शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

भामा-आसखेडमधून विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:47 IST

१ हजार ६५३ क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात

आसखेड : भामा-आसखेड धरणातून शनिवारी (दि. २०) पाणी सोडण्याचा आदेश होता; परंतु कित्येक वर्षांपासून धरणग्रस्तांचे पुनर्वसन, तसेच काही प्रश्न रखडल्याने आधी आमचे प्रश्न सोडवा, त्यानंतरच पाणी सोडू देऊ, अशी भूमिका धरणग्रस्तांनी घेतली होती. शासनाने शुक्रवारपर्यंत निर्णय घेत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर ३१ तारखेपर्यंत प्रश्न सोडविले जातील, या जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर शनिवारी सकाळी १०.२० वाजता ११०० क्युसेक्सने व १२.२० वाजता १ हजार ६५३ क्युसेक्सने पोलीस बंदोबस्तात आसखेड धरणातून पाणी सोडण्यात आले, अशी माहिती शाखा अभियंता भारत बेंद्रे यांनी दिली.सध्या आसखेड धरणात १०० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी सुमारे १ हजार २९२ मिलिमीटर पाऊस पडल्यामुळे विहिरी-नाले समाधानकारक भरलेली होती. परंतु यंदा फक्त ७७५ मिलिमीटरच पाऊस झाला. त्यामुळे समोर येऊन ठेपलेल्या दुष्काळामुळे पाण्याचे नियोजन करणे हे धरण प्रशासनापुढील महत्त्वाचे आव्हान आहे. रब्बी हंगामातील पहिले आवर्तन २० आॅक्टोबरला सोडणे अपेक्षित होते. परंतु धरणग्रस्तांच्या कित्येक वर्षीच्या प्रलंबित प्रश्नामुळे त्यांनी केलेल्या विरोधामुळे ६ दिवस पाणी सोडण्यास उशीर झाला. त्यामुळे खेड, शिरूर, दौंडला वरदान ठरत असलेले भामा-आसखेडच्या पाण्याने यंदा शेतकºयांच्या पिकांना अडचणीत आणले.धरणाची पाणी साठवणक्षमता ८.१४ टीएमसी एवढी आहे. धरणात सध्या १०० टक्के पाणीसाठा आहे. पाण्याची पातळी ६७१.५० मीटर आहे. धरणात २३०.६४७ दलघमी व उपयुक्त पाणीसाठा २१७.१२५ दलघमी आहे. वेळोवेळी या धरणातून सोडण्यात येणाºया पाण्यामुळे खेड तालुक्यासह शिरूर, दौंड तालुक्यातील नदीकाठच्या गावांना आणि विविध गावच्या पाणी योजनांना होतो. त्याबरोबर नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे पूर्णपणे भरले जातात. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या पाण्याचा फायदा खेडसह शिरूर व दौंड या तीन तालुक्यांना होणार आहे. त्यामुळे हे धरण तीनही तालुक्यांतील शेतकरी व नागरिकांना कायमच वरदान ठरले आहे, तर नदीकाठाजवळपासच्या गावांची तहान भागली आहे.शनिवारी सोडण्यात आलेले पाणी आलेगावपागापर्यंत पोहोचेल, अशा बेताने सोडण्यात येणार आहे. धरणग्रस्तांच्या आंदोलनामुळे लांबणीवर पडलेले आवर्तन सुमारे ३० ते ३५ पोलीस कर्मचाºयांच्या बंदोबस्तात सोडण्यात आले. सुरुवातीला ११०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले. जिल्हाधिकाºयांच्या आश्वासनानंतरही दक्षता म्हणून धरण प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात पाणी सोडले.यावेळी धरण प्रशासनाचे कार्यकारी अभियंता बी. के. शेटे, पोलीस निरीक्षक सुनील पवार, पं. स. सदस्य चांगदेव शिवेकर, उपविभागीय अधिकारी एस. आर. शर्मा, शाखा अभियंता भारत बेंद्रे आदींसह पोलीस यंत्रणा, ग्रामस्थ, नागरिक व धरण प्रशासनाचे कर्मचारी उपस्थित होते. परंतु जिल्हाधिकाºयांच्या सूचनेचे पालन करीत प्रकल्पग्रस्त (बाधित शेतकरी) धरणाकडे विरोध करण्यास फिरकले नाही.

टॅग्स :DamधरणWaterपाणी