शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

जुन्नरमधील सहा मंडलांचा दुष्काळग्रस्त भागात समावेश, आमदार सोनवणे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 00:54 IST

महाराष्ट्र सरकारच्या दुष्काळी पाहणी समितीने दुष्काळापासून वंचित ठेवलेल्या जुन्नर तालुक्याला दिलासा मिळाला असून राज्य शासनाने राज्यातील १५१ तालुके व २६८ मंडळे दुष्काळी म्हणून जाहीर केली आहे.

नारायणगाव - महाराष्ट्र सरकारच्या दुष्काळी पाहणी समितीने दुष्काळापासून वंचित ठेवलेल्या जुन्नर तालुक्याला दिलासा मिळाला असून राज्य शासनाने राज्यातील १५१ तालुके व २६८ मंडळे दुष्काळी म्हणून जाहीर केली आहे. त्यामध्ये जुन्नर तालुक्यातील ६ मंडळे दुष्काळग्रस्त भाग म्हणून घोषित केली आहेत. तर तालुक्यातील आदिवासी भाग असलेल्या पट्यातील मुख्य पीक असलेल्या भात शेतीचे पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे. भात शेतीला नुकसान भरपाई लवकरच देण्यात येईल अशी माहिती जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी दिली .राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या पहिल्या टप्यात १५१ तालुक्यांमध्ये जुन्नर तालुक्याचे नाव नसल्याने तालुक्यात तीव्र नाराजी व्यक्त झाली होती. जुन्नर तालुका दुष्काळी घोषित होण्यासाठी आमदार शरद सोनवणे यांनी मंत्रालयात पाठपुरावा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तालुक्यातील पावसाची परिस्थिती व पडलेला दुष्काळ याची सविस्तर माहिती देऊन दुष्काळ ग्रस्त जाहीर करण्याची मागणी केली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांना तालुक्यातील परिस्थितीची माहिती दिली. महाराष्ट्र सरकारची दुष्काळी पाहणी समितीने दुष्काळापासून वंचित राहिलेल्या तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचीव बाबींची शहानिशा करून या समितीने जुन्नर, नारायणगाव, बेल्हे, निमगावसावा, ओतूर व वडगाव या ६ मंडळांमध्ये दुष्काळ केला जाहीर केला आहे.केंद्र सरकारच्या ३ पद्धती मध्ये जे तालुके बसले ते तालुके दुष्काळी म्हणून जाहीर केले. अद्याप ज्या महसुली मंडळांमध्ये ७५० मी. ली. मीटर पेक्षा कमी पाऊस झालेले २६८ मंडल ६ नोव्हेंबर २०१८ ला शासनाने दुष्काळी म्हणून जाहीर केली. जे तालुके दुष्काळी म्हणून जाहीर झाले नाही. त्यांच्या संबधीत माहिती साठी व पुढील प्रकिया पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने समिती तयार करून दुष्काळ संदर्भात तक्रारी असतील किंवा तांत्रिक बाबीमुळे दुष्काळ जाहीर करण्याचे राहिले असेल तर त्या संबधी त्याची शहानिशा करून समिती त्या विभागाला दुष्काळी घोषित करणार होती. समितीकडे परिस्थिती व पावसाची टक्केवारी सविस्तर अहवाल सादर करून यशस्वीरित्या मांडली. समितीने अहवाल आधार घेत दुसºया टप्प्यात जुन्नर तालुक्यातील ६ मंडळे दुष्काळ भाग म्हणून जाहीर केले.९ पैकी तांबे, पाडळी, राजूर या ३ मंडळात ७५० मी. ली. मीटर पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. ही मंडळे धरण क्षेत्रात येत आल्याने ती निकषा प्रमाणे दुष्काळ ग्रस्त भागात येत नाहीत. त्यामुळे हि ३ मंडळे जाहीर झाली नाहीत. मात्र या भागात मुख्य असलेले भात पिकाचे पंचनामे केले आहे. त्याप्रमाणे शासनाकडून भात शेतीला नुकसान भरपाई लवकरच मिळणार आहे अशी माहिती आमदार सोनवणे यांनी दिली. 

टॅग्स :droughtदुष्काळJunnarजुन्नरPuneपुणे