शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राज्यात तलाठी पदाच्या परीक्षेत सर्व्हर बिघाड; परीक्षेला सव्वा तास उशीर, विद्यार्थ्यांना फटका

By नितीन चौधरी | Updated: August 21, 2023 20:46 IST

सर्व परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थींना तेवढा वेळ वाढवून दिल्याचे जमाबंदी आयुक्तांचे स्पष्टीकरण

पुणे : राज्यात तलाठी पदाच्या परीक्षेत सर्व्हरमधील तांत्रिक समस्येमुळे सुमारे ११६ केंद्रावरील पहिल्या सत्रातील परीक्षार्थींना मोठा फटका बसला. मात्र, ही परीक्षा घेणाऱ्या टाटा कन्सलटन्सी सर्विसेस कंपनीच्या हार्डवेअरमधील या समस्येमुळे सुमारे सव्वातास उशीर झाला. सर्व परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थींना तेवढा वेळ वाढवून देण्यात आली. त्यानंतर ही परीक्षा सुरळीत झाली, असे स्पष्टीकरण तलाठी परीक्षेचे राज्य समन्वयक व अतिरिक्त जमाबंदी आयुक्त आनंद रायते यांनी दिली.

राज्यात तलाठी पदासाठी १७ ऑगस्टपासून विविध जिल्ह्यांमध्ये परीक्षा सुरू आहे. त्यानुसार सोमवारी (दि. २१) सकाळच्या सत्रात ९ ते ११ या वेळेत ही परीक्षा राज्यभर घेण्याचे नियोजन होते. मात्र, ही परीक्षा घेणाऱ्या टाटा टाटा कन्सलटन्सी सर्विसेस (टीसीएस) कंपनीच्या डेटा सेंटरच्या सर्व्हरमध्ये अचानक तांत्रिक समस्या उद्भवली. परीक्षा ९ वाजता सुरू न झाल्याने परीक्षार्थींनी अनेक केंद्रांवर गोंधळ घातला. ही समस्या मूळ सर्व्हरमध्येच निर्माण झाल्याने परीक्षा उशिराने सुरू होऊ शकते, असे कंपनीने जमाबंदी विभागाला तसे कळविले. त्यानुसार सर्व उमेदवारांना याबाबत सांगण्यात आले. टीसीएस कंपनीच्या वतीने महाराष्ट्रासह देशभरात विविध राज्यांमधील विविध प्रकारच्या परीक्षा घेण्यात येत होत्या. कंपनीने ही तांत्रिक समस्या शोधून काढल्यानंतर सव्वादहाच्या सुमारास परीक्षा सुरू झाली. त्यानंतर सर्व जिल्ह्यांच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून पहिल्या सत्रातील या विद्यार्थ्यांना तशी वेळही वाढवून देण्यात आली. अनेक केंद्रावर सव्वातास ते दोन तास उशीर झाल्यानंतर ही परीक्षा सुरळीत सुरू झाल्याचे रायते यांनी सांगितले.

सोमवारी झालेल्या परीक्षेसाठी १७ हजार ४५६ परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. मात्र प्रत्यक्षात १४ हजार ८३४ जणांनी परीक्षा दिली आहे. आतापर्यंत झालेल्या परीक्षांमध्ये सोमवारच्या परीक्षार्थींची संख्या अधिक आहे. त्यामुळे कोणत्याही परीक्षार्थीचे नुकसान झाले नाही, असा दावा करण्यात आला.

दुपारनंतर सर्व परीक्षा सुरळीत सुरू

तलाठी पदासाठी सोमवारी सकाळी परीक्षा सुरु होण्यास सुमारे सव्वातास उशीर झाला. मात्र, कोणत्याही उमेदवाराचे नुकसान होऊ दिले नाही. परीक्षा पुन्हा उशिरा सुरू झाली असली तरी प्रत्येकाला पुरेसा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे दुपारनंतर सर्व परीक्षा सुरळीत सुरू झाल्या. - आनंद रायते, तलाठी परीक्षा समन्वयक व अतिरिक्त जमाबंदी आयुक्त

विध्यार्थ्यांना परीक्षा देण्याआधी मानसिक त्रास

तलाठी भरतीच्या पाचव्या दिवशी सकाळच्या सत्रातील पेपर चालू होण्याआधी टीसीएस कंपनी चे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे राज्यभरातील विद्यार्थी गोंधळून गेले. परीक्षेतील घाेळ थांबत नाही. यापूर्वी जालन्यातील विद्यार्थ्यांना गडचिरोली, वर्धा सेंटर दिले. अमरावतीचे विद्यार्थ्यांना कोल्हापूर सेंटर आले आहे. एक हजार रुपये परीक्षा शुल्क भरून देखील विध्यार्थ्यांना परीक्षा देण्याआधी मानसिक त्रास सहन करावा लागतो ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. - महेश घरबुडे. कार्याध्यक्ष , स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, पुणे

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणexamपरीक्षाStudentविद्यार्थीMaharashtraमहाराष्ट्र