शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बियाण्याचा पुढल्या वर्षी तुटवडा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सोयाबीन पेरण्यांसाठी पुढच्या हंगामात बियाण्याची कमतरता भासणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले यंदाचे सोयाबीनचे उत्पादन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सोयाबीन पेरण्यांसाठी पुढच्या हंगामात बियाण्याची कमतरता भासणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले यंदाचे सोयाबीनचे उत्पादन जपून ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

राज्यातील सोयाबीनचे क्षेत्र ४१ लाख हेक्टर आहे. त्यातल्या अर्ध्या क्षेत्राला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. बियाण्यासाठी खास राखीव ठेवलेल्या प्रक्षेत्रांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यामुळे पुढील वर्षीच्या हंगामात बियाण्याची कमतरता भासेल. त्यामुे यंदाचे उत्पादन पुढच्या वर्षीच्या सोयाबीन पेरणीसाठी जपून ठेवणे फायद्याचे ठरेल, असे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले.

सोयाबीनचे चांगल्या वाणाचे बी एकदा पेरले की सलग २ वर्षे त्याच प्रतीचे पीक येते. एका हेक्टरला साधारण १ क्विंटल बियाणे लागते. राज्याच्या संपूर्ण क्षेत्राचा विचार करता १७३ लाख क्विंटल बियाण्याची गरज आहे. इतके बियाणे थेट बाजारपेठेतून ऐनवेळी उपलब्ध होणार नाही. त्यामुळे आहे ते बियाणे चढ्या भावाने खरेदी करावे लागेल. शेतकऱ्यांनीच यावर उपाय म्हणून यंदाच्या सोयाबीन उत्पादनातील काही टक्के उत्पादन बियाण्यासाठी राखीव ठेवावे, असे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

उन्हाळी हंगामात बियाण्यासाठी म्हणून सोयाबीनची लागवड करावी. खरीप हंगामात त्याचा उपयोग होईल, असेही सुचवण्यात आले आहे. जिल्हा कृषी अधिक्षक ज्ञानेश्वर बोटे यांनी सांगितले की, सोयाबीनचे बाह्य आवरण पातळ असते. त्यामुळे पोत्यात बी ठेवताना काळजी घ्यावी. त्याला बुरशी लागणार नाही याची दक्षता घ्यावी. आपल्या क्षेत्रानुसार बियाणे शिल्लक ठेवल्यास खर्चात बचत होईल.