शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघातप्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या बाळाची बालसुधारगृहात रवानगी
2
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
3
हरियाणामध्ये राहुल गांधींसमोरच उफाळला वाद,  काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची, त्यानंतर...
4
परभणीचाच नव्हे, जानकरांनी बीड-बारामतीचा निकालही सांगून टाकला; 'असा' आहे अंदाज
5
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
6
शाहरुख खानची तब्येत बिघडली, अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल; नक्की झालं काय?
7
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
8
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
9
अनुप्रिया पटेल, रामदास आठवलेंच्या राज भैयांवरील वक्तव्यांनी यूपीमध्ये भाजपाचं गणित बिघडवलं, होणार मोठं नुकसान? 
10
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
11
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
12
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
13
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
14
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
15
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
16
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
17
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
18
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
19
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक
20
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण

स्मार्ट सिटीत ‘स्मार्ट एन्व्हायर्न्मेंट’चे धोरण - संजय कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 1:20 AM

स्मार्ट सिटीच्या दिशेने पिंपरी-चिंचवड शहराची वाटचाल सुरू आहे. पायाभूत आणि मूलभूत सुविधांची रेलचेल असल्याने या शहराची स्मार्ट सिटीत गणना होऊ लागली आहे. स्मार्ट होताना पर्यावरण संवर्धनही महत्त्वाचे असते. स्मार्ट सिटीत ‘एन्व्हायर्न्मेंटही स्मार्ट’ असावे, या उद्देशाने प्रदूषण नियंत्रणाच्या विविध उपाययोजना करण्यासाठीचे धोरण तयार करण्यात येत आहे, अशी माहिती महापालिका पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितली.

पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वेळोवेळी विविध उपाययोजना करणे अत्यावश्यक असते. आरोग्य विभागामार्फत अनेक वर्षे शहरात घनकचरा व्यवस्थापनासह पर्यावरणाशी संबंधित प्रकल्पांची कामे केली जात होती. शास्त्रोक्त पद्धतीने काम व्हावे, या उद्देशाने २०१० मध्ये पर्यावरण अभियांत्रिकी विभाग कार्यरत झाला. या विभागाच्या माध्यमातून सध्या स्मार्ट सिटीत, स्मार्ट एन्व्हायर्न्मेंट असा उद्देश ठेवून काम केले जात आहे.शहरातून रोज ८०० टन कचऱ्याची निर्मिती होते. शहराच्या विविध भागांतून मोशीतील डेपोवर कचरा जमा होतो. मेकॅनिकल कम्पोस्टिंग प्लँटची प्रतिदिन ५०० टन कचºयावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. ३० टन प्रतिदिन गांडूळखत निर्मितीची क्षमता असलेला प्लँट तेथे कार्यरत आहे. प्लॅस्टिकपासून इंधन निर्मितीचा प्रतिदिन ५ टन कचºयावर प्रक्रिया करण्याचा प्लँट कार्यरत आहे. मोठ्या प्रमाणावर जमा होणाºया कचºयावर प्रक्रिया करण्याची मोशी कचरा डेपोची क्षमता आता राहिलेली नाही. त्यामुळे क्षेत्रीय स्तरावर त्या-त्या भागात कचºयाची विल्हेवाट लावण्याचे प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. नागरिकांनी त्यांच्या सोसायट्यांमध्ये कचºयाचे वर्गीकरण करावे, याबाबत जनजागृती केली जात आहे. शहरात रोज २९० दशलक्ष लिटर (एमएलडी) सांडपाणी तयार होते. ९ ठिकाणी असलेल्या १३ मैलासांडपाणी केंद्रांची मिळून अंदाजे ३३३ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. प्रत्यक्षात प्रतिदिनी २६० ते २५० मैलासांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. आणखी काही सांडपाणी प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. शहराच्या विविध भागांतील नाल्यांवाटे मैलापाणी थेट नद्यांमध्ये मिसळते. औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून बाहेर पडणारे रसायनमिश्रित पाणीसुद्धा थेट नद्यांना मिळते. त्यामुळे पवना, मुळा, इंद्रायणी या नद्या प्रदूषित झाल्या आहेत.नदी प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आणखी उपाययोजना आखल्या जात आहेत. बांधकाम साहित्याचा राडारोडा टाकल्याने नद्यांचे पात्र उथळ झाले होते. उन्हाळ्यात नद्या कोरड्या न दिसता, पाण्याची डबकी दिसून येतात. हे दूषित पाण्याचे साठे मानवी आरोग्याला बाधा पोहोचवितात. मैला सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याने पाण्याचे साठे दूषित झाले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मैला सांडपाणी थेट नदीत मिसळून नद्यांचे प्रदूषण वाढू नये, याकरिता महापालिकेने ‘नदी सुधार’ प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. त्याचा प्रकल्प अहवाल, कृती आराखडा तयार करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. या नदी सुधार प्रकल्पांतर्गत नदीच्या दुतर्फा मोठ्या व्यासाच्या जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. नदीच्या दोन्ही बाजूंनी येणारे सांडपाणी थेट नदीत न मिसळता, दोन्ही बाजूच्या जलवाहिन्यांमध्ये जमा केले जाईल. पुढे हे मैलासांडपाणी जवळच्या केंद्रावर प्रक्रियेसाठी नेले जाईल. प्रक्रियेनंतर ते नदीत सोडले जाईल. अशा स्वरूपाची नवीन योजना अमलात आणण्याचे प्रस्तावित आहे.शहरातील मोजक्या नामांकित कंपन्यांचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आहेत. छोट्या कारखान्यांसाठी मध्यवर्ती सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. हवा प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना केल्या जात आहेत. हवा प्रदूषण नियंत्रणासाठी प्रायोगिक तत्त्वावर यंत्रणा बसविण्यात आली आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वायू प्रदूषणात भर पडत आहे. महापालिकेने रिक्षांना सीएनजी किट बसविण्यासाठी प्रत्येकी १२ हजारांचे अनुदान दिले आहे. उद्यान विभागामार्फत वृक्षलागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यामागे स्मार्ट सिटीत स्मार्ट एन्व्हायर्न्मेंटचा उद्देश आहे.

टॅग्स :environmentवातावरणnewsबातम्या