शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

कळसमधील तलाठी कार्यालय दोन दिवसात सुरु करा, अन्यथा नागरिक करणार तीव्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 16:57 IST

कार्यालय दहा दिवसापासून बंद असल्याने नागरिक संतप्त

ठळक मुद्देविविध कामासाठी दूरवरुन पायपीट करुन येणाऱ्या ग्रामस्थांना नाहक मनस्ताप

कळस: कळस येथील तलाठी कार्यालय गेल्या दहा दिवसांपासून कुलुपबंदच आहे. कार्यालयातील तलाठी गावाकडे गेल्याने व पर्यायी तलाठी फिरकलेच नाहीत. त्यामुळे गावातील सर्व कारभार ठप्प झाला आहे. जमीन महसूल व्यवस्थेतील तलाठी महत्वाचा कर्मचारी आहे. मात्र कार्यालयच १० दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

कळस व रूई, बिरंगुडी, गोसावीवाडी, पिलेवाडी, मराडेवाडी, थोरातवाडी या सात महसुली गावांसाठी कळस याठिकाणी कार्यालय आहे. याठिकाणी नव्याने परजिल्ह्यातून आलेले तलाठी ११ एप्रिलला गावाकडे गेले. यांनी रजेचा अर्जही पाठवला आहे. त्यानंतर पर्यायी तलाठीही कार्यालयाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे नागरीकांचा विनाकारण वेळ जात आहे. आपल्या विविध कामासाठी दुरवरुन पायपीट करुन येणाऱ्या ग्रामस्थांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. दोन दिवसांत कार्यालय सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा करण्याचा इशारा नागरिकांनी यावेळी दिला आहे.

शासनाचा गाव पातळीवरील मूलभूत घटक म्हणून सरकारने तलाठी नियुक्त केले आहेत. नागरिकांची रहिवाशी व उत्पन्नाचे दाखले आणि सातबारा देणे व शिधापत्रिका देणे, फेरफार नोंदी करणे, जमीन महसूल गोळा करणे, वारसा प्रकरणांच्या नोंदी करणे, यांसारखी महत्वाची कामे या कार्यालयातून केली जातात नागरिकांना माहिती देण्यासाठी देखील येथे कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे हेलपाटे मारण्याशिवाय नागरिकांना पर्याय राहिलेला नाही. नागरिकांनी यावर तीव्र संताप व्यक्त करत दोन दिवसात कार्यालय सुरु करण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारDhanoriधानोरीSocialसामाजिक