शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
3
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
5
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
6
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
7
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
8
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
9
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
10
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
11
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
12
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
13
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
14
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
15
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
16
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
17
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
18
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
19
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
20
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
Daily Top 2Weekly Top 5

शिर्सुफळला तणाव

By admin | Updated: February 24, 2015 00:31 IST

शिर्सुफळ येथील सौरऊर्जा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला भूसंपादन करण्यास स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला असताना आज मोठ्या

बारामती : शिर्सुफळ येथील सौरऊर्जा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला भूसंपादन करण्यास स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला असताना आज मोठ्या बंदोबस्तात कामाला सुरुवात केली. त्यामुळे वातावरण तंग झाले. पोलिसांच्या दडपशाहीमुळे पोलीस व ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे वातावरण तंग झाले. शिर्सुफळ (ता. बारामती) च्या गायरान जागेत सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. पहिला टप्पा पूर्ण झाला. दुसऱ्या टप्प्यासाठी उर्वरित जागा देखील संपादित केली जाणार आहे. त्याला ग्रामस्थांचा विरोध आहे. या संदर्भात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ग्रामस्थांच्या निवेदनावर अहवाल सादर करावा, असे आदेश विभागीय आयुक्तांना दिले आहेत, असे असताना आज अचानक कामाला सुरुवात करण्यात आली. त्याला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. ग्रामस्थांचा विरोध मोडून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला. ग्रामस्थांचा विरोध डावलून काम सुरू केल्याने पोलीस आणि ग्रामस्थ यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेची कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी काम बंद पाडले होते. त्यांनंतर ग्रामस्थ व प्रांताधिकारी यांच्या चर्चा झाली. त्यावर तोडगा निघाला नाही. ग्रामस्थांनी आपला विरोध कायम असल्याचे सांगितले.या संदर्भात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन सौरऊर्जा प्रकल्पात होत असलेल्या गैरप्रकारची माहिती दिली. त्यावर मुंडे यांनी विभागीय आयुक्तांना याबाबत अहवाल सादर करावा. तोपर्यंत काम बंद ठेवावे, असे आदेश दिले. त्याची पूर्तता झाली नसताना देखील कामाला सुरूवात करण्यात आली. आज सकाळी काम सुरु करण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद मोरे यांच्यासह बारामती उपविभागातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर येथील पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने गावात दाखल झाले. गावाला पोलिस छावणीचे स्वरुप आले. यावेळी ग्रामस्थही एकत्र येत आमचा विरोध कायम असल्याचे व याबाबत ग्रामविकास मंत्र्यांनी स्थगिती दिल्याचे सांगितले.ग्रामस्थांनी विभागीय आयुक्तांचा अहवाल आल्याशिवाय काम सुरू करू नये, असे प्रांताधिकाऱ्यांना सांगितले. त्यावर ग्रामविकास मंत्र्यांचे आदेश विभागीय आयुक्तांना आहेत. त्यांचा आदेश मला आलेला नाही. त्यामुळे काम थांबवू शकत नाही, असे सांगितले. त्यामुळे काम सुरू करण्यात आले. ग्रामस्थांनी काही काळ रस्ता रोखून धरला. मात्र पोलीस बळाच्या पुढे काही टिकाव लागला नाही. पोलिसांनी बळाचा वापर करून रास्ता रोको मोडून काढला. प्रशासनाच्या या बळजबरीमुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासन लोकशाहीचा गळा घोटत आहे, असा आरोप करण्यात आला. यामुळे आगामी काळात मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे.