शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

Gopichand Padalkar: हे पांढऱ्या पायाचं सरकार; यांच्यामुळेच कोरोना, वादळ, अतिवृष्टी आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 17:28 IST

फुटात बारा इंचाचा घोळ असणारे आताचे महाराष्ट्राचे सरकार आहे

पुणे : महाविकास आघाडी सरकारची (Mahavikas Aghadi) विकासकामे तसेच आर्यन खान (Aryan khan) प्रकरणावरून भाजप नेत्यांकडून टीका होऊ लागली आहे. हे सरकार राज्यातील संकटे सूर करण्यास असफल ठरत असल्याचा आरोपही विरोधी पक्षांकडून होत आहे. भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी सुद्धा पुण्यात एका कार्यक्रमात महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. हे पांढऱ्या पायाचं सरकार आहे. यांच्यामुळेच कोरोना, अतिवृष्टी, वादळ आले असल्याची टीका पडळकर यांनी केली आहे. 

यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, रणजित सिंह मोहिते पाटील, आमदार राहुल कुल, भाजपच्या महिला जिल्हा अध्यक्ष कांचन कूल आदी उपस्थित होते.

पडळकर म्हणाले, ''फुटात बारा इंचाचा घोळ असणारे आताचे महाराष्ट्राचे सरकार आहे. या सरकारमध्ये एक प्रवक्ता उठतो आणि गांजावाल्याची बाजू मांडतो. हे असलं सरकार म्हणजे पांढऱ्या पायाचे सरकार असून यांच्यामुळे कोरोना आला, दोन वेळा वादळ आलं, दोन वेळा अतिवृष्टी आली असे म्हणत पडळकर यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.'' 

अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविषयी बोलताना पडळकर म्हणाले, सरकार मधील काही लोक सहकारी साखर कारखाने आजारी पाडून खरेदी करत आहेत. पुणे जिल्ह्यातील पाणी प्रश्न पवारांना सोडवता आला नाही. तर राज्याचे प्रश्न काय सोडवणार अशी टीका त्यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे.''

हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) म्हणाले, अनैसर्गिक सरकार असून तीन पक्षाचे सरकार कायमस्वरूपी राहणार नाही. तसेच पुढील काळात दौंड आणि इंदापूरच्या पाणी प्रश्नासाठी कायम आग्रही राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेGopichand Padalkarगोपीचंद पडळकरBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीharshvardhan patilहर्षवर्धन पाटील