शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात काही घटक जाणीवपूर्वक मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण निर्माण करताहेत - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 17:38 IST

दोन्ही घटकांना एकत्र घेऊन राज्य सरकारने सामंजस्याचे वातावरण निर्माण करायला हवे, त्यासाठी मोहीम आखल्यास आमच्यासारखे अनेक लोक याला साथ देतील

पुणे : राज्यात काही घटक जाणीवपूर्वक मराठा विरुद्ध ओबीसी असे वातावरण निर्माण करत आहेत. त्यातून काही प्रश्न उपस्थित करत आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करणे, समाजांमधील कटुता कमी करून सामंजस्य निर्माण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. यासाठी दोन्ही घटकांना एकत्र घेऊन राज्य सरकारने सामंजस्याचे वातावरण निर्माण करायला हवे. त्यासाठी मोहीम आखल्यास आमच्यासारखे अनेक लोक याला साथ देतील. आम्हाला महाराष्ट्र एकत्र ठेवायचा आहे. ही ऐक्याची वीण दुबळी होता कामा नये, हे राज्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.

पवार मंगळवारी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते. ते म्हणाले, ‘या प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. यात राज्य सरकार काही हालचाल करत असल्याचे दिसत आहे, मात्र प्रत्यक्षात त्याची कृती कधी होईल हे स्थिती पाहूनच सांगता येईल. आज या समाजांमधील कटुता कमी करणे, सामंजस्य निर्माण करणे गरजेचे आहे. हे घटक गावात एकत्र कसे राहतील याची काळजी घेणे आवश्यक आहे. राज्य सरकारने यासाठी दोन समित्या केल्या आहेत. एका समितीत मंत्रिमंडळातील मराठा समाजातील मंत्री आहेत, तर दुसऱ्या समितीत ओबीसी नेतृत्व करणारे घटक आहेत. या दोघांचे प्रश्न वेगळे आहेत. पण आज कटुता कमी करायची असेल, सामंजस्य निर्माण करायचे असेल तर या दोघांना एकत्र बसले पाहिजे. हे काम मुख्यमंत्र्यांनी करणे गरजेचे आहे. त्यात त्यांनी पुढाकार घेतल्यास आमच्यासारखे अनेक लोक साथ देतील. आम्हाला महाराष्ट्र एकत्र ठेवायचा आहे. ही ऐक्याचीची वीण दुबळी होता कामा नये. राज्याच्या दृष्टीने हे अत्यंत गरजेचे आहे.’

राज्य सरकारची बघ्याची भूमिका

प्रत्येक जातीच्या मागण्या वेगळ्या आहेत. त्यातून कटुता निर्माण होत आहे. आपल्याला गावात एकत्र राहायचे आहे. गावातील प्रश्न राजकारणी लोकांनी एकत्र बसून सोडवायचे आहेत. त्यासाठी एकमेकांविरोधात मोर्चे काढणे हा मार्ग नाही. दुर्दैवाने आज तेच होत आहे. यात राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचाही आरोप पवार यांनी यावेळी केला.

टीका आयोगावर, उत्तर भाजपकडून

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी केंद्रीय निवडणूक आयोग विरोधात अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. याबाबत पवार म्हणाले, ‘राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत. हीदेखील एक स्वतंत्र संवैधानिक संस्था आहे. या संस्थेने निर्माण केलेल्या प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाला देणे गरजेचे आहे. मात्र, राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला उत्तर आयोग न देता राज्याचे मुख्यमंत्री व त्यांचे सहकारी देत आहेत. यामुळे आयोगाविरोधात गैरविश्वास वाढीला लागत आहे. ही बाब चांगली नाही.’

आयोगाने नोंद घ्यावी

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने विशेष पुनरीक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यात अनेक मतदारसंघांमध्ये नावे वगळली जात असून, काही ठिकाणी वाढविली जात आहे. यामुळे आयोगाबाबत सामान्यांमध्ये गैरविश्वासाचे वातावरण तयार झाले असून, हे चुकीचे आहे. या विश्वासाला आजपर्यंत धक्का लागला नाही. आता मात्र, असे होत आहे. त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत याची नोंद आयोगाने घेणे अत्यंत गरजेचे आहे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणPoliticsराजकारण