शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कळसमधील तलाठी कार्यालय दोन दिवसात सुरु करा, अन्यथा नागरिक करणार तीव्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 16:57 IST

कार्यालय दहा दिवसापासून बंद असल्याने नागरिक संतप्त

ठळक मुद्देविविध कामासाठी दूरवरुन पायपीट करुन येणाऱ्या ग्रामस्थांना नाहक मनस्ताप

कळस: कळस येथील तलाठी कार्यालय गेल्या दहा दिवसांपासून कुलुपबंदच आहे. कार्यालयातील तलाठी गावाकडे गेल्याने व पर्यायी तलाठी फिरकलेच नाहीत. त्यामुळे गावातील सर्व कारभार ठप्प झाला आहे. जमीन महसूल व्यवस्थेतील तलाठी महत्वाचा कर्मचारी आहे. मात्र कार्यालयच १० दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

कळस व रूई, बिरंगुडी, गोसावीवाडी, पिलेवाडी, मराडेवाडी, थोरातवाडी या सात महसुली गावांसाठी कळस याठिकाणी कार्यालय आहे. याठिकाणी नव्याने परजिल्ह्यातून आलेले तलाठी ११ एप्रिलला गावाकडे गेले. यांनी रजेचा अर्जही पाठवला आहे. त्यानंतर पर्यायी तलाठीही कार्यालयाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे नागरीकांचा विनाकारण वेळ जात आहे. आपल्या विविध कामासाठी दुरवरुन पायपीट करुन येणाऱ्या ग्रामस्थांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. दोन दिवसांत कार्यालय सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा करण्याचा इशारा नागरिकांनी यावेळी दिला आहे.

शासनाचा गाव पातळीवरील मूलभूत घटक म्हणून सरकारने तलाठी नियुक्त केले आहेत. नागरिकांची रहिवाशी व उत्पन्नाचे दाखले आणि सातबारा देणे व शिधापत्रिका देणे, फेरफार नोंदी करणे, जमीन महसूल गोळा करणे, वारसा प्रकरणांच्या नोंदी करणे, यांसारखी महत्वाची कामे या कार्यालयातून केली जातात नागरिकांना माहिती देण्यासाठी देखील येथे कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे हेलपाटे मारण्याशिवाय नागरिकांना पर्याय राहिलेला नाही. नागरिकांनी यावर तीव्र संताप व्यक्त करत दोन दिवसात कार्यालय सुरु करण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारDhanoriधानोरीSocialसामाजिक