शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

शिरूर लोकसभा निवडणूक: जेलवारी ते वंचितचे उमेदवार; पैलवान मंगलदास बांदल कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 16:28 IST

वंचितने आतापर्यंत तीन याद्या जाहीर केल्या असून उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत...

- किरण शिंदे

पुणे : महाविकास आघाडीसोबत सुरू असलेली बोलणी फिसकटली आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची यादी जाहीर करण्यास सुरुवात केली. वंचितने आतापर्यंत तीन याद्या जाहीर केल्या असून उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. वंचितने तिसऱ्या यादीत पुणे लोकसभेसाठी वसंत मोरे तर शिरूर लोकसभेसाठी मंगलदास बांदल यांना मैदानात उतरवलं आहे. तर शिरूर लोकसभेसाठी मैदानात उतरलेले मंगलदास बांदल कोण आहेत? आणि त्यांच्या उमेदवारीनं शिरूरचं राजकीय गणित कसं असणार ते जाणून घेऊया.

पैलवान असलेले मंगलदास बांदल हे कायमच वादात राहिले आहेत. ते जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती राहिलेत. मंगलदास बांदल हे आपल्या हजरजबाबीपणासाठी ओळखले जातात. शिरूर लोकसभा मतदारसंघात त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे. मात्र विविध गुन्हे दाखल झाल्याने ते कायमच वादग्रस्त ठरलेत. जिल्हा बँकेत केलेल्या कथित फसवणूक प्रकरणात ते जवळपास दोन वर्ष तुरुंगात होते. मागच्या वर्षीच त्यांची जामीनावर सुटका झाली आहे. तसेच फसवणूक, खंडणीसह विविध प्रकरणात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.

मंगलदास बांदल हे कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष होते. पुण्यातील एका सराफाला खंडणी मागितला प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केलं होतं. याशिवाय मंगलदास बांदल यांनी 2009 ला भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. अपक्ष उमेदवार म्हणून ते जिल्हा परिषदेवरही निवडून गेले होते. तर 2019 मध्येही त्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. दरम्यान तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर मंगलदास बांदल यांनी राज ठाकरे, अजित पवार, शरद पवार, देवेंद्र फडणवीस यासारख्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत पुन्हा राजकीय बस्तान बसवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहून कुठल्याही पक्षांनी त्यांना स्वीकारले नव्हते.

आता वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीत मंगलदास बांदल यांना शिरूर लोकसभेत उमेदवारी देण्यात आली. बांदलांच्या एन्ट्रीने शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे आणि महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात आता वंचित बहुजन आघाडीची इंट्री झाल्याने शिरूरच्या राजकारणातही चुरस निर्माण झाली आहे. 2019 च्या निवडणुकीत वंचितचा फटका काँग्रेस राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणावर बसला होता. त्यामुळे यावेळीही तीच परिस्थिती राहिली तर ज्या ज्या ठिकाणी वंचितचे उमेदवार आहेत त्या-त्या ठिकाणी महाविकास आघाडीला झळ बसू शकते आणि याचा फायदा महायुतीला होऊ शकतो.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडShirurशिरुरlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळराव