शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा पुण्यात एन्ट्री; वर्चस्व कोणाचे 'शरद पवार कि अजित पवार' हे स्पष्ट होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 12:35 IST

अजित पवार हे पहिल्यांदाच पुण्यात येत असून सर्व आमदार महत्वाचे पदाधिकारी यांचा अजित पवारांना पाठिंबा

दुर्गेश मोरे

पुणे: राज्यातील राजकारणात सुरू असलेल्या उलथापालथीनंतर अखेर 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाला १३ जुलैचा मुहूर्त सापडला आहे , विशेष म्हणजे अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्या पासून पहिल्यांदा जिल्ह्यात येत आहेत , त्यांच्या बरोबर मुख्यामंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हि असणार आहेत. शरद पवारांच्या या बालेकिल्ल्यात पावर गेम खेळण्यासाठी थेट जिल्ह्यातील १३८५ सरपंचाना कार्यक्रमाचे निमंत्रण धाडण्यात आल्याचे समजते . काहीनां निमंत्रण हि मिळाले आहे , त्यामुळे जिल्ह्यात वर्चस्व कोणाचे शरद पवार कि अजित पवार हे स्पष्ट होणार आहे .

शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार हे आपल्या ४० आमदारांसह सामील झाल्यामुळे संपूर्ण राजकीय समीकरणे बदलून गेली , शासन आपल्या दारी हा महत्वपूर्ण कार्यक्रम या राजकीय उलथापालथी मुळे दोन – तीन वेळा पुढे ढकलण्यात आला , विशेष म्हणजे हा कार्यक्रम बारामती लोकसभा मतदार संघातील पुरंदर विधानसभेतील जेजुरी येथे घेण्यात येत आहे . माजी मंत्री विजय शिवतरे तसेच भाजपने या कार्यक्रमाला विशेष महत्व दिले होते , अखेर या कार्यक्रमाला १३ जुलैचा मुहूर्त सापडला आहे .

या कार्यक्रमा संदर्भात काही महत्त्वच्या अधिकाऱ्यांची रविवारी बैठक पार पडली त्यामध्ये कार्यक्रमाच्या नियोजनसंदर्भात चर्चा झाली. 13 तालुक्यातील तहसीलदारणा प्रत्येकी 10 हजार लाभार्थी जमवण्याचे लक्ष्य दिले होते. त्याचाही आढावा घेणायत आला महसूल लतर्फे लाभार्थ्यकच्या वाहतुकीसाठी  600 बसेस सोय करण्यात आली असल्याचे समजते.

 शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच पुणे जिल्हा म्हणजे बालेकिल्ल्यात येत आहेत. अपवाद वगळता सर्व आमदार आणि महत्त्वच्या पदाधिकारी अजित पवार यांच्या पाठीशी आहेत. तर कार्यकर्ते हे शरद पवार यांच्या पाठीशी आहेत. तर कोणाकडे जायचे असा प्रश्न अजूनही अनेकांच्या मनात घर करून आहे. शासन आपल्या दारीं हा प्रशासकीय कार्यक्रम असला तरी नव्या राजकीय घडामोडीनंतर अजित पवार सह भाजप नेते जिल्हायत येणार आहेत त्यामुळे कोण किती पाण्यात आहे हे दाखवण्यासाठी शक्ती प्रदर्शन होणार हे नक्की.

जिल्ह्यात वर्चस्व शरद पवार की अजित पवार यांचे हे दाखवण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. 1385 ग्रामपंचायती पैकी बहुतांश ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यामुळे आता या कार्यक्रमाला गर्दी होण्यासाठी थेट सरपंचाना कार्यक्रमचे निमंत्रणा देण्यात आले आहे . पत्रिकेवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो असल्याचे समजते.

आधी वळसे पाटील आता थेट अजित पवार

 मंचर येथील शरद सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त पुण्यात सहकार परिषद व प्रतिमा चिन्ह अनावरण कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी केले होते , त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि  दिलीप वळसे पाटील हे येणार होते. मात्र हा कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला. त्यानंतर वळसे पाटील यांनी रविवारी मंचर येथे सभा घेत शक्ती प्रदर्शन केले. तो पर्यंतच आता अजित पवार आणि भाजपने बारामती लोकसभा मतदार संघात शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी सुरु केली आहे. याची संपूर्ण जबाबदारी अतिजवळच्या लोकांवर सोपवण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या गर्दीवरूनच जिल्ह्यात कोणाचे वर्चस्व आहे हे समजणार आहे.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षNCPराष्ट्रवादी काँग्रेस