शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
6
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
7
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
8
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
9
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
10
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
11
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
12
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
13
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
14
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
15
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
16
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
17
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
18
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
19
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
20
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...

...म्हणून मायबाप सरकार दंडात्मक कारवाई थांबवा: बारामतीतील भाजप नेत्याचं मुख्यमंत्र्यांना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 17:47 IST

इथे प्रत्येक माणूस भीतीच्या वातावरणात आहे .कोणीच विनाकारण घराबाहेर पडत नाही ,किंबहुना प्रत्येकाला आपल्या व आपल्या नातेवाईकांच्या जिवाची काळजी आहे..

ठळक मुद्देदंडाच्या रकमेतुन ग्रामीण भागात कोरोना चाचण्या सुरु करा 

बारामती : सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाऊनमुळे आज माणूस अन्नाला देखील महाग झाला आहे .तो दंड कूठून भरणार ? माय बाप सरकार इथे प्रत्येक माणूस भीतीच्या वातावरणात आहे .कोणीच विनाकारण घराबाहेर पडत नाही ,किंबहुना प्रत्येकाला आपल्या व आपल्या नातेवाईकांच्या जिवाची चिंता आहे. तरी दंडात्मक कारवाई तातडीने थांबवावी. दोन वर्षात दंडाच्या पावत्यामधून जमा केलेल्या रकमेमधून ग्रामीण भागातील प्रत्येक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी सूरू करावी,अशा शब्दात भाजपचे भटक्या विमुक्त आघाडीचे सरचिटणीस गजानन वाकसे यांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे.

याबाबत गजानन वाकसे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. कोरोना तपासणी व दंडात्मक कारवाई बद्दल राज्यात सुरू असलेला कोरोना महामारीचा संसर्ग यामुळे सामान्य जणता घाबरली आहे. व्यापारी, तथा लघू उद्योजक, तसेच घरातील रूग्णांनमुळे बाहेर पडणारा सामान्य नागरिक हा गेले वर्षभर कमी जास्त प्रमाणात सुरू असलेल्या लॉकडाउन मुळे पुर्णपणे आर्थिक अडचणीत आलेला आहे.

आता संसर्ग वाढत असून रूग्णसंख्या वाढली आहे.या काळात व्यापारी, शेतमाल विक्रेते यांची कोरोना तपासणी बंधनकारक करण्यात आलेली आहे.निर्णय चांगला आहे परंतू लाखो लोकसंख्या असलेल्या ठिकाणी एक तपासणी केंद्र आहे .त्यामुळे तेथे तपासणी करता लोक जमल्यास गर्दी होत असून तपासणी साठी आलेल्या बरयाच लोकांना वारंवार तपासणी न करता परत जावे लागत आहे. यामुळे लोक तपासणी ला टाळाटाळ करत आहेत. अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिक, तसेच महत्वाच्या कामासाठी इच्छा नसतानाही घराबाहेर पडलेलले लोक हे बॅकेचे हप्ते,जागाभाडे, लाईट बिल, दवाखान्याचा खर्च यामुळे मेटाकुटीला आले असताना दुसरीकडे त्याची आवक बंद झाली आहे .तरी देखील आपल्या आदेशाने यांच्या वर सर्रास दंडात्मक कारवाई केली जात आहे.आरोग्य केंद्र नसेल त्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. काही कारणास्तव  विना मास्क बाहेर पडणाऱ्यांना रस्त्यावर मोफत मास्क देण्याची सोय करावी.या पत्राद्वारे आम्ही आपणास महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सध्याच्या परिस्थितीत निर्माण होत असल्याने अडचणींनवर तातडीने मार्ग काढण्यासाठी विनंती करीत आहे. दम्याचा त्रास असणारा मास्क मध्ये गुदमरतोय .तरी तो घरा बाहेर का पडतोय ? हे सगळं आपूलकीने जाणून घेण्याची गरज आहे .त्याची कारणे नक्कीच डोळे पाणावणारी आहे.मुख्यमंत्रीसाहेब या पत्राचा राजकारण म्हणून विचार न होता सहानभूतीने विचार करावा,अशी मागणी वाकसे यांनी केली आहे.————————————————

टॅग्स :Baramatiबारामतीcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकारPoliceपोलिसUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा