शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
2
बिहारनंतर आता संपूर्ण देशात मतदार याद्यांची तपासणी होणार; SIR बाबत आदेश निघाले...
3
Raju Shetti :'५०० एकराची कागदपत्रे त्यांनी द्यावीत, २५ तारखेपर्यंत आरोप सिद्ध करावा'; राजू शेट्टींचे एकनाथ शिंदेंच्या आमदाराला ओपन चॅलेंज
4
मुस्लीम धर्मगुरुंसोबत RSS प्रमुख मोहन भागवतांनी केली चर्चा; ३ तासांच्या बैठकीत काय ठरले?
5
ऑगस्टमध्ये बँका 'इतके' दिवस बंद राहणार! महत्त्वाचे काम असेल तर लगेच करा, अन्यथा अडचण होईल!
6
महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम; लाडकी बहीण योजनेतील पडताळणीला स्थगिती?
7
मनसेशी युती करण्याचा शिंदेसेनेचा आग्रह; राज ठाकरेंच्या टाळीसाठी एवढा आटापिटा कशासाठी? चर्चांना उधाण
8
मोठी दुर्घटना! राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळले, ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू, मदतकार्य सुरू
9
दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपद राहणार ४ महिने रिक्त;  विधानसभेतील पदाचा निर्णयही प्रलंबित
10
झारखंडमधील ACB पथकाने अटक केलेला अमित साळुंखे कोण?; संजय राऊतांचा शिंदे पिता-पुत्रावर खळबळजनक आरोप
11
घटनेच्या उद्देशिकेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द हटवणार का?; केंद्र सरकारने संसदेत दिले उत्तर
12
इलेक्ट्रिक टुव्हीलरनंतर आता थ्री-व्हीलर! 'या' कंपनीने बाजारात उतरवले रिक्षाचे २ मॉडेल्स; किंमत आणि फीचर्स काय?
13
श्रावण शुक्रवार: नैवेद्याला करा 'कोकोनट मलई खीर'; तांदळाच्या खिरीला खोबऱ्याचा ट्विस्ट!
14
अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र सरकारतर्फे अभ्यासक्रम पुरवणार; आशिष शेलारांचे आश्वासन
15
थायलंड-कंबोडिया संघर्ष दुसऱ्या दिवशीही सुरूच; आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू; UN'ने बोलावली आपत्कालीन बैठक
16
NSDL IPO: बहुप्रतीक्षित एनएसडीएल आयपीओचा प्राईज बँड निश्चित; GMP किती, कधीपासून गुंतवणूक करू शकता? जाणून घ्या
17
पहिला श्रावणी शनिवार: अश्वत्थ मारुती व्रताचरण; कसे करावे पूजन? पाहा, व्रतकथा अन् महात्म्य
18
आता नाशिकची वाईन अन् केरळची ताडी थेट ब्रिटनमध्ये मिळणार! यूकेमध्ये विक्रीचा मार्ग मोकळा
19
१८ वर्षाखाली सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतो का?; केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात दिलं उत्तर
20
ना स्टॅाक ना SIP.., रिटर्नसाठी PPF सर्वांचा बॅास; केवळ १ लाखातून बनेल १ कोटींचा फंड

सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन शरद पवार आयुष्यभर चालले; राज ठाकरेंच्या आरोपात तथ्य नाही - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 13:04 IST

समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीला पुढे आणून मोठे करण्याच काम शरद पवार यांनी केलं

पुणे : राज्यातील पुरोगामित्व टिकविण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) हे पूर्ण ताकदीने काम करीत आहेत. त्यामुळे जाती-पातीचे राजकारण दुसरे लोक करीत आहेत. त्या लोकांबाबत बोलाल तर मी समजू शकतो. पण शरद पवार यांनी कधीही जाती-पातीचे राजकारण केले नाही. त्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आरोपात काही तथ्य नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या भेटी व पक्षप्रवेशानिमित्त पाटील पुण्यात आले होते. त्यांच्या उपस्थितीत विविध पक्षातील कार्यकर्ते, कलाकार, लेखक, संगीतकार यांनी पक्षप्रवेश केला. त्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे उपस्थित होते.

राज्यात जातीचं विषही शरद पवार यांनीच कालवलं, अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. त्या आरोपाबाबत विचारले असता जयंत पाटील म्हणाले, सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन शरद पवार आयुष्यभर चालले आहेत. समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीला पुढे आणून मोठे करण्याच काम शरद पवार यांनी केलं आहे. मोठ्या प्रमाणात आमच्या पक्षात लोक प्रवेश करत आहेत. अनेक लोकांना शरद पवारांच्या नेतृत्वात काम करायचे आहे. अजून आम्ही इंदापूरपर्यंत पोहोचलो नाही. आमदार अतुल बेनके यांच्या मनात काय आहे मला माहीत नाही. मदन भोसले यांना मी भेटलो आहे. पण पक्षप्रवेशाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. मी त्यांच्याकडे चहाला गेलो होतो. समरजित घाटगे यांचा ३ सप्टेंबरला पक्षप्रवेश होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

सध्याचे सरकार हे नाकर्तेपणाचे लक्षण असणारे

"राज्य सरकार हे केवळ लाडकी बहीण या एकाच योजनेभोवती फिरत आहे. बाकी राज्यात कुठल्याच योजना, कुठलेच विषय त्यांना दिसत नाहीत. बदलापूरची घटना सामान्य माणसाला चीड आणणारी आहे. यावर कोणी राजकारण करायची गरज नाही. लहान बालक सुरक्षित नाहीत, हे सरकार नाकारत आहे. महिला सुरक्षित नाहीत. इतके नाकर्तेपणाचे लक्षण यापूर्वीच्या कुठल्याही सरकारमध्ये नव्हते. त्यामुळे राज्यातील सरकार अक्षरशः अपयशी ठरलेले आहे. आमचा कोणत्या योजनेला विरोध नाही, असेही जयंत पाटील यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांची राजकीयदृष्ट्या योग्य पद्धतीने पावले चालली असतील. मराठा समाजात आजही दारिद्र्य, अल्पभूधारक असे प्रश्न काय आहेत, असेही त्यांनी सांगितले.

जागावाटपाबाबत काही वाद होणं अपेक्षितच

विधानसभेच्या २८८ जागा आहेत. प्रत्येक ठिकाणी वेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे जागावाटपाबाबत काही वाद होणं अपेक्षितच आहे. त्यामुळे त्याची चर्चा होणं, त्याबद्दल वाद होणार नाही, असं होणार नाही. पण शेवटी आम्हाला एकत्र राहायचं आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण एकमेकांना समजून घेऊन मार्ग काढण्यात येईल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटीलMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षRaj Thackerayराज ठाकरे