शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

"राज्य सरकारने वार्षिक उत्पन्न १ लाख असणाऱ्या मध्यमवर्गीयांनाही धान्य योजनेत सहभागी करून घ्यावे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 13:18 IST

धान्य मिळवण्यासाठी उत्पन्न मर्यादा एक लाख रुपये करा, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची मागणी

ठळक मुद्देसर्वाधिक फटका दारिद्र्य रेषेखाली उत्पन्न असणार्‍या नागरिकांबरोबरच मध्यमवर्गातील नागरिकांना बसला आहे.

पुणे: शासनाने हातावर पोट असलेल्या नागरिकांना धान्य मिळण्यासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा ५९ हजार रुपये ठेवली आहे. त्यामध्ये मध्यमवर्गीयांना सामावून घेत ज्यांचे वार्षिक उत्पन्न वाढवून १ लाख रुपये आहे. अशा नागरिकांनाही धान्य मिळण्याच्या योजनेचा लाभ द्यावा. अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लॉकडाउन करण्यात आले होते. त्यामुळे समाजातील सर्वच घटकांची आर्थिक स्थिती ढासळली आहे. त्याचा सर्वाधिक फटका दारिद्र्य रेषेखाली उत्पन्न असणार्‍या नागरिकांबरोबरच मध्यमवर्गातील नागरिकांना बसला आहे. विशेषतः बारा बलुतेदार, हातावर पोट असणारे नागरिक, रोजंदारी करणारे, रिक्षाचालक, स्कूल बस चालक, सलून व्यावसायिक, पथारीवाले, हातगाडीवाले, बांधकाम कामगार, मोलमजुरी करणारे आदी समाज घटकांचा त्यात समावेश आहे.

अशा समाज घटकांना दिलासा देण्यासाठी अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या वतीने वितरीत केले जाणारे धान्य उपलब्ध करून देण्याची गरज आहे. सध्या वार्षिक उत्पन्न ५९ हजार रुपये असणार्‍या नागरिकांना या योजनेअंतर्गत धान्य मिळते. मात्र सध्याची आपत्कालिन स्थिती लक्षात घेता राज्य शासनाने या योजनेसाठीची उत्पन्न मर्यादा वाढवून ती १ लाख रुपये करावी अशी मागणी मुळीक यांनी या पत्राद्वारे केली आहे.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाjagdish mulikजगदीश मुळीकMaharashtraमहाराष्ट्र