शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसरात जड वाहनांना वेगमर्यादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 14:19 IST

नवले पुलाखाली भुयारी मार्ग आवश्यक......

पुणे : मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी आता सर्व प्रकारच्या जड वाहनांवर कात्रज बोगदा ते नवले पूलदरम्यान ४० किमी वेगमर्यादा आणली आहे. याबाबत वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी आदेश काढले आहेत. कात्रज बोगदा ते नवले पूल या दरम्यान वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या जड, अवजड (ट्रॅक्टर-ट्रेलर, ट्रक-टेलर, अर्टिक्युलेटेड व्हेईकल्स, मल्टी ॲक्सल वाहने, कंटेनर, मोठ्या आकाराची मालाची वाहतूक करणारे वाहने) वाहनांकरिता ताशी ४० किमी वेगमर्यादा निश्चित करण्यात येत आहे, असे आदेशात म्हटले आहे.

नवले पुलाजवळ होणारे सतत अपघात, सेवा रस्त्यावरील वाहतूक कोंडी, अपूर्ण सेवा रस्ते, त्यामुळे होणारी अपघातांची मालिका, यामध्ये निष्पाप नागरिकांचे जाणारे बळी यावर ठोस उपाययोजना करण्यासंदर्भात ''लोकमत''ने वारंवार पाठपुरावा केला. पुणे-सातारा महामार्गावरील नऱ्हे येथे वाढत्या अपघातांची संख्या ही एक तीव्र समस्या बनली आहे. तसेच कात्रज चौकाजवळ दोन भुयारी मार्ग करणे गरजेचे असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये लोकसभेत सांगितले. याला उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, पुणे-सातारा महामार्गावरील अपघातांची समस्या गंभीर आहे, हे खरे आहे. या महामार्गावर चार पूल होत आहेत. यामध्ये येणाऱ्या २५ दिवसांत एक पूल तयार होईल. बाकीचे तीन पूल हे जूनपर्यंत तयार होतील. हे चार पूल तयार झाल्यानंतर ही समस्या कमी होईल. तसेच सर्व कामे लवकर पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रशासन याकडे लक्ष देत असून, येत्या सहा महिन्यांत ही सर्व कामे पूर्ण होतील, असे गडकरी यांनी सांगितले होते. मात्र, २१ महिन्यानंतरही अद्याप येथील कामे पूर्ण झाली नाहीत.

नवले पुलाखाली भुयारी मार्ग आवश्यक...

वडगाव बुद्रुक, नऱ्हे गावाच्या हद्दीतून जाणारा राष्ट्रीय महामार्गाचा रस्ता जांभूळवाडी बोगद्यामार्गे मुंबई - बंगळुरू असा आहे. गेल्या २५ वर्षांपासून शेकडो लोकांचे बळी नवले पूल, कात्रज रस्ता, नऱ्हे येथील महामार्गावर गेले आहेत. गेल्या दोन महिन्यांत या परिसरात मोठ्या अपघातांचे सत्र सुरू असून, असंख्य निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत. सध्या रोज नवले पुलाखाली वाहतूक कोंडी होत असून, याठिकाणी एक भुयारी मार्ग करणे गरजेचे असल्याचे मत माजी नगरसेवक हरिदास चरवड यांनी ''लोकमत''शी बोलताना व्यक्त केले.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडsatara-acसातारा