शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

जुन्नरमधील सहा मंडलांचा दुष्काळग्रस्त भागात समावेश, आमदार सोनवणे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 00:54 IST

महाराष्ट्र सरकारच्या दुष्काळी पाहणी समितीने दुष्काळापासून वंचित ठेवलेल्या जुन्नर तालुक्याला दिलासा मिळाला असून राज्य शासनाने राज्यातील १५१ तालुके व २६८ मंडळे दुष्काळी म्हणून जाहीर केली आहे.

नारायणगाव - महाराष्ट्र सरकारच्या दुष्काळी पाहणी समितीने दुष्काळापासून वंचित ठेवलेल्या जुन्नर तालुक्याला दिलासा मिळाला असून राज्य शासनाने राज्यातील १५१ तालुके व २६८ मंडळे दुष्काळी म्हणून जाहीर केली आहे. त्यामध्ये जुन्नर तालुक्यातील ६ मंडळे दुष्काळग्रस्त भाग म्हणून घोषित केली आहेत. तर तालुक्यातील आदिवासी भाग असलेल्या पट्यातील मुख्य पीक असलेल्या भात शेतीचे पंचनामे करून त्याचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे. भात शेतीला नुकसान भरपाई लवकरच देण्यात येईल अशी माहिती जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी दिली .राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या पहिल्या टप्यात १५१ तालुक्यांमध्ये जुन्नर तालुक्याचे नाव नसल्याने तालुक्यात तीव्र नाराजी व्यक्त झाली होती. जुन्नर तालुका दुष्काळी घोषित होण्यासाठी आमदार शरद सोनवणे यांनी मंत्रालयात पाठपुरावा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तालुक्यातील पावसाची परिस्थिती व पडलेला दुष्काळ याची सविस्तर माहिती देऊन दुष्काळ ग्रस्त जाहीर करण्याची मागणी केली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांना तालुक्यातील परिस्थितीची माहिती दिली. महाराष्ट्र सरकारची दुष्काळी पाहणी समितीने दुष्काळापासून वंचित राहिलेल्या तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचीव बाबींची शहानिशा करून या समितीने जुन्नर, नारायणगाव, बेल्हे, निमगावसावा, ओतूर व वडगाव या ६ मंडळांमध्ये दुष्काळ केला जाहीर केला आहे.केंद्र सरकारच्या ३ पद्धती मध्ये जे तालुके बसले ते तालुके दुष्काळी म्हणून जाहीर केले. अद्याप ज्या महसुली मंडळांमध्ये ७५० मी. ली. मीटर पेक्षा कमी पाऊस झालेले २६८ मंडल ६ नोव्हेंबर २०१८ ला शासनाने दुष्काळी म्हणून जाहीर केली. जे तालुके दुष्काळी म्हणून जाहीर झाले नाही. त्यांच्या संबधीत माहिती साठी व पुढील प्रकिया पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने समिती तयार करून दुष्काळ संदर्भात तक्रारी असतील किंवा तांत्रिक बाबीमुळे दुष्काळ जाहीर करण्याचे राहिले असेल तर त्या संबधी त्याची शहानिशा करून समिती त्या विभागाला दुष्काळी घोषित करणार होती. समितीकडे परिस्थिती व पावसाची टक्केवारी सविस्तर अहवाल सादर करून यशस्वीरित्या मांडली. समितीने अहवाल आधार घेत दुसºया टप्प्यात जुन्नर तालुक्यातील ६ मंडळे दुष्काळ भाग म्हणून जाहीर केले.९ पैकी तांबे, पाडळी, राजूर या ३ मंडळात ७५० मी. ली. मीटर पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. ही मंडळे धरण क्षेत्रात येत आल्याने ती निकषा प्रमाणे दुष्काळ ग्रस्त भागात येत नाहीत. त्यामुळे हि ३ मंडळे जाहीर झाली नाहीत. मात्र या भागात मुख्य असलेले भात पिकाचे पंचनामे केले आहे. त्याप्रमाणे शासनाकडून भात शेतीला नुकसान भरपाई लवकरच मिळणार आहे अशी माहिती आमदार सोनवणे यांनी दिली. 

टॅग्स :droughtदुष्काळJunnarजुन्नरPuneपुणे