शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीनंतर बारामती शहर, तालुक्याच्या राजकारणात मोठे बदल होण्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 14:00 IST

जिरायती भागातील पाणी समस्या सोडविण्यासाठी त्यांनी काही ठिकाणी शरयु फाउंडेशनच्या वतीने पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू केले आहेत. दर मंगळवारी ते पक्ष कार्यालयात उपस्थित राहत आहेत....

बारामती : पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या फुटीनंतर बारामतीच्या राजकारणाचे चित्र बदलून गेले आहे. विशेषत: लोकसभा निवडणुकीनंतर शहर आणि तालुक्याच्या राजकारणात मोठे बदल होण्याचे संकेत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार लाेकसभा निवडणूूक संपल्यानंतर अवघ्या ८ दिवसातच पुन्हा कार्यरत झाले. युगेंद्र यांनी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष कार्यालयात प्रत्येक आठवड्यात येण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत युगेंद्र पवार यांनी चुलते अजित पवार यांच्या विरोधात जात खासदार सुप्रिया सुळे यांचा सक्रिय सहभाग घेत प्रचार केला. सध्या युगेंद्र पवार हे निवडणुका संपल्यावर नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यावर भर देत आहे. जिरायती भागातील पाणी समस्या सोडविण्यासाठी त्यांनी काही ठिकाणी शरयु फाउंडेशनच्या वतीने पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू केले आहेत. दर मंगळवारी ते पक्ष कार्यालयात उपस्थित राहत आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार यांचा प्रभावी जनसंपर्क वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मानले जाते. राजकारणाबाबत वेळ आल्यावर पाहू, सध्या लोकांचे प्रश्न सोडविण्यावर आपला भर असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे देखील बारामतीच्या राजकारणात गेल्या आठवड्यापासून ‘ॲक्टिव्ह’ झाले आहेत. पक्ष कार्यालयात जय पवार हे नागरिकांना भेटत आहेत. बुधवारी (दि. २९) त्यांनी बारामतीत नागरिक व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी; अडचणी समजून घेत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. तसेच येथील राष्ट्रवादी भवनात नागरिक व कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. नागरिक आणि कार्यकर्त्यांनी सांगितलेल्या अडचणी आणि कामांबाबत जय पवार यांनी चर्चा केली.

आगामी काळात ‘पवार विरुद्ध पवार’ राजकारण रंगणार?

सलग दोन आठवड्यांपासून जय पवार हे बारामतीत येत आहेत. लोकसभा निवडणुकीत देखील संपूर्ण पवार कुटुंब विरोधात प्रचार करीत असताना जय पवार यांनी आई सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. आता निवडणूक संपल्यावर जय पवार पुन्हा ॲक्टिव्ह झाले आहेत. उपमुख्यमंंत्री अजित पवार यांनी देखील लोकसभा निवडणुकीत थांबलेला जनता दरबार पुन्हा सुरू केला आहे. उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर राज्याची जबाबदारी असल्याने बारामतीच्या राजकारणात त्यांचे धाकटे चिरंजीव अधिक लक्ष घालणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे बारामतीत आता आगामी काळात ‘पवार विरुद्ध पवार’ राजकारण रंगताना पहावयास मिळेल.

टॅग्स :baramati-pcबारामतीSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसRohit Pawarरोहित पवार