शहरं
Join us  
Trending Stories
1
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
2
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
3
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
4
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
5
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
6
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
7
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
8
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
9
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
10
विमानाचं उडणं, उतरणं... एका श्वासाचं अंतर!
11
५९ देश, ६१ भाषांतील ३१४ चित्रपटांची मेजवानी
12
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
13
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
14
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
15
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
16
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
17
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
18
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
19
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
20
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...

अनुप्रिया पटेल, रामदास आठवलेंच्या राज भैयांवरील वक्तव्यांनी यूपीमध्ये भाजपाचं गणित बिघडवलं, होणार मोठं नुकसान? 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 6:01 PM

Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: अनुप्रिया पटेल आणि रामदास आठवले यांनी कुंडा येथील आमदार राजा भैया यांच्याबाबत केलेल्या विधानांमुळे भाजपासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

भाजपासाठी लोकसभेमध्ये बहुमत मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये अद्याप २७ मतदारसंघातील मतदान बाकी आहे. अशा परिस्थिती २०१४ मधील कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपाला या २७ जागा महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे भाजपाचे वरिष्ठ नेते एनडीएच्या बाहेर असलेल्या नेत्यांसोबतही चर्चा करून समिकरणं जुळवण्याचा प्रयत्न आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपाकडून कुंडा येथील आमदार आणि जनसत्ता दल लोकतांत्रिकचे प्रमुख राजा भैय्या यांना आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र अनुप्रिया पटेल आणि रामदास आठवले यांनी केलेल्या विधानांमुळे भाजपासमोरील अडचणी वाढल्या आहेत. उत्तर प्रदेशमधील ज्या २७ मतदारसंघातील मतदान बाकी आहे, त्या मतदारसंघांमध्ये क्षत्रिय मतदारांचं प्रमाण अधिक आहे. विशेषकरून प्रतापगड आणि जौनपूर या ठिकाणी ठाकूर मतदार निर्णायक भूमिकेत असतील, अशा परिस्थितीत अनुप्रिया पटेल आणि रामदास आठवलेंच्या विधानामुळे भाजपाने जुळवलेला खेळ बिघडल्याचे बोबले जात आहेत.

त्याचं झालं असं की, काही दिवसांपूर्वी कौशांबी येथे प्रचाररादम्यान, अपना दलच्या अध्यक्षा आणि केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी राजा भैया यांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार आरोप केले होते. लोकशाहीमध्ये राजा, राणी  पोटातून जन्माला येत नाही. तर आता राजा ईव्हीएमच्या बटणातून जन्माला येतो. स्वयंघोषित राजांना वाटतं की कुंडा ही त्यांची जहागीर आहे. त्यांचा भ्रम मोडून काढण्याची ही तुमच्याकडे सुवर्णसंधी आहे, असं विधान अनुप्रिया पटेल यांनी केलं होतं.

दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वाराणसीमध्ये बोलताना अनुप्रिया पटेल यांचं विधान योग्य असल्याचे म्हटले आहे. रामदास आठवले म्हणाले की, राजा भैय्याची पार्श्वभूमी संपूर्ण उत्तर प्रदेशला माहिती आहे. काही गुंड लोकांना मतंही मिळतात. लोकांना घाबरवून दिशाभूल करून मतं मिळवतात. असे लोक निवडूनही येतात. मात्र मतं मिळाल्याने कुणी राजा बनू शकत नाही. तो केवळ नाामधारी राजा असू शकतो, अनुप्रिया पटेल जे काही बोलल्या आहेत, ते योग्य बोलल्या आहेत.

दरम्यान, या सर्वावर पलटवार करताना राजा भैया म्हणाले होते की, आता राजा किंवा राणी जन्माला येणं बंद झालं आहे. ईव्हीएममधून राजा जन्माला येत नाही तर जनसेवक जन्माला येतो. जनतेचा प्रतिनिधी जन्माला येतो. तसेच जर ईव्हीएममधून जन्माला जेणारे स्वत:ला राजा म्हणू लागले तर लोकशाहीच्या मूळ भावनेचा पराभव होईल. जनता त्यांची सेवा करण्यासाठी, त्या भागाचा विकास करण्यासाठी ईव्हीएमचं बटण दाबून तुम्हाला ही संधी देते. राजेशाही तर कधीच संपली आहे. काही कुंठीत लोक अशा प्रकारची विधानं करतात, असा टोला राजा भैया यांनी लगावला.  

टॅग्स :Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४pratapgarh-pcप्रतापगढRamdas Athawaleरामदास आठवलेBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४