राज्यातील अडीच कोटी सात-बारा उतारा आॅनलाईन उपलब्ध आहे. सध्या डिजिटल स्वाक्षरी देण्याचे काम थांबविलेले आहे. आॅनलाईन सात-बारा उताऱ्याची प्रत काढून, त्यावर तलाठ्याची स्वाक्षरी घ्यावी लागत आहे. असा उतारा ग्राह्य धरण्यात येत असल्याची माहिती ई फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी दिली. ------------------जिल्ह्यातील दीड लाख सातबारा उताऱ्यांवर डिजिटल स्वाक्षरीजिल्ह्यात १५ लाख सातबारा उतारे असून, त्यातील मावळ, मुळशी, दौंड, बारामती, इंदापूर आणि भोर तालुक्यातील दीड लाख सातबारा उताºयांवर डिजिटल स्वाक्षरी झालेले आहे. हवेली तालुक्यात सव्वा दोन लाख सातबारा उतारा आहेत. या तालुक्यातील १६० गावांपैकी १२० गावांचे काम सुरु आहे. 

टॅग्स :PuneपुणेonlineऑनलाइनFarmerशेतकरीGovernmentसरकारMaharashtraमहाराष्ट्र