शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

..म्हणून परमबीर सिंग यांनाच सहआरोपी करुन चौकशी करा: माजी आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 17:03 IST

आताच्या घडीला गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला तर चुकीचा संदेश जनतेत जाईल...

पुणे : परमबीर सिंग यांनी कोणतेही पुरावे न देता पत्रात १०९ कोटींचा उल्लेख केला आहे. या प्रकाराची कल्पना होती तर त्यांनी त्यावेळेस कारवाई का केली नाही ? असा सवाल विचारत खंडणीखोरीला पाठीशी घालणाराच सहआरोपी असतो. त्यांनाच सहआरोपी करुन चौकशी करा, अशी भूमिका माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडेंनी घेतली आहे. दरम्यान गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतल्यास वाईट संदेश जाईल असंही ते म्हणाले. 

एखाद्या राजकीय पुढाऱ्याने लिहावे असे पत्र परमबीर सिंग यांनी लिहिले आहे. सहआरोपी म्हणून त्यांच्यावर खटला भरावा इतक्या चुकीचे पद्धतीने लिहिलेले पत्र आहे. तो सिंह यांच्या विरोधातील पुरावा होऊ शकतो. त्यामुळे गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्यापेक्षा परमबीर सिंग यांची सखोल चौकशी व्हावी. असे ते म्हणाले.

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रावरून राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. भाजपाकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकमतशी संवाद साधताना ते बोलत होते. खोपडे पुढे म्हणाले, “पत्रात अस लिहिलंय की, स्वतःच्या हद्दीत असणाऱ्या पोलीस सहकाऱ्याला पैसे गोळा करण्याचे आदेश दिले जातात. रेस्टॉरंट पैसे गोळा करणे हा गुन्हा आहे. असे चुकीच्या पद्धतीने लिहिण्याची अपेक्षा आयपीएस अधिकाऱ्याकडून नाही. “

शंभर कोटींच्या मुद्द्याबाबत विचारले असता ते ,” महाराष्ट्रात कोणीही अधिकारी, ऑफिसर धुतल्या तांदळासारखा नाही. सिंग यांच्या पत्रात १०० कोटींचा उल्लेख केलाय त्यावर विश्वास ठेवू नये. वाझे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याचे कृत्य आणि बेजबाबदार सिंह यांचे पत्र म्हणजे महाराष्ट्र पोलीस नव्हे. महाराष्ट्रात २० हजारपेक्षा जास्त पोलीस निरीक्षक, ३५० पेक्षा जास्त आयपीएस तर ७ लाख पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आहेत. त्या दोघांचे कार्य आणि बाकी सर्व पोलिसांचे कार्य अशा दोन बाजू बघितल्या. तर पोलिसांची प्रतिमा मलिन झाली असे अजिबात म्हणता येणार नाही. अशा प्रकारची सकारात्मक बाजू पोलिसांच्या वतीने त्यांनी मांडली. राजकीय नेत्यांवर निशाणा साधताना खोपडेंनी परमबीर यांनी हे पत्र राजकीय हेतूनेच लिहिले असावे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

खोपडे म्हणाले, महाराष्ट्रातील आयपीएस अधिकारी स्वार्थी असतात. असे स्पष्ट करणारी सिंह यांची भूमिका वाटते. त्यांच्या वागण्यातून महाराष्ट्र पोलिसांचा कमकुवतपणा दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे शासनाला अशा आयपीएस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबाबत विचार करावा लागेल. 

सिंग यांची वर्तणूक ठीक नसल्याचा आरोप करत खोपडे म्हणाले,”परमबीर सिंग या व्यक्तीने १४३ अधिकाऱ्यांचे करिअर बरबाद केले आहे. अशा व्यक्तीवर विश्वास ठेवून कारवाई केली. आणि लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारमध्ये फेरफार केले. तर हा लोकशाहीचा पराभव ठरेल. तसेच ही कारवाई करून मंत्र्याचा राजीनामा घेतला तर वाईट संदेश जनतेत पोहोचणार आहे. त्यामुळेच परमबीर सिंग यांच्या अर्जाची खोल चौकशी व्हावी, असेही यावेळी खोपडे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसParam Bir Singhपरम बीर सिंगState Governmentराज्य सरकारAnil Deshmukhअनिल देशमुख