शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

शरद पवारांना १०० आमदार निवडून आणता आले नाहीत- चंद्रशेखर बावनकुळे ​​​​​​​

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 16:45 IST

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची टीका...

बारामती (पुणे) :शरद पवार यांचे ८४ वय झाले तरीदेखील त्यांना विधानसभेचा शंभर आकडा गाठता आला नाही. त्यांना कधीही १०० आमदार निवडून आणता आले नाहीत. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने १०० च्या पुढे आमदार निवडून आणले, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

सोनगाव येथे भाजपच्या पक्षीय कार्यक्रमानिमित्त  शनिवारी (दि. २४) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आले होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी टीका केली. ते पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी जेव्हा २०२४ साली पंतप्रधान पदाची शपथ घेतील तेव्हा भाजपचे बारामतीसह महाराष्ट्रातील ४५ खासदार निवडून आलेले असतील. मी तोंडच्या वाफा फेकत नाही. हे परिवर्तन होणारच आहे. नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी पाटण्यामध्ये १९ पक्ष एकमेकांचे हात धरून एकत्र आले. २०१९ मध्ये देखील असेच १७ पक्ष एकत्र आले होते. आज दोनने संख्या वाढली आहे. जेवढा नरेंद्र मोदी यांना विरोध वाढेल तेवढ्या प्रमाणात जनता कमळाचे बटन दाबण्यासाठी धावत  जाईल, असं बावनकुळे म्हणाले.८५ पैसे बारामती अ‍ॅग्रोला पोहचत होते...

६५ वर्ष काँग्रेसने या देशावर सत्ता चालवले. मात्र या ६५ वषार्ची परिभाषा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी केली आहे. मी जेव्हा एक रुपया पाठवतो तेव्हा १५ पैसे जनतेपर्यंत पोहोचतात. १५ पैसे बारामतीला पोहोचतात तर उरलेले ८५ पैसे गेले कुठे? हे आम्ही नाही तर राजीव गांधीच म्हणत होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी हे ८५  पैसे बारामती अ‍ॅग्रो ला पोहोचतात, असा टोमणा मारला. मात्र मोदींच्या राज्यामध्ये मताच्या रूपामध्ये त्यांनी जे कर्ज घेतले आहे ते व्याजासहित जनतेला विकासाच्या माध्यमातून  परत केले जात आहे. आता जर मोदींनी बारामती मध्ये एक रुपया पाठवला तर एकच रुपया बारामती मध्ये येतो, असेही यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

राहूल गांधी यांच्या आदेशाने कर्नाटकमधील धर्मांतर बंदी कायदा रद्द...

परवाच शरद पवार यांनी एक ट्विट केले आहे. भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे सरकार आल्यामुळे मला आता मुस्लिम व ख्रिश्चनांची चिंता वाटते. यांचे सरकार गेल्यानंतर यांना मुस्लिम ख्रिचनांची आता चिंता वाटते. धनगर आणि ओबीसी समाजाची चिंता वाटते. सरकारमध्ये होते तेव्हा उद्योगपती आणि व्यापाऱ्यांची चिंता होती. औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनगर या जिल्ह्यांची नामांतर करणे चूक होते का? मात्र शरद पवार यांनी मी आयुष्यभर छत्रपती संभाजीनगर म्हणणार नाही, औरंगाबादच म्हणेल. मी अहमदनगर म्हणणार अहिल्यानगर म्हणणार नाही, असं म्हणाले हे तुम्हाला मान्य आहे का? कर्नाटकमध्ये पंजाचे सरकार आले. तत्पूर्वी भाजपचे सरकार असताना धर्मांतर बंदी कायदा आणला होता. मात्र राहुल गांधी यांच्या एका आदेशाने त्या सध्याच्या काँग्रेस सरकारने कर्नाटक मधील हा कायदा रद्द केला, असेही यावेळी चंद्रशेखर बावणकुळे म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarendra Modiनरेंद्र मोदी