शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
3
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
4
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
5
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
6
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
7
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
8
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
9
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
10
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
11
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
12
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
13
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
14
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
15
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
16
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
17
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
18
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
19
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
20
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  

भामा-आसखेडमधून विसर्ग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:47 IST

१ हजार ६५३ क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरुवात

आसखेड : भामा-आसखेड धरणातून शनिवारी (दि. २०) पाणी सोडण्याचा आदेश होता; परंतु कित्येक वर्षांपासून धरणग्रस्तांचे पुनर्वसन, तसेच काही प्रश्न रखडल्याने आधी आमचे प्रश्न सोडवा, त्यानंतरच पाणी सोडू देऊ, अशी भूमिका धरणग्रस्तांनी घेतली होती. शासनाने शुक्रवारपर्यंत निर्णय घेत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर ३१ तारखेपर्यंत प्रश्न सोडविले जातील, या जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर शनिवारी सकाळी १०.२० वाजता ११०० क्युसेक्सने व १२.२० वाजता १ हजार ६५३ क्युसेक्सने पोलीस बंदोबस्तात आसखेड धरणातून पाणी सोडण्यात आले, अशी माहिती शाखा अभियंता भारत बेंद्रे यांनी दिली.सध्या आसखेड धरणात १०० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी सुमारे १ हजार २९२ मिलिमीटर पाऊस पडल्यामुळे विहिरी-नाले समाधानकारक भरलेली होती. परंतु यंदा फक्त ७७५ मिलिमीटरच पाऊस झाला. त्यामुळे समोर येऊन ठेपलेल्या दुष्काळामुळे पाण्याचे नियोजन करणे हे धरण प्रशासनापुढील महत्त्वाचे आव्हान आहे. रब्बी हंगामातील पहिले आवर्तन २० आॅक्टोबरला सोडणे अपेक्षित होते. परंतु धरणग्रस्तांच्या कित्येक वर्षीच्या प्रलंबित प्रश्नामुळे त्यांनी केलेल्या विरोधामुळे ६ दिवस पाणी सोडण्यास उशीर झाला. त्यामुळे खेड, शिरूर, दौंडला वरदान ठरत असलेले भामा-आसखेडच्या पाण्याने यंदा शेतकºयांच्या पिकांना अडचणीत आणले.धरणाची पाणी साठवणक्षमता ८.१४ टीएमसी एवढी आहे. धरणात सध्या १०० टक्के पाणीसाठा आहे. पाण्याची पातळी ६७१.५० मीटर आहे. धरणात २३०.६४७ दलघमी व उपयुक्त पाणीसाठा २१७.१२५ दलघमी आहे. वेळोवेळी या धरणातून सोडण्यात येणाºया पाण्यामुळे खेड तालुक्यासह शिरूर, दौंड तालुक्यातील नदीकाठच्या गावांना आणि विविध गावच्या पाणी योजनांना होतो. त्याबरोबर नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे पूर्णपणे भरले जातात. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या पाण्याचा फायदा खेडसह शिरूर व दौंड या तीन तालुक्यांना होणार आहे. त्यामुळे हे धरण तीनही तालुक्यांतील शेतकरी व नागरिकांना कायमच वरदान ठरले आहे, तर नदीकाठाजवळपासच्या गावांची तहान भागली आहे.शनिवारी सोडण्यात आलेले पाणी आलेगावपागापर्यंत पोहोचेल, अशा बेताने सोडण्यात येणार आहे. धरणग्रस्तांच्या आंदोलनामुळे लांबणीवर पडलेले आवर्तन सुमारे ३० ते ३५ पोलीस कर्मचाºयांच्या बंदोबस्तात सोडण्यात आले. सुरुवातीला ११०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले. जिल्हाधिकाºयांच्या आश्वासनानंतरही दक्षता म्हणून धरण प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात पाणी सोडले.यावेळी धरण प्रशासनाचे कार्यकारी अभियंता बी. के. शेटे, पोलीस निरीक्षक सुनील पवार, पं. स. सदस्य चांगदेव शिवेकर, उपविभागीय अधिकारी एस. आर. शर्मा, शाखा अभियंता भारत बेंद्रे आदींसह पोलीस यंत्रणा, ग्रामस्थ, नागरिक व धरण प्रशासनाचे कर्मचारी उपस्थित होते. परंतु जिल्हाधिकाºयांच्या सूचनेचे पालन करीत प्रकल्पग्रस्त (बाधित शेतकरी) धरणाकडे विरोध करण्यास फिरकले नाही.

टॅग्स :DamधरणWaterपाणी