शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सहा महिन्यांत संपले १६.४७ टीएमसी पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 02:03 IST

पाणी बचत करण्याची गरज : ९.७७ टीएमसी शिल्लक; कपात होण्याची शक्यता

पुणे : पुणे महानगरपालिका व परिसर आणि जिल्ह्यातील काही ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील तब्बल १६.४७ टीएमसी एवढा पाणीसाठा गेल्या सहा महिन्यांत संपला आहे. धरण प्रकल्पात सध्या केवळ ९.७७ टीएमसी एवढाच पाणीसाठा शिल्लक असून, त्याचा वापर पुढील साडेतीन महिने करावा लागणार आहे. त्यामुळे पुढील काळात पुणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पावसाने पाठ फि रविल्यामुळे पुणे जिल्ह्याला भीषण दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट चित्र आॅक्टोबर महिन्यातच दिसू लागले होते. त्यामुळे पुणे शहर व जिल्ह्यातील काही ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील पाण्याचा वापर सर्वांनी जपून करणे अपेक्षित होते; मात्र ३० आॅक्टोबर २०१८ पासून ३१ मार्च २०१९ या सहा महिन्यांत धरणातील तब्बल १६.५० टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला. त्यातील काही पाणी ग्रामीण भागाला शेतीला सोडण्यात आले, तर उर्वरित पाणी पुणे महापालिकेकडून उचलण्यात आले. त्यामुळे धरणातील पाणीपातळीच चांगलीच खालवली असून, उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येणार आहे.गेल्या काही महिन्यात पाणी वापरावरून पुणे महापालिका व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये चांगलाच वाद झाला. पुढे हा वाद महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे गेला. प्राधिकरणाने पालिकेला नियमानुसार पाणी वापरण्याचे आदेश दिले; मात्र प्राधिकरणाने आदेश देऊनही पालिका नियमानुसार पाण्याचा वापर करत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे जलसंपदा विभागाने पालिकेला अनेकवेळ जपून पाणी वापरण्याचे लेखी पत्र पाठवले; परंतु, पालिकेवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. पालिकेकडून अधिकाधिक ११५० एमएलडी पाणी वापरावे, असा प्रस्ताव जलसंपदाने ठेवला होता; मात्र पालिका १३५० एमएलडी व त्यापेक्षा जास्त पाण्याचा वापर करत आहे.पालिकेकडून पाण्याचा वापर कमी करण्याबाबत हालचाली होत नाहीत आणि जलसंपदा विभाग पालिकेला थांबविण्यात असमर्थ ठरत आहे. त्यामुळेच काही शेतकºयांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली; मात्र काही कारणास्तव याचिकेवर सुनावणी होऊ शकली नाही. दरम्यानच्या काळात कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यात आली; परंतु या बैठकीस पालिकेच्या अधिकाºयांनी दांडी मारली. त्यामुळे जलसंपदा विभागाचे अधिकारी हतबल झाल्याचे दिसून येत आहे.पाण्याचा वापर काटकसरीने केला नाही, तर उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे, असे जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांकडून सांगितलेजात आहे.खडकवासला धरण प्रकल्पातील६ महिन्यांची पाणीसाठ्याची आकडेवारीदिनांक पाणीसाठा३१ मार्च २०१९ ९.७७२८ फेब्रुवारी २०१९ ११.६८३१ जानेवारी २०१९ १४.७१,३१ डिसेंबर २०१८ १७.७८३० नोव्हेंबर २०१८ २०.५८३० आॅक्टोबर २०१८ २६.२३बाष्पीभवनामुळे घटणारपाणीपातळीखडकवासला धरण प्रकल्पात सध्या ९.७७टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक असला, तरी जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांच्याअंदाजानुसार १५ जुलैपर्यंत १.३९ टीएमसी एवढ्या पाणीसाठ्याचे बाष्पीभवन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या ९.७७ टीएमसी पाणीसाठा दिसून येत असला, तरी पिण्यासाठी व शेतीसाठी केवळ ८.३८ टीएमसी एवढेच पाणी वापरण्यासाठी मिळणार आहे.भीमा खोºयातील धरणांमधील पाणीसाठाधरण टक्केवारीतपिंपळगाव जोगे ६.६८माणिकडोह ९.९१येडगाव ११.१०वडज ९.३६डिंभे १९.७०घोड ०.००विसापूर १.०५कळमोडी २१.४७चासकमान १७.६७भामा आसखेड २९.१८वडीवळे ५५.१२आंद्रा ६७.५४पवना ३९.७६धरण टक्केवारीतकासारसाई ४१.१६मुळशी ३१.२३टेमघर ०.००वरसगाव ३२.०४पानशेत ४३.४९खडकवासला ५१.९९गुंजवणी ३३.२६नीरा देवधर २४.८२भाटघर ३७.७९वीर ५०.३०नाझरे ०.०उजनी (उणे ) - १८.७६

टॅग्स :PuneपुणेDamधरण