शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

मावळमधील जाधववाडी धरणात सहा जण बुडाले : तीन व्यक्तींचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 18:33 IST

उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त नातेवाईकाकडे फिरायला आलेल्या  तिघांचा मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली आहे .यात उर्वरित तीन बचावले असून त्यांना  एनडीआरएफ कॅम्पमधील जवानांनी वाचवल्याचे समजते. 

पुणे :उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त नातेवाईकाकडे फिरायला आलेल्या  तिघांचा मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली आहे .यात उर्वरित तीन बचावले असून त्यांना  एनडीआरएफ कॅम्पमधील जवानांनी वाचवल्याचे समजते. 

याबाबत अधिक माहिती अशी की,प्रशील  अमोल आढाव  (वय ७ वर्षे) , अनिल  कोंडींबा कोळसे (वय ५८) , प्रितेश  रघुनाथ आगळे (वय ३२ ) तिघेही रा.घाटकोपर  मुंबई अशी मृतांची नावे आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार. खबर देणाऱ्या स्वप्नील दादासाहेब गायकवाड यांच्या घरी आलेले हे पाहुणे उन्हाळ्याच्या सुट्टी निमित्त नवलाख उंब्रे गावच्या हद्दीतील  जाधववाडी धरणावर फिरण्यासाठी गेले होते. त्यातील काहीजण धरणाच्या पाण्यात उतरले. त्यात अचानक अनिल कोंडींबा कोळसे यांचा पाय घसरला. त्यावेळी त्यांनी  मागे उभे असलेल्या दादासाहेब पोपट गायकवाड, प्रशिल अमोल आढाव यांना पकडले. आणि  ते दोघेही पाण्यात पडले .त्यांना  वाचविण्यासाठी प्रितेश रघुनाथ आगळे यांनीही पाण्यात उडी मारली. त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरलेल्या संगीता दादासाहेब गायकवाड व उत्कर्ष दादा गायकवाडही बुडू लागल्याने नातेवाईकांनी  आरडाओरड केली.तो आवाज शेजारी असलेल्या एनडीआरएफ कॅम्पमधील जवानांनी ऐकला. त्यांनी तात्काळ पाण्यात उडी घेत तिघांचे प्राण वाचवले मात्र उर्वरित तिघांना तळेगाव येथील जनरल हाॅस्पीटलमध्ये नेले असता त्यापूर्वीच मृत झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेdrowningपाण्यात बुडणेmavalमावळDeathमृत्यू