शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

हर्षवर्धन पाटील व राष्ट्रवादी वितुष्टाला शरद पवार जबाबदार; अजित पवारांची नाव न घेता टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 2:51 PM

हर्षवर्धन पाटील व तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या राजकीय वितुष्टाला शरद पवार जबाबदार आहेत, असे भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात अप्रत्यक्षरित्या सांगितले...

इंदापूर (पुणे) : मी महायुतीचा धर्म पाळणार आहे, असे जाहीर करत मागील चार लोकसभा निवडणुकीच्या वेळेस हर्षवर्धन पाटील हे आमच्या वरच्यांकडे जाऊन चर्चा करायचे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील व तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या राजकीय वितुष्टाला शरद पवार जबाबदार आहेत, असे भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात अप्रत्यक्षरित्या सांगितले. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील, अजित पवार, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार, अंकिता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपच्या कार्यकर्त्यांच्या गर्दीत वाघ पॅलेस येथे हा मेळावा झाला.

अजित पवार म्हणाले की, मागील चार लोकसभा निवडणुकांमध्ये आमच्याकडून काम करून घेतले जाते. नंतर मात्र वेगळे घडते असा अंकिता पाटील यांच्यासह बहुतेक कार्यकर्त्यांचा आक्षेप आहे. मी शब्दाचा पक्का आहे. सन २००४ ते २०१९ या कालावधीत झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मी हर्षवर्धन पाटलांशी चर्चा करत नव्हतो. चर्चा कोण करत होते ते त्यांना माहिती आहे. ते आमच्या वरच्यांकडे जायचे. त्यांच्याशी चर्चा करायचे, असे सांगत पवार यांनी शरद पवारांचे नाव न घेता त्यांच्याकडे बोट दाखवले.

देशातील १३५ कोटी जनतेचा कारभार पाहू शकणारा माेदींच्या तोडीचा नेता कोणत्याही राजकीय पक्षात नाही. राहुल गांधींची काय तुलना होऊ शकते?, काय राहुल गांधींची कारकीर्द आहे? असे प्रश्न पवार यांनी उपस्थित केले. गेल्या दहा वर्षांत बारामती लोकसभा मतदारसंघात किती निधी आला, त्याची आपण शहानिशा करावी. महायुतीचा उमेदवार निवडून आला, तर विकासाकरिता केंद्राचा जास्तीचा व राज्याचा पैसा आणायला आम्ही कमी पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, एकत्र येण्याचा योग दीर्घ कालावधीनंतर का आला, याचीही चर्चा करावी लागेल. ही राजकीय लढाई होती. महायुतीत स्वाभिमानी मतदारांचा सन्मान झाला पाहिजे. तुमचा स्वभाव स्पष्ट बोलण्याचा असेल, तसाच आमचा स्वभाव दिलेला शब्द पाळण्याचा आहे. त्यामुळे बारामतीत मताधिक्य जास्त मिळते की, इंदापुरात ते पाहू या, असे सांगत मनामध्ये असलेल्या आकड्यापेक्षा जास्त मताधिक्य देण्याची ग्वाही त्यांनी दिली. अंकिता पाटील-ठाकरे, सुनेत्रा पवार निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांची यावेळी भाषणे झाली. प्रास्ताविक भाजपचे तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी केले.

‘बटण दाबा कचकच’ या विधानाने वादाचा मुद्दा ठरल्यानंतर ते ग्रामीण भागातील भाषण होते, असे सांगत अजित पवार यांनी पुण्यात भाषण झाले असते, तर कसे असते याचीही नक्कल करून दाखवली. निधीबाबत बोलल्याने आचारसंहितेचा भंग होत असल्याची चर्चा होत आहे, तर मग बाकीचे काहीही सांगतात आम्ही तुमच्या खात्यावर दरवर्षी अमूक इतके लाख टाकणार, आम्ही असे करणार, तसे करणार, त्यावेळी आचारसंहितेचा भंग होत नाही का? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारharshvardhan patilहर्षवर्धन पाटील