शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

मावळमधील जाधववाडी धरणात सहा जण बुडाले : तीन व्यक्तींचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 18:33 IST

उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त नातेवाईकाकडे फिरायला आलेल्या  तिघांचा मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली आहे .यात उर्वरित तीन बचावले असून त्यांना  एनडीआरएफ कॅम्पमधील जवानांनी वाचवल्याचे समजते. 

पुणे :उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त नातेवाईकाकडे फिरायला आलेल्या  तिघांचा मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली आहे .यात उर्वरित तीन बचावले असून त्यांना  एनडीआरएफ कॅम्पमधील जवानांनी वाचवल्याचे समजते. 

याबाबत अधिक माहिती अशी की,प्रशील  अमोल आढाव  (वय ७ वर्षे) , अनिल  कोंडींबा कोळसे (वय ५८) , प्रितेश  रघुनाथ आगळे (वय ३२ ) तिघेही रा.घाटकोपर  मुंबई अशी मृतांची नावे आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार. खबर देणाऱ्या स्वप्नील दादासाहेब गायकवाड यांच्या घरी आलेले हे पाहुणे उन्हाळ्याच्या सुट्टी निमित्त नवलाख उंब्रे गावच्या हद्दीतील  जाधववाडी धरणावर फिरण्यासाठी गेले होते. त्यातील काहीजण धरणाच्या पाण्यात उतरले. त्यात अचानक अनिल कोंडींबा कोळसे यांचा पाय घसरला. त्यावेळी त्यांनी  मागे उभे असलेल्या दादासाहेब पोपट गायकवाड, प्रशिल अमोल आढाव यांना पकडले. आणि  ते दोघेही पाण्यात पडले .त्यांना  वाचविण्यासाठी प्रितेश रघुनाथ आगळे यांनीही पाण्यात उडी मारली. त्यांना वाचविण्यासाठी पाण्यात उतरलेल्या संगीता दादासाहेब गायकवाड व उत्कर्ष दादा गायकवाडही बुडू लागल्याने नातेवाईकांनी  आरडाओरड केली.तो आवाज शेजारी असलेल्या एनडीआरएफ कॅम्पमधील जवानांनी ऐकला. त्यांनी तात्काळ पाण्यात उडी घेत तिघांचे प्राण वाचवले मात्र उर्वरित तिघांना तळेगाव येथील जनरल हाॅस्पीटलमध्ये नेले असता त्यापूर्वीच मृत झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेdrowningपाण्यात बुडणेmavalमावळDeathमृत्यू