शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

सामाजिक उद्रेक कोण रोखेल? डॉ. गणेश देवी यांचा सवाल  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 04:22 IST

तरुण पिढीच्या शिक्षणाची आणि रोजगाराची व्यवस्था नसल्याने उद्विग्नतेतून होणारा सामाजिक उद्रेक कोण रोखेल, असा सवाल ज्येष्ठ भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी यांनी उपस्थित केला.

पुणे : देशातील शिक्षणव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. शिक्षणमंत्र्याकडेच पदवी नसेल, तर राज्याच्या शिक्षणाचे भविष्य अंधकारमय आहे. महाराष्ट्रातील विद्यापीठांची वीण घट्ट करण्यासाठी नियंत्रणात्मक नियमावली असावी. राज्याची शैक्षणिक, वैचारिक प्रगतिशीलता प्रवाही नसेल तर वाटचाल स्थिर होईल. तरुण पिढीच्या शिक्षणाची आणि रोजगाराची व्यवस्था नसल्याने उद्विग्नतेतून होणारा सामाजिक उद्रेक कोण रोखेल, असा सवाल ज्येष्ठ भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी यांनी उपस्थित केला.महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे कविवर्य नारायण सुर्वे यांच्या स्मृतिदिनानिमित्त नारायण सुर्वे पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल पाटील यांना नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. एस. एम. जोशी सभागृहात डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते आणि भारत सरकारच्या परराष्ट्र खात्याचे संचालक अतुल गोतसुर्वे यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला.कवी सुधाकर गायधनी (साहित्य पुरस्कार), ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वैद्य (भला माणूस पुरस्कार), अखिल भारतीय नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर (सांस्कृतिक सेवा पुरस्कार), संस्कृती प्रकाशनाच्या संचालक सुनीताराजे पवार (स्नेहबंध पुरस्कार), युवा लेखक नितीन शिंदे (सनद पुरस्कार) आदी मान्यवरांना या वेळी गौरवण्यात आले. या वेळी बाळासाहेब बाणखेले आणि डॉ. आशुतोष गाडेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.देवी म्हणाले, ‘‘कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केल्यानंतर महात्मा गांधींनी दोन वर्षांनी गुजरात विद्यापीठ सुरू केले. या दोघांनीही दूरदृष्टीने शिक्षणव्यवस्थेचा विचार केला. समाजाचा विविध अंगांनी विचार करून त्याप्रमाणे तरुण पिढीचे उज्ज्वल भवितव्य घडवता आले, तरच शैक्षणिक संस्था उपयुक्त ठरू शकतात. कारण, ज्ञान आणि शिक्षण हा व्यवहार नाही.’’ते पुढे म्हणाले, ‘‘कविवर्य नारायण सुर्वे हे ‘उंच लेखक’ होते, तरीदेखील मराठी साहित्यातील समीक्षकांना सुर्वे उमगलेच नाही. सुर्वेंच्या साहित्याची अपेक्षित समीक्षा झालीच नाही. त्यांची कविता प्रचारकी थाटाची नव्हती. त्यांच्या लेखनातून विचार करून कृती करण्याची प्रेरणा मिळते. व्याकुळ करणारी वेदना आणि आयुष्याची हमी देणारी आशा त्यांच्या कवितेत सापडते. सध्या अभिव्यक्तीला स्वातंत्र्य गमावण्याची वेळ आली आहे. अशा काळात स्त्रिया अभिव्यक्त होणार असतील, तर त्यावर कदापि गदा आणता येणार नाही. साहित्यिकांत प्रश्न विचारण्याचे धाडस निर्माण व्हायला हवे.’’सचिन ईटकर यांनी प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.आजच्या काळात कवींपुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कवी कोणत्याही एका प्रदेशाचा नसतो, तर तो पृथ्वीचा असतो. पृथ्वीचा परम लाडका मित्र, प्रतिसृष्टीचा फकीर आणि अभाग्यांचा मित्र असतो. कविता भोगायची नसते, तर ती अनुभवायची असते. कवीचे प्रेषिताशी नाते जोडलेले असते. कविता रसिकाच्या मनातून मिळालेल्या प्रतिसादावर मोठी होत असते. आजकाल कलमी कवितांचे पेव फुटले आहे. मात्र, एकचित्त करते तीच खरी कविता असते.- सुधाकर गायधनीरयत शिक्षण संस्थेशी नारायण सुर्वे यांचे अदृश्य नाते होते. संस्थेतर्फे दुष्काळग्रस्त भागातील ४२ आत्महत्याग्रस्त मुलांची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. शिक्षणाची नाळ तूटू न देता काळानुसार पद्धत बदलली पाहिजे. काळाप्रमाणे विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठित शिक्षण मिळणे आवश्यक आहे. त्यांनी नुसते शिकून चालणार नाही, त्यातून कौशल्य निर्माण व्हायला हवे. जाती-धर्मापलीकडे जाऊन शिक्षण लोकाभिमुख झाले पाहिजे आणि गुणवत्तेवर आधारित रोजगार मिळावा.- अनिल पाटील

टॅग्स :Puneपुणे