शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसरात जड वाहनांना वेगमर्यादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 14:19 IST

नवले पुलाखाली भुयारी मार्ग आवश्यक......

पुणे : मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी आता सर्व प्रकारच्या जड वाहनांवर कात्रज बोगदा ते नवले पूलदरम्यान ४० किमी वेगमर्यादा आणली आहे. याबाबत वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी आदेश काढले आहेत. कात्रज बोगदा ते नवले पूल या दरम्यान वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या जड, अवजड (ट्रॅक्टर-ट्रेलर, ट्रक-टेलर, अर्टिक्युलेटेड व्हेईकल्स, मल्टी ॲक्सल वाहने, कंटेनर, मोठ्या आकाराची मालाची वाहतूक करणारे वाहने) वाहनांकरिता ताशी ४० किमी वेगमर्यादा निश्चित करण्यात येत आहे, असे आदेशात म्हटले आहे.

नवले पुलाजवळ होणारे सतत अपघात, सेवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी, अपूर्ण सेवा रस्ते, त्यामुळे होणारी अपघातांची मालिका, यामध्ये निष्पाप नागरिकांचे जाणारे बळी यावर ठोस उपाययोजना करण्यासंदर्भात ''लोकमत''ने वारंवार पाठपुरावा केला. पुणे-सातारा महामार्गावरील नऱ्हे येथे वाढत्या अपघातांची संख्या ही एक तीव्र समस्या बनली आहे. तसेच कात्रज चौकाजवळ दोन भुयारी मार्ग करणे गरजेचे असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये लोकसभेत सांगितले. याला उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, पुणे-सातारा महामार्गावरील अपघातांची समस्या गंभीर आहे, हे खरे आहे. या महामार्गावर चार पूल होत आहेत. यामध्ये येणाऱ्या २५ दिवसांत एक पूल तयार होईल. बाकीचे तीन पूल हे जूनपर्यंत तयार होतील. हे चार पूल तयार झाल्यानंतर ही समस्या कमी होईल. तसेच सर्व कामे लवकर पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रशासन याकडे लक्ष देत असून, येत्या सहा महिन्यांत ही सर्व कामे पूर्ण होतील, असे गडकरी यांनी सांगितले होते. मात्र, २१ महिन्यानंतरही अद्याप येथील कामे पूर्ण झाली नाहीत.

नवले पुलाखाली भुयारी मार्ग आवश्यक...

वडगाव बुद्रुक, नऱ्हे गावाच्या हद्दीतून जाणारा राष्ट्रीय महामार्गाचा रस्ता जांभूळवाडी बोगद्यामार्गे मुंबई - बंगळुरू असा आहे. गेल्या २५ वर्षांपासून शेकडो लोकांचे बळी नवले पूल, कात्रज रस्ता, नऱ्हे येथील महामार्गावर गेले आहेत. गेल्या दोन महिन्यांत या परिसरात मोठ्या अपघातांचे सत्र सुरू असून, असंख्य निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत. सध्या रोज नवले पुलाखाली वाहतूक कोंडी होत असून, याठिकाणी एक भुयारी मार्ग करणे गरजेचे असल्याचे मत माजी नगरसेवक हरिदास चरवड यांनी ''लोकमत''शी बोलताना व्यक्त केले.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडsatara-acसातारा