शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

राज्यात तलाठी पदाच्या परीक्षेत सर्व्हर बिघाड; परीक्षेला सव्वा तास उशीर, विद्यार्थ्यांना फटका

By नितीन चौधरी | Updated: August 21, 2023 20:46 IST

सर्व परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थींना तेवढा वेळ वाढवून दिल्याचे जमाबंदी आयुक्तांचे स्पष्टीकरण

पुणे : राज्यात तलाठी पदाच्या परीक्षेत सर्व्हरमधील तांत्रिक समस्येमुळे सुमारे ११६ केंद्रावरील पहिल्या सत्रातील परीक्षार्थींना मोठा फटका बसला. मात्र, ही परीक्षा घेणाऱ्या टाटा कन्सलटन्सी सर्विसेस कंपनीच्या हार्डवेअरमधील या समस्येमुळे सुमारे सव्वातास उशीर झाला. सर्व परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थींना तेवढा वेळ वाढवून देण्यात आली. त्यानंतर ही परीक्षा सुरळीत झाली, असे स्पष्टीकरण तलाठी परीक्षेचे राज्य समन्वयक व अतिरिक्त जमाबंदी आयुक्त आनंद रायते यांनी दिली.

राज्यात तलाठी पदासाठी १७ ऑगस्टपासून विविध जिल्ह्यांमध्ये परीक्षा सुरू आहे. त्यानुसार सोमवारी (दि. २१) सकाळच्या सत्रात ९ ते ११ या वेळेत ही परीक्षा राज्यभर घेण्याचे नियोजन होते. मात्र, ही परीक्षा घेणाऱ्या टाटा टाटा कन्सलटन्सी सर्विसेस (टीसीएस) कंपनीच्या डेटा सेंटरच्या सर्व्हरमध्ये अचानक तांत्रिक समस्या उद्भवली. परीक्षा ९ वाजता सुरू न झाल्याने परीक्षार्थींनी अनेक केंद्रांवर गोंधळ घातला. ही समस्या मूळ सर्व्हरमध्येच निर्माण झाल्याने परीक्षा उशिराने सुरू होऊ शकते, असे कंपनीने जमाबंदी विभागाला तसे कळविले. त्यानुसार सर्व उमेदवारांना याबाबत सांगण्यात आले. टीसीएस कंपनीच्या वतीने महाराष्ट्रासह देशभरात विविध राज्यांमधील विविध प्रकारच्या परीक्षा घेण्यात येत होत्या. कंपनीने ही तांत्रिक समस्या शोधून काढल्यानंतर सव्वादहाच्या सुमारास परीक्षा सुरू झाली. त्यानंतर सर्व जिल्ह्यांच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून पहिल्या सत्रातील या विद्यार्थ्यांना तशी वेळही वाढवून देण्यात आली. अनेक केंद्रावर सव्वातास ते दोन तास उशीर झाल्यानंतर ही परीक्षा सुरळीत सुरू झाल्याचे रायते यांनी सांगितले.

सोमवारी झालेल्या परीक्षेसाठी १७ हजार ४५६ परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. मात्र प्रत्यक्षात १४ हजार ८३४ जणांनी परीक्षा दिली आहे. आतापर्यंत झालेल्या परीक्षांमध्ये सोमवारच्या परीक्षार्थींची संख्या अधिक आहे. त्यामुळे कोणत्याही परीक्षार्थीचे नुकसान झाले नाही, असा दावा करण्यात आला.

दुपारनंतर सर्व परीक्षा सुरळीत सुरू

तलाठी पदासाठी सोमवारी सकाळी परीक्षा सुरु होण्यास सुमारे सव्वातास उशीर झाला. मात्र, कोणत्याही उमेदवाराचे नुकसान होऊ दिले नाही. परीक्षा पुन्हा उशिरा सुरू झाली असली तरी प्रत्येकाला पुरेसा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे दुपारनंतर सर्व परीक्षा सुरळीत सुरू झाल्या. - आनंद रायते, तलाठी परीक्षा समन्वयक व अतिरिक्त जमाबंदी आयुक्त

विध्यार्थ्यांना परीक्षा देण्याआधी मानसिक त्रास

तलाठी भरतीच्या पाचव्या दिवशी सकाळच्या सत्रातील पेपर चालू होण्याआधी टीसीएस कंपनी चे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे राज्यभरातील विद्यार्थी गोंधळून गेले. परीक्षेतील घाेळ थांबत नाही. यापूर्वी जालन्यातील विद्यार्थ्यांना गडचिरोली, वर्धा सेंटर दिले. अमरावतीचे विद्यार्थ्यांना कोल्हापूर सेंटर आले आहे. एक हजार रुपये परीक्षा शुल्क भरून देखील विध्यार्थ्यांना परीक्षा देण्याआधी मानसिक त्रास सहन करावा लागतो ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. - महेश घरबुडे. कार्याध्यक्ष , स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, पुणे

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणexamपरीक्षाStudentविद्यार्थीMaharashtraमहाराष्ट्र