शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक उद्रेक कोण रोखेल? डॉ. गणेश देवी यांचा सवाल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 04:22 IST

तरुण पिढीच्या शिक्षणाची आणि रोजगाराची व्यवस्था नसल्याने उद्विग्नतेतून होणारा सामाजिक उद्रेक कोण रोखेल, असा सवाल ज्येष्ठ भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी यांनी उपस्थित केला.

पुणे : देशातील शिक्षणव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. शिक्षणमंत्र्याकडेच पदवी नसेल, तर राज्याच्या शिक्षणाचे भविष्य अंधकारमय आहे. महाराष्ट्रातील विद्यापीठांची वीण घट्ट करण्यासाठी नियंत्रणात्मक नियमावली असावी. राज्याची शैक्षणिक, वैचारिक प्रगतिशीलता प्रवाही नसेल तर वाटचाल स्थिर होईल. तरुण पिढीच्या शिक्षणाची आणि रोजगाराची व्यवस्था नसल्याने उद्विग्नतेतून होणारा सामाजिक उद्रेक कोण रोखेल, असा सवाल ज्येष्ठ भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी यांनी उपस्थित केला.महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे कविवर्य नारायण सुर्वे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नारायण सुर्वे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल पाटील यांना नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. एस. एम. जोशी सभागृहात डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते आणि भारत सरकारच्या परराष्ट्र खात्याचे संचालक अतुल गोतसुर्वे यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला.कवी सुधाकर गायधनी (साहित्य पुरस्कार), ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य (भला माणूस पुरस्कार), अखिल भारतीय नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर (सांस्कृतिक सेवा पुरस्कार), संस्कृती प्रकाशनाच्या संचालक सुनीताराजे पवार (स्नेहबंध पुरस्कार), युवा लेखक नितीन शिंदे (सनद पुरस्कार) आदी मान्यवरांना या वेळी गौरवण्यात आले. या वेळी बाळासाहेब बाणखेले आणि डॉ. आशुतोष गाडेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.देवी म्हणाले, ‘‘कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केल्यानंतर महात्मा गांधींनी दोन वर्षांनी गुजरात विद्यापीठ सुरू केले. या दोघांनीही दूरदृष्टीने शिक्षणव्यवस्थेचा विचार केला. समाजाचा विविध अंगांनी विचार करून त्याप्रमाणे तरुण पिढीचे उज्ज्वल भवितव्य घडवता आले, तरच शैक्षणिक संस्था उपयुक्त ठरू शकतात. कारण, ज्ञान आणि शिक्षण हा व्यवहार नाही.’’ते पुढे म्हणाले, ‘‘कविवर्य नारायण सुर्वे हे ‘उंच लेखक’ होते, तरीदेखील मराठी साहित्यातील समीक्षकांना सुर्वे उमगलेच नाही. सुर्वेंच्या साहित्याची अपेक्षित समीक्षा झालीच नाही. त्यांची कविता प्रचारकी थाटाची नव्हती. त्यांच्या लेखनातून विचार करून कृती करण्याची प्रेरणा मिळते. व्याकुळ करणारी वेदना आणि आयुष्याची हमी देणारी आशा त्यांच्या कवितेत सापडते. सध्या अभिव्यक्तीला स्वातंत्र्य गमावण्याची वेळ आली आहे. अशा काळात स्त्रिया अभिव्यक्त होणार असतील, तर त्यावर कदापि गदा आणता येणार नाही. साहित्यिकांत प्रश्न विचारण्याचे धाडस निर्माण व्हायला हवे.’’सचिन ईटकर यांनी प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.आजच्या काळात कवींपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कवी कोणत्याही एका प्रदेशाचा नसतो, तर तो पृथ्वीचा असतो. पृथ्वीचा परम लाडका मित्र, प्रतिसृष्टीचा फकीर आणि अभाग्यांचा मित्र असतो. कविता भोगायची नसते, तर ती अनुभवायची असते. कवीचे प्रेषिताशी नाते जोडलेले असते. कविता रसिकाच्या मनातून मिळालेल्या प्रतिसादावर मोठी होत असते. आजकाल कलमी कवितांचे पेव फुटले आहे. मात्र, एकचित्त करते तीच खरी कविता असते.- सुधाकर गायधनीरयत शिक्षण संस्थेशी नारायण सुर्वे यांचे अदृश्य नाते होते. संस्थेतर्फे दुष्काळग्रस्त भागातील ४२ आत्महत्याग्रस्त मुलांची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. शिक्षणाची नाळ तूटू न देता काळानुसार पद्धत बदलली पाहिजे. काळाप्रमाणे विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठित शिक्षण मिळणे आवश्यक आहे. त्यांनी नुसते शिकून चालणार नाही, त्यातून कौशल्य निर्माण व्हायला हवे. जाती-धर्मापलीकडे जाऊन शिक्षण लोकाभिमुख झाले पाहिजे आणि गुणवत्तेवर आधारित रोजगार मिळावा.- अनिल पाटील

टॅग्स :Puneपुणे