शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

धक्कादायक ! ५० टक्के आय टी कर्मचाऱ्यांना जडतोय अतिकामाचा आजार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 18:39 IST

काम करताना येत असलेला ताण किंवा नैराश्य याने तर आय टी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी पछाडले आहेतच पण त्यांना अतिकाम किंवा वर्कोहोलिक हा आजार जडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.  

ठळक मुद्देभारतातील ५० टक्के आय टी कर्मचाऱ्यांना अतिकामाचा आजार घरी गेल्यावरही ऑफिसचे काम सोडत नाही पिच्छा, हक्काची रजा मागताना वाटते लाज 

 

पुणे : उत्तम  नोकरी आणि आर्थिक स्थिती असूनही जर समाधान नसेल तर त्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही.  काहीसा असाच अनुभव भारतातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचारी घेत आहेत. काम करताना येत असलेला ताण किंवा नैराश्य याने तर आय टी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी पछाडले आहेतच पण त्यांना अतिकाम किंवा वर्कोहोलिक हा आजार जडत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या क्षेत्रात मिळणारे गलेलठ्ठ पगार आणि झगमगीत कार्यालयांच्या पलीकडे जात डोळ्यात अंजन घालणारी अनेक सर्वेक्षणे समोर येत आहेत. 

       पुणे, बंगळुरू, चेन्नई, मुंबई अशा शहरात अनेक आय टी कंपन्या असून त्यात भारतातील लाखो कर्मचारी काम करतात. यातील अपवाद वगळता बहुतेक कंपन्यांचे मुख्य कार्यालय भारताबाहेरचे असून तिथे भारताबाहेरच्या कामाच्या पद्धतीने काम करावे लागते. त्यातच आय टी क्षेत्रात असणाऱ्या प्रचंड स्पर्धेचा तणाव सतत मनावर असतो. त्यामुळे घरीही अनेकजण बेचैन असतात. याचाच परिणाम म्हणून अनेक कर्मचारी सुट्टीच्या दिवशी किंवा रात्री घरी आल्यावरही काम करतात. याची परिणीती  केवळ मानसिक नव्हे तर शारीरिक आजारात होत असल्याचे पाहणीत दिसून आले आहे. भारतात ११०० कर्मचाऱ्यांच्या केलेल्या पाहणीत ५० टक्के कर्मचारी घरी काम करत असल्याचे दिसून आले आहे. इतकेच काय तर त्यांच्या कामाच्या तासांमध्येही वाढ होत आहे. अर्थातच त्यांच्या एकूण जीवनशैलीशी याचा थेट संबंध येत असून अनेकांना आपण अतिकाम करण्याच्या विकाराला बळी पडल्याचे लक्षातही येत नाही. 

   याबाबत आम्ही काही कर्मचाऱ्यांशी बातचीत केली असून त्यांनी त्यांचे अनुभव लोकमतसोबत शेअर केले. पुण्यात हिंजवडीत काम करणारी युगंधरा म्हणाली की, मी अजिबात घरी जाऊन काम करत नाही. ऑफिसचे काम इथेच संपवण्याचा माझा प्रयत्न असतो. मात्र इथे मी शक्यतो इतर फोन किंवा सोशल साईट्स बघणे टाळते असे सांगितले. प्रिया हिने मात्र वेगळे मत व्यक्त केले असून एखाद्या दिवशी काम राहिले तर घरी करणे मला चुकीचे वाटत नसल्याचे सांगितले.गजानन यांनी काम संपत नसेल तर ते आठवड्याभरात पूर्ण करण्याची मुभा असते. अशावेळी घरी नेण्यापेक्षा ऑफिसमध्येच पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे असे सुचवले. शेवटी काम वेळेत पूर्ण करण्याची अट प्रत्येक क्षेत्रात असते आणि ते व्हायलाच हवे असेही ते म्हणाले.

वर्कोहोलिक असण्याची लक्षणे 

१) घरी आल्यावरही सारखी ऑफिसची कामे आठवणे 

२)कशातही मन न लागणे, सुट्टी घेतल्यावरही कामाचे नियोजन आठवणे 

३)ऑफिसमध्ये जेवणासाठीही न उठणे, काम करतानाच जेवणे 

४)महत्वाच्या कामासाठीही सुट्टी घेताना अपराधी भावना वाटणे 

५)कामापुढे घरची मंडळी किंवा जबाबदाऱ्या कमी महत्वाच्या वाटणे 

६)स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून काम करत राहणे

७)मजा करण्यात किंवा आनंद उपभोगण्यात कमीपणा वाटणे 

८)प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याचा ध्यास ठेवणे 

 

वर्कोहोलिक असण्याचे परिणाम 

१)सतत तणावात किंवा चिंतेत असणे 

२)वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होणे, कुटुंबासोबत संबंध बिघडणे 

३)आरोग्य बिघडणे, शरीर स्थूल होणे आणि त्या अनुषंगिक विकार होणे 

४)छातीत दुखणे किंवा श्वासाची लांबी कमी होणे 

 

वर्कोहोलिक स्वभावातून बाहेर येण्यासाठीचे उपाय 

१)सुट्ट्या या तुमच्यासाठीच असतात, त्या नक्की घ्या 

२)दिवसभर काम केल्यावर रात्री घरी काम नेणे टाळा 

३)घरी जाताना रस्त्यात ऑफिसचा विचार करणार नाही असा निश्चय करा 

४)तब्येत बरी नसेल तर काम थांबवून आराम करा 

५)आपण नसलो तर काम थांबणार नाही हे पक्क ध्यानात घेऊन कुटुंबासाठी, जोडीदारासाठी वेळ द्या 

६)वर्षातून कुटुंबासोबत सहली, समारंभ यात आवर्जून सहभागी व्हा 

७)ऑफिसमध्ये काही मानसिक त्रास होत असेल तर जवळचे मित्र किंवा जोडीदारासोबत आवर्जून शेअर करा. 

८)कामसू नाही स्मार्ट कर्मचारी व्हा, आठवड्यातून किमान दोन तास आपल्या छंदाकरीता द्या 

 

 

 

 

 

 

टॅग्स :PuneपुणेITमाहिती तंत्रज्ञानHealthआरोग्यjobनोकरी