शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
3
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
4
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
5
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
6
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
7
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
8
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
9
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
10
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
11
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
12
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
13
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
14
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
15
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
16
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
17
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
18
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
19
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
20
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण

Khed Accident: तीव्र चढ-उतार, रस्त्याला संरक्षक कठडे नाहीत; खेडच्या भीषण अपघाताला प्रशासन कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 09:53 IST

जिल्हा नियोजन, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे

चाकण : पुणे-नाशिक महामार्गापासून खेड तालुक्याच्या पश्चिमेला १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंडेश्वर डोंगरावरील महादेव मंदिरात श्रावणी सोमवारी झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. या दुर्दैवी घटनेत १० महिलांचामृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. या अपघाताने कुंडेश्वर डोंगराच्या रस्त्याच्या सुरक्षिततेवर आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

श्रावण महिन्याच्या निमित्ताने पाइंटजवळील पापळवाडी येथून ३५ महिला आणि दोन लहान मुले अशी एकूण ३७ जण पिकअप वाहनातून कुंडेश्वर येथील महादेव मंदिरात दर्शनासाठी जात होती. मात्र, घाटाच्या पहिल्याच वळणावर वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन मागे सरकत पाच ते सहा पलट्या खात खोल दरीत कोसळले. या अपघातात १० महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कुंडेश्वर डोंगरावर जाणारा घाट रस्ता अरुंद, कच्चा आणि धोकादायक वळणांनी युक्त आहे. काही ठिकाणी तीव्र चढ-उतार असून, रस्त्याला संरक्षक कठडे किंवा भिंती नाहीत. दोन वाहने समोरासमोर आल्यास चालकांना मोठी कसरत करावी लागते. यासोबतच रस्त्याच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. स्थानिक नागरिकांनी यापूर्वी अनेकदा रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तक्रारी केल्या होत्या, परंतु प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही, अशी माहिती समोर येत आहे.

या अपघाताने प्रशासनाला जाग येण्याची गरज आहे. रस्त्याची दुरुस्ती, संरक्षण कठडे, सुसज्ज पार्किंग व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रणासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे. कुंडेश्वर डोंगराच्या विकासासाठी वन विभाग आणि जिल्हा परिषदेने अनेक उपाययोजना केल्या असल्या, तरी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अधिक प्रयत्नांची गरज आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेनंतर प्रशासनाला जबाबदार धरत कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सोशल मीडियाने वाढवली लोकप्रियता, पण सुरक्षेकडे दुर्लक्ष

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून कुंडेश्वर डोंगर आणि येथील महादेव मंदिराची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे. ‘क’ वर्ग दर्जा प्राप्त या तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळाकडे भाविक आणि पर्यटकांचा ओघ वाढला आहे. श्रावण महिन्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. मात्र, वाढत्या गर्दीच्या तुलनेत रस्त्याच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

प्रशासनावर आरोप, कारवाईची मागणी

या दुर्दैवी घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा नियोजन, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. “वाढत्या पर्यटक आणि भाविकांच्या संख्येकडे प्रशासनाने लक्ष दिले असते, तर ही घटना टाळता आली असती,” असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :PuneपुणेKhedखेडAccidentअपघातDeathमृत्यूWomenमहिलाGovernmentसरकार