शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विधानसभेच्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये होणार संघटनात्मक बदल; पक्षाचा चेहरा तरुण करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 11:19 IST

राज्यात संघटनात्मक पातळीवर फार मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत

पुणे : विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या दारुण पराभवाची काँग्रेसच्या केंद्रीय श्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली आहे. पक्षाचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी याबाबतचा आपला सविस्तर अहवाल श्रेष्ठींना दिला आहे. त्यावर राज्यात संघटनात्मक पातळीवर फार मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत. तरुणांना वाव देण्याबरोबरच नवे, राजकीय पार्श्वभूमी नसलेले चेहरे देण्याबाबत खुद्द राहुल गांधी यांनीच सूचना केली असल्याचे पक्षातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. येत्या आठ दिवसांतच याबाबत बैठक होईल, अशी माहिती मिळाली.पक्षाला राज्यात लोकसभेला अनपेक्षित यश मिळाले. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसचा भाव वधारला. मात्र, त्याचा फायदा उचलण्याचे सोडून राज्यातील नेते आम्हीच मोठे भाऊ, आमचाच मुख्यमंत्री होणार, अशी जाहीर वक्तव्ये करू लागले. त्यावरही चेन्नीथला यांनी आपल्या अहवालात संबंधित नेत्यांवर अपरिपक्व असा शिक्का मारला असल्याचे समजते. विधानसभेतील पराभवानंतर चेन्नीथला राज्यात एकदाही आले नाहीत. त्यांनी पक्षाच्या पराभूत उमेदवारांची बैठक घेण्याबाबत प्रदेश शाखेला कळवले. तशी बैठक झालीही, तर त्या बैठकीतच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अनेकांनी शरसंधान साधले व या पराभवाला तेच जबाबदार असल्याची टीका केली.त्यावरून प्रदेश शाखेने विदर्भातील एका पराभूत आमदाराला नोटीस बजावली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना महाराष्ट्रात विजयाची अपेक्षा होती. ती दूरच राहिली; उलट दारुण पराभव झाला. त्यामुळे तेही पक्षाच्या प्रदेश संघटनेवर संतप्त झाले. त्यांनी चेन्नीथला यांना याबाबत विचारणा केली. त्यामुळेच चेन्नीथला यांनी या पराभवाच्या कारणांचा सविस्तर अहवाल त्यांच्याकडे दिला.त्यावरून केंद्रीय स्तरावरच संघटनात्मक बदलांचा निर्णय झाला. पक्षाचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या संमतीनंतर या बदलांची प्रक्रिया सुरू होणार आहे. राहुल यांनी पक्षासाठी नवे चेहरे देताना ते तरुण असतील, पक्षाबरोबर निष्ठावान असतील, फार मोठी राजकीय पार्श्वभूमी असलेले नसतील याची काळजी घेण्याच्या सूचनाही दिल्या असल्याचे सांगण्यात येते.काँग्रेसच्या दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना राज्यस्तरावर तर बदल अपेक्षित आहेच, पण शहर व जिल्हा स्तरावरही हा बदल झिरपावा, असे त्यांचे म्हणणे आहे. मोठी शहरे व जिल्ह्यात, तालुक्यांमध्ये झालेल्या पराभवाची कारणे शोधली गेली तर संघटनेचे अस्तित्वच राहिले नसल्याने हा पराभव झाला असल्याचे लक्षात येईल. त्यामुळेच फक्त प्रदेशातच नाही तर शहरे व जिल्हा, तालुका स्तरावरही खांदेपालट केली जावी, अशी चर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024