शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

ताई, सर्वच राजकारण्यांना एका चष्म्यातून पाहू नये; राष्ट्रवादीचं अभिनेत्री तेजस्विनी पंडितला प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 20:39 IST

पुणे : ’सगळ्यात मोठी कीड आपल्या देशाला, आपल्याच नाही तर सगळ्या जगाला लागली आहे. ती आहे राजकारण , ही ...

पुणे : ’सगळ्यात मोठी कीड आपल्या देशाला, आपल्याच नाही तर सगळ्या जगाला लागली आहे. ती आहे राजकारण, ही कीड कोविडपेक्षा भयाण, घातक आणि वर्षानुवर्षे आपल्याला पोखरत जाणारी आहे. या किडीपासून बचाव करता आला तर बघा’’, ही अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिची पोस्ट भलतीच व्हायरल झाली असून,चर्चेचा विषय ठरली आहे. परिस्थिती किती बिकट आहे हे सांगताना  ‘ अवघड आहे सगळंच....काळजी घ्या’ असा टोला देखील तिने लगावला आहे. मात्र ही बोचरी टीका राष्ट्रवादीच्या चित्रपट,कला आणि सांस्कृतिक विभागाच्या चांगलीच जिव्हारी लागली असून, या अभिनेत्रीला  ‘सर्वच राजकारण्यांना एका चष्म्यातून पाहू नये ’ असं प्रत्युत्तर विभागाच्या प्रदेशाध्यक्षांनी दिलं आहे.

अभिनेत्री कंगना राणावत ही राजकारण्यांवर विशेषत: सत्ताधारी पक्षावर आगपखड करणारी ट्विट करीत असते. त्यावरून ती सातत्याने ट्रोल देखील होत असते. मात्र आता मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने सोशल मीडियावर केलेली पोस्ट सध्या नेटिझन्ससाठी चर्चेचा विषय ठरली आहे.. अनेकांनी तिला पाठिंबा दिला असून, काही जणांनी ट्रोल देखील केले आहे. परंतु, तिची पोस्ट ही कोणा एका पक्षाला उददेशून नसून सुद्धा राष्ट्रवादी च्या चित्रपट,कला आणि सांस्कृतिक विभागाला काहीशी झोंबली आहे. 

तेजस्विनीच्या फेसबुक पोस्टनंतर राष्ट्रवादी कांग्रेसच्या चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील ’ सर्वच राजकारण्यांना एका पारड्यात ठेवून चांगले काम करणाऱ्या राजकारण्यांना विनाकारण आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण ही बाबच मुळात चुकीची असल्याचं म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री हे रात्रंदिवस एक करून या महामारीत लोकांना वाचवण्यासाठी एकत्र येऊन काम करताना आपण पाहत आहोत. याहीपुढे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या आईचे निधन झाल्यानंतरही त्यांनी दु:खाचा क्षण बाजूला ठेवून महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला आपला परिवार समजून वाचवण्यासाठी कसरत सुरू ठेवली आहे. खरंच त्यांचे कार्य वाखाणण्यासारखे आहे. 

राजकारणावर टीका करण्यापेक्षा एक कलावंत म्हणून आपण लोकांसाठी काय करू शकतो.याचा विचार करून काहीच नाही तर एक व्हिडिओ करून लोकांनी घरात राहा सुरक्षित रहा असे आवाहन करू शकतो. जेणेकरून प्रशासनावर कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त ताण येणार नाही. आणि लवकरच कोरोनाची ही संसर्ग साखळी संपुष्टात येऊन येत्या दोन ते तीन महिन्यात आपण पूर्वीसारखं नॉर्मल आयुष्य जगू शकू. त्यामुळे राजकीय व्यवस्थेवर बोलण्यापेक्षा लोकांना आपण किती मदत करतो यावर भर दिला तर त्यांचे सर्वत्र कौतुक होईल असा टोला देखील त्यांनी तेजस्विनीला लगावला आहे.--------------------------------------------------------------------------------------------

टॅग्स :Puneपुणेcultureसांस्कृतिकcinemaसिनेमाPoliticsराजकारणSocialसामाजिकTejaswini Punditतेजस्विनी पंडित