शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

विधानसभेच्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये होणार संघटनात्मक बदल; पक्षाचा चेहरा तरुण करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 11:19 IST

राज्यात संघटनात्मक पातळीवर फार मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत

पुणे : विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या दारुण पराभवाची काँग्रेसच्या केंद्रीय श्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली आहे. पक्षाचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी याबाबतचा आपला सविस्तर अहवाल श्रेष्ठींना दिला आहे. त्यावर राज्यात संघटनात्मक पातळीवर फार मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत. तरुणांना वाव देण्याबरोबरच नवे, राजकीय पार्श्वभूमी नसलेले चेहरे देण्याबाबत खुद्द राहुल गांधी यांनीच सूचना केली असल्याचे पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. येत्या आठ दिवसांतच याबाबत बैठक होईल, अशी माहिती मिळाली.पक्षाला राज्यात लोकसभेला अनपेक्षित यश मिळाले. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसचा भाव वधारला. मात्र, त्याचा फायदा उचलण्याचे सोडून राज्यातील नेते आम्हीच मोठे भाऊ, आमचाच मुख्यमंत्री होणार, अशी जाहीर वक्तव्ये करू लागले. त्यावरही चेन्नीथला यांनी आपल्या अहवालात संबंधित नेत्यांवर अपरिपक्व असा शिक्का मारला असल्याचे समजते. विधानसभेतील पराभवानंतर चेन्नीथला राज्यात एकदाही आले नाहीत. त्यांनी पक्षाच्या पराभूत उमेदवारांची बैठक घेण्याबाबत प्रदेश शाखेला कळवले. तशी बैठक झालीही, तर त्या बैठकीतच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अनेकांनी शरसंधान साधले व या पराभवाला तेच जबाबदार असल्याची टीका केली.त्यावरून प्रदेश शाखेने विदर्भातील एका पराभूत आमदाराला नोटीस बजावली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना महाराष्ट्रात विजयाची अपेक्षा होती. ती दूरच राहिली; उलट दारुण पराभव झाला. त्यामुळे तेही पक्षाच्या प्रदेश संघटनेवर संतप्त झाले. त्यांनी चेन्नीथला यांना याबाबत विचारणा केली. त्यामुळेच चेन्नीथला यांनी या पराभवाच्या कारणांचा सविस्तर अहवाल त्यांच्याकडे दिला.त्यावरून केंद्रीय स्तरावरच संघटनात्मक बदलांचा निर्णय झाला. पक्षाचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या संमतीनंतर या बदलांची प्रक्रिया सुरू होणार आहे. राहुल यांनी पक्षासाठी नवे चेहरे देताना ते तरुण असतील, पक्षाबरोबर निष्ठावान असतील, फार मोठी राजकीय पार्श्वभूमी असलेले नसतील याची काळजी घेण्याच्या सूचनाही दिल्या असल्याचे सांगण्यात येते.काँग्रेसच्या दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना राज्यस्तरावर तर बदल अपेक्षित आहेच, पण शहर व जिल्हा स्तरावरही हा बदल झिरपावा, असे त्यांचे म्हणणे आहे. मोठी शहरे व जिल्ह्यात, तालुक्यांमध्ये झालेल्या पराभवाची कारणे शोधली गेली तर संघटनेचे अस्तित्वच राहिले नसल्याने हा पराभव झाला असल्याचे लक्षात येईल. त्यामुळेच फक्त प्रदेशातच नाही तर शहरे व जिल्हा, तालुका स्तरावरही खांदेपालट केली जावी, अशी चर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024