शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

लवासा प्रकरणी शरद पवारांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 09:09 IST

हे हिलस्टेशन प्रकल्प उभारण्यावरून मोठा वाद निर्माण झाला...

पुणे : लवासा हिल स्टेशन प्रकल्प बेकायदेशीर असून, पवार कुटुंबीयांनी सत्तेचा गैरवापर केला आहे. स्वत:च्या फायद्यासाठी त्याची उभारणी केली. शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला दिला नाही, असे आरोप असलेली नाशिकमधील वकील नानासाहेब जाधव यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांना दणका दिला आहे. न्यायालयाने शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राज्य सरकार, कृष्णा खोरे विकास महामंडळ, लवासा कॉर्पोरेशन व हिंदुस्थान कन्स्ट्रकशन कंपनी यांना नोटीस पाठविली आहे. सहा आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश नोटिशीमधून देण्यात आले आहेत.

लवासा प्रकल्प खडकवासला धरण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात विकसित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी हिलस्टेशन प्रकल्प उभारण्यावरून मोठा वाद निर्माण झाला. विविध टप्प्यांमध्ये हा प्रकल्प उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यात पहिल्या टप्प्यामध्येच १००० व्हिला आणि ५०० अपार्टमेंट यांचा समावेश होता. मात्र, याचिकाकर्ते ॲड. नानासाहेब जाधव यांनी या प्रकल्पासाठी देण्यात आलेल्या परवानग्या पूर्णपणे बेकायदेशीर होत्या आणि त्या राजकीय प्रभावाच्या माध्यमातून मिळवल्या होत्या. तसेच शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला दिला नाही, असा दावा करीत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात याचिकेमध्ये करण्यात आलेल्या आरोपांचे त्यांच्याकडून खंडन करण्यात आलेले नाही. त्यामुळे ते खरे असल्याचे गृहीत धरायला हवे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले होते.

पवार आणि सुळे यांना या हिल स्टेशन प्रकल्पामध्ये रस होता. त्यामुळे हे आरोप खरे असावेत असे दिसून येते, असे न्यायालयाने म्हटले होते. शिवाय लवासाची कल्पनाही पवारांचीच असल्याचेही कागदपत्रांवरून लक्षात आल्याचे न्यायालयाने नमूद केले होते. याशिवाय उच्च न्यायालयाने याचिकेतील आरोपात तथ्य असल्याचे मान्य केले होते. परंतु याचिका दाखल करण्यास उशीर झाला व लवासामध्ये अनेक लोकांनी आपले पैसे गुंतविले असल्याचे कारण देत हा प्रकल्प रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार देत फेब्रुवारी २०२२ मध्ये ही जनहित याचिका निकाली काढली होती.

या निकालाला ॲड. जाधव यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून, सोमवारी (दि. ८) न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड व ए. एस. बोपन्ना यांच्या खंडपीठाने शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य काही जणांना नोटीस पाठविली असून, सहा आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय