शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

राज्यातील समाज कल्याणचे कर्मचारी आंदोलन करणार; तीन महिन्यापासून वेतन नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 22:02 IST

ऑक्टोबर महिन्यापासून कर्मचा-यांना वेतन न दिल्याने त्यांची दिवाळीही अंधारातच गेली. त्यामुळे समाज कल्याणचे कर्मचारी आंदोलनाच्या पवित्रात आहेत

पुणे : एसटी कामगारानंतर आता राज्याच्या समाज कल्याण विभागांतर्गत कार्यरत असणारे सर्व कर्मचारी काही महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याने अस्वस्थ आहे. ऑक्टोबर महिन्यापासून कर्मचा-यांना वेतन न दिल्याने त्यांची दिवाळीही अंधारातच गेली. त्यामुळे समाज कल्याणचे कर्मचारी आंदोलनाच्या पवित्रात आहेत,असे सूत्रांनी सांगितले.

समाज कल्याण विभागाचे शासकीय वसतिगृह, निवासी शाळा तसेच विभागात कार्यरत असणारे शिक्षक व लिपीक संवर्गातील कर्मचारी तसेच विधी अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, संगणक ऑपरेटर या संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन वेळेवर केले जात नाही. राज्याचे समाजकल्याण मंत्री व आयुक्त यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे शेकडो कर्मचा-यांची दिवाळी देखील अंधारातच गेली. कर्मचा-यांचे वेतन कधीच वेळेवर होत नसल्याने कर्मचा-यांनी आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाह कसा? चालवायचा असा सवाल उपस्थित केला जात आहे.

समाज कल्याण विभागाचे आयुक्त एकीकडे सांगतात कर्मचा-यांचे वेतन वेळेवर करा तसे परिपत्रक निर्गमित करतात मात्र त्यांच्या कार्यालयातूनच निधी राज्यभरात क्षेत्रीय कार्यालयांना वेळेवर वितरित केली जात नाही, ही बाब संगणकीय प्रणालीमुळे कर्मचारी यांच्या निदर्शनास आली आहे. परिणामी दोन- तीन महिन्याचे वेतन थकित राहते. त्यामुळे कर्मचा-यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. पगारसाठी कर्मचा-यावर सामाजिक न्याय विभागात अन्याय होत असेल, तर न्याय तरी  कोणाकडे  मागायचा? असा प्रश्न कर्मचा-यांकडून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारMONEYपैसाSocialसामाजिक