शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

चंदन शेवानी खून प्रकरणातील सात जणांवर मोक्कानुसार कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 20:30 IST

पुण्यातील लक्ष्मी राेडवरी शिवकला चप्पल दुकानाचे मालक चंदन कृपालदास यांचे खंडणीसाठी अपहरण करुन त्यांच्या खून करण्यात आला हाेता.

पुणे : व्यापारी चंदन कृपालदास शेवानी यांचे अपहरण करून त्यांना दोन कोटींची खंडणी मागून ती देण्यास नकार दिल्यानंतर त्यांना सातार्‍यातील लोणंद येथे नेऊन गोळ्या झाडून खून करण्यात आला. आता या गुन्ह्यातील सात संशयीत आरोपींवर संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोका) कारवाई करण्यात आली आहे. याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

युनिट 2 चे पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्याकडे गुन्ह्याचा तपास सोपविण्यात आला होता. अपर पोलिस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त गुन्हे बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांच्या नेतृत्वात गुन्ह्याचा शोध घेऊन आफ्रिदी रौफ खान (23, रा. नाना पेठ), सुनील नामदेव गायकवाड (49, रा. शिवनेरीनगर, कोंढवा), अजिंक्य हनुमंत धुमाळ (21, ब्राम्हण आळी, सासवड), किरण सुनिल कदम (21, रा. मालगाव, ता. जि. सातारा), प्रितम रमेश आंबरे (36, रा. पुण्यनगरी को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, बिबवेवाडी), परवेझ हनिफ शेख (42, रा. गंगानगर, अष्टविनायक कॉलनी, हडपसर), अनिल सुरेश सपकाळ (48, रा. वेणु लक्ष्मण अपार्टमेंट, शुक्रवारपेठ) यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे केलेले तपासात त्यांच्याकडून देशी बनावटीची आठ पिस्तुले, 58 जिवंत काडतुसे, पाच मॅगझीन, आठ मोबाईल, गुन्ह्यात वापरलेल्या  दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत. यापूर्वी त्यांच्यावर खून, अपहरण, संगणमताने खंडणीसाठी खून व पिस्तुल बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्यांच्यावर मोका नुसार कारवाई करण्यात आली आहे. 

पुण्यातील लक्ष्मी रोडवरील ‘शिवकला’ या चप्पल दुकानाचे मालक चंदन कृपालदास शेवानी हे 4 जानेवारीच्या रात्री साडे दहाच्या सुमारास दुकान बंद करून मंडईजवळील स्वामी समर्थ मठात गेले होते तेथुन ते आपल्या कारमधून त्यांंचे घरी जात होते. शेवानी हे संगम पार्क, मालधक्का चौक समोरून जात असताना त्यावेळी अज्ञात इसमांंनी दोन कोटीच्या खंडणीसाठी त्यांचे अपहरण केले.  शेवानी यांना त्यांच्या कुटुंबियांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ न शकल्याने त्यांच्या कुटुंबियांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.   पाच जानेवारी  दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पुणे व सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या नीरा गावापासून सुमारे तीन कि.मी. असलेल्या सातारा जिल्ह्यातील पाडेगांंव (ता. खंडाळा) गावच्या हद्दीतील नीरा उजवा कालव्याजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती गावकर्‍यांनी लोणंद पोलिसांना दिली. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी अज्ञात इसमांनी चंदन शेवानी यांचा मृतदेह सातारा जिल्ह्यातील पाडेगांव (ता.खंडाळा) गावातून वाहत असलेल्या नीरा उजव्या कालव्याच्या कडेला निर्जन ठिकाणी टाकून दिला. याबाबत  चंदन शेवानी यांचे बंधू गोविंद कृपालदास शेवानी (वय-57, रा. वानवडी, पुणे-40) फिर्याद दिली होती.  दरम्यान गुन्ह्याचा तपास करताना सात जणांना पोलिसांनी अटक केली. पोलिस निरीक्षक महेद्र जगताप यांनी गुन्ह्याचा तपास केला. गुन्ह्याचा तपास करत असताना सातारा पोलिसांचीही मदत झाली. 

पोलिस उपायुक्त बच्चन सिंग आणि सहायक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजीपवार यांनी दिलेल्या सुचनेनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली.  तपासा दरम्यान परवेझ शेख याने पुणे, सातारा, सांगली परिसरात गुन्हेगारी टोळी निर्माण केल्याचे निष्पन्न झाले. त्या टोळीच्या साह्याने परिसरात दहशत निर्माण करून पुणे, सतारा, सांगली जिल्ह्यात तसेच इतर ठिकाणी आर्थिक फायद्यासाठी गंभीर स्वरूपाचे खुनाचे, जबरी चोरीचे, दरोड्याचे गुन्हे केलेले आहेत. त्याने गुन्हे करताना घातक शस्त्राचा वापर केल्याचेही निष्पन्न झाले आहे. परवेझने सहआरोपींची टोळी बनवून स्वतःचे व टोळी सदस्याच्या आर्थिक फायद्यासाठी तसेच टोळीचे वर्चस्व सिध्द करण्यासाठी गुन्हा केल्याचे दिसून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.  

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसPuneपुणे