शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

Gopichand Padalkar: हे पांढऱ्या पायाचं सरकार; यांच्यामुळेच कोरोना, वादळ, अतिवृष्टी आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 17:28 IST

फुटात बारा इंचाचा घोळ असणारे आताचे महाराष्ट्राचे सरकार आहे

पुणे : महाविकास आघाडी सरकारची (Mahavikas Aghadi) विकासकामे तसेच आर्यन खान (Aryan khan) प्रकरणावरून भाजप नेत्यांकडून टीका होऊ लागली आहे. हे सरकार राज्यातील संकटे सूर करण्यास असफल ठरत असल्याचा आरोपही विरोधी पक्षांकडून होत आहे. भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी सुद्धा पुण्यात एका कार्यक्रमात महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. हे पांढऱ्या पायाचं सरकार आहे. यांच्यामुळेच कोरोना, अतिवृष्टी, वादळ आले असल्याची टीका पडळकर यांनी केली आहे. 

यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, रणजित सिंह मोहिते पाटील, आमदार राहुल कुल, भाजपच्या महिला जिल्हा अध्यक्ष कांचन कूल आदी उपस्थित होते.

पडळकर म्हणाले, ''फुटात बारा इंचाचा घोळ असणारे आताचे महाराष्ट्राचे सरकार आहे. या सरकारमध्ये एक प्रवक्ता उठतो आणि गांजावाल्याची बाजू मांडतो. हे असलं सरकार म्हणजे पांढऱ्या पायाचे सरकार असून यांच्यामुळे कोरोना आला, दोन वेळा वादळ आलं, दोन वेळा अतिवृष्टी आली असे म्हणत पडळकर यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.'' 

अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविषयी बोलताना पडळकर म्हणाले, सरकार मधील काही लोक सहकारी साखर कारखाने आजारी पाडून खरेदी करत आहेत. पुणे जिल्ह्यातील पाणी प्रश्न पवारांना सोडवता आला नाही. तर राज्याचे प्रश्न काय सोडवणार अशी टीका त्यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे.''

हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) म्हणाले, अनैसर्गिक सरकार असून तीन पक्षाचे सरकार कायमस्वरूपी राहणार नाही. तसेच पुढील काळात दौंड आणि इंदापूरच्या पाणी प्रश्नासाठी कायम आग्रही राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेGopichand Padalkarगोपीचंद पडळकरBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीharshvardhan patilहर्षवर्धन पाटील