शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

धक्कादायक ! ५० टक्के आय टी कर्मचाऱ्यांना जडतोय अतिकामाचा आजार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 18:39 IST

काम करताना येत असलेला ताण किंवा नैराश्य याने तर आय टी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी पछाडले आहेतच पण त्यांना अतिकाम किंवा वर्कोहोलिक हा आजार जडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.  

ठळक मुद्देभारतातील ५० टक्के आय टी कर्मचाऱ्यांना अतिकामाचा आजार घरी गेल्यावरही ऑफिसचे काम सोडत नाही पिच्छा, हक्काची रजा मागताना वाटते लाज 

 

पुणे : उत्तम  नोकरी आणि आर्थिक स्थिती असूनही जर समाधान नसेल तर त्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही.  काहीसा असाच अनुभव भारतातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचारी घेत आहेत. काम करताना येत असलेला ताण किंवा नैराश्य याने तर आय टी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी पछाडले आहेतच पण त्यांना अतिकाम किंवा वर्कोहोलिक हा आजार जडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या क्षेत्रात मिळणारे गलेलठ्ठ पगार आणि झगमगीत कार्यालयांच्या पलीकडे जात डोळ्यात अंजन घालणारी अनेक सर्वेक्षणे समोर येत आहेत. 

       पुणे, बंगळुरू, चेन्नई, मुंबई अशा शहरात अनेक आय टी कंपन्या असून त्यात भारतातील लाखो कर्मचारी काम करतात. यातील अपवाद वगळता बहुतेक कंपन्यांचे मुख्य कार्यालय भारताबाहेरचे असून तिथे भारताबाहेरच्या कामाच्या पद्धतीने काम करावे लागते. त्यातच आय टी क्षेत्रात असणाऱ्या प्रचंड स्पर्धेचा तणाव सतत मनावर असतो. त्यामुळे घरीही अनेकजण बेचैन असतात. याचाच परिणाम म्हणून अनेक कर्मचारी सुट्टीच्या दिवशी किंवा रात्री घरी आल्यावरही काम करतात. याची परिणीती  केवळ मानसिक नव्हे तर शारीरिक आजारात होत असल्याचे पाहणीत दिसून आले आहे. भारतात ११०० कर्मचाऱ्यांच्या केलेल्या पाहणीत ५० टक्के कर्मचारी घरी काम करत असल्याचे दिसून आले आहे. इतकेच काय तर त्यांच्या कामाच्या तासांमध्येही वाढ होत आहे. अर्थातच त्यांच्या एकूण जीवनशैलीशी याचा थेट संबंध येत असून अनेकांना आपण अतिकाम करण्याच्या विकाराला बळी पडल्याचे लक्षातही येत नाही. 

   याबाबत आम्ही काही कर्मचाऱ्यांशी बातचीत केली असून त्यांनी त्यांचे अनुभव लोकमतसोबत शेअर केले. पुण्यात हिंजवडीत काम करणारी युगंधरा म्हणाली की, मी अजिबात घरी जाऊन काम करत नाही. ऑफिसचे काम इथेच संपवण्याचा माझा प्रयत्न असतो. मात्र इथे मी शक्यतो इतर फोन किंवा सोशल साईट्स बघणे टाळते असे सांगितले. प्रिया हिने मात्र वेगळे मत व्यक्त केले असून एखाद्या दिवशी काम राहिले तर घरी करणे मला चुकीचे वाटत नसल्याचे सांगितले.गजानन यांनी काम संपत नसेल तर ते आठवड्याभरात पूर्ण करण्याची मुभा असते. अशावेळी घरी नेण्यापेक्षा ऑफिसमध्येच पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे असे सुचवले. शेवटी काम वेळेत पूर्ण करण्याची अट प्रत्येक क्षेत्रात असते आणि ते व्हायलाच हवे असेही ते म्हणाले.

वर्कोहोलिक असण्याची लक्षणे 

१) घरी आल्यावरही सारखी ऑफिसची कामे आठवणे 

२)कशातही मन न लागणे, सुट्टी घेतल्यावरही कामाचे नियोजन आठवणे 

३)ऑफिसमध्ये जेवणासाठीही न उठणे, काम करतानाच जेवणे 

४)महत्वाच्या कामासाठीही सुट्टी घेताना अपराधी भावना वाटणे 

५)कामापुढे घरची मंडळी किंवा जबाबदाऱ्या कमी महत्वाच्या वाटणे 

६)स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून काम करत राहणे

७)मजा करण्यात किंवा आनंद उपभोगण्यात कमीपणा वाटणे 

८)प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याचा ध्यास ठेवणे 

 

वर्कोहोलिक असण्याचे परिणाम 

१)सतत तणावात किंवा चिंतेत असणे 

२)वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होणे, कुटुंबासोबत संबंध बिघडणे 

३)आरोग्य बिघडणे, शरीर स्थूल होणे आणि त्या अनुषंगिक विकार होणे 

४)छातीत दुखणे किंवा श्वासाची लांबी कमी होणे 

 

वर्कोहोलिक स्वभावातून बाहेर येण्यासाठीचे उपाय 

१)सुट्ट्या या तुमच्यासाठीच असतात, त्या नक्की घ्या 

२)दिवसभर काम केल्यावर रात्री घरी काम नेणे टाळा 

३)घरी जाताना रस्त्यात ऑफिसचा विचार करणार नाही असा निश्चय करा 

४)तब्येत बरी नसेल तर काम थांबवून आराम करा 

५)आपण नसलो तर काम थांबणार नाही हे पक्क ध्यानात घेऊन कुटुंबासाठी, जोडीदारासाठी वेळ द्या 

६)वर्षातून कुटुंबासोबत सहली, समारंभ यात आवर्जून सहभागी व्हा 

७)ऑफिसमध्ये काही मानसिक त्रास होत असेल तर जवळचे मित्र किंवा जोडीदारासोबत आवर्जून शेअर करा. 

८)कामसू नाही स्मार्ट कर्मचारी व्हा, आठवड्यातून किमान दोन तास आपल्या छंदाकरीता द्या 

 

 

 

 

 

 

टॅग्स :PuneपुणेITमाहिती तंत्रज्ञानHealthआरोग्यjobनोकरी