शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात तलाठी पदाच्या परीक्षेत सर्व्हर बिघाड; परीक्षेला सव्वा तास उशीर, विद्यार्थ्यांना फटका

By नितीन चौधरी | Updated: August 21, 2023 20:46 IST

सर्व परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थींना तेवढा वेळ वाढवून दिल्याचे जमाबंदी आयुक्तांचे स्पष्टीकरण

पुणे : राज्यात तलाठी पदाच्या परीक्षेत सर्व्हरमधील तांत्रिक समस्येमुळे सुमारे ११६ केंद्रावरील पहिल्या सत्रातील परीक्षार्थींना मोठा फटका बसला. मात्र, ही परीक्षा घेणाऱ्या टाटा कन्सलटन्सी सर्विसेस कंपनीच्या हार्डवेअरमधील या समस्येमुळे सुमारे सव्वातास उशीर झाला. सर्व परीक्षा केंद्रावरील परीक्षार्थींना तेवढा वेळ वाढवून देण्यात आली. त्यानंतर ही परीक्षा सुरळीत झाली, असे स्पष्टीकरण तलाठी परीक्षेचे राज्य समन्वयक व अतिरिक्त जमाबंदी आयुक्त आनंद रायते यांनी दिली.

राज्यात तलाठी पदासाठी १७ ऑगस्टपासून विविध जिल्ह्यांमध्ये परीक्षा सुरू आहे. त्यानुसार सोमवारी (दि. २१) सकाळच्या सत्रात ९ ते ११ या वेळेत ही परीक्षा राज्यभर घेण्याचे नियोजन होते. मात्र, ही परीक्षा घेणाऱ्या टाटा टाटा कन्सलटन्सी सर्विसेस (टीसीएस) कंपनीच्या डेटा सेंटरच्या सर्व्हरमध्ये अचानक तांत्रिक समस्या उद्भवली. परीक्षा ९ वाजता सुरू न झाल्याने परीक्षार्थींनी अनेक केंद्रांवर गोंधळ घातला. ही समस्या मूळ सर्व्हरमध्येच निर्माण झाल्याने परीक्षा उशिराने सुरू होऊ शकते, असे कंपनीने जमाबंदी विभागाला तसे कळविले. त्यानुसार सर्व उमेदवारांना याबाबत सांगण्यात आले. टीसीएस कंपनीच्या वतीने महाराष्ट्रासह देशभरात विविध राज्यांमधील विविध प्रकारच्या परीक्षा घेण्यात येत होत्या. कंपनीने ही तांत्रिक समस्या शोधून काढल्यानंतर सव्वादहाच्या सुमारास परीक्षा सुरू झाली. त्यानंतर सर्व जिल्ह्यांच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून पहिल्या सत्रातील या विद्यार्थ्यांना तशी वेळही वाढवून देण्यात आली. अनेक केंद्रावर सव्वातास ते दोन तास उशीर झाल्यानंतर ही परीक्षा सुरळीत सुरू झाल्याचे रायते यांनी सांगितले.

सोमवारी झालेल्या परीक्षेसाठी १७ हजार ४५६ परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. मात्र प्रत्यक्षात १४ हजार ८३४ जणांनी परीक्षा दिली आहे. आतापर्यंत झालेल्या परीक्षांमध्ये सोमवारच्या परीक्षार्थींची संख्या अधिक आहे. त्यामुळे कोणत्याही परीक्षार्थीचे नुकसान झाले नाही, असा दावा करण्यात आला.

दुपारनंतर सर्व परीक्षा सुरळीत सुरू

तलाठी पदासाठी सोमवारी सकाळी परीक्षा सुरु होण्यास सुमारे सव्वातास उशीर झाला. मात्र, कोणत्याही उमेदवाराचे नुकसान होऊ दिले नाही. परीक्षा पुन्हा उशिरा सुरू झाली असली तरी प्रत्येकाला पुरेसा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे दुपारनंतर सर्व परीक्षा सुरळीत सुरू झाल्या. - आनंद रायते, तलाठी परीक्षा समन्वयक व अतिरिक्त जमाबंदी आयुक्त

विध्यार्थ्यांना परीक्षा देण्याआधी मानसिक त्रास

तलाठी भरतीच्या पाचव्या दिवशी सकाळच्या सत्रातील पेपर चालू होण्याआधी टीसीएस कंपनी चे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे राज्यभरातील विद्यार्थी गोंधळून गेले. परीक्षेतील घाेळ थांबत नाही. यापूर्वी जालन्यातील विद्यार्थ्यांना गडचिरोली, वर्धा सेंटर दिले. अमरावतीचे विद्यार्थ्यांना कोल्हापूर सेंटर आले आहे. एक हजार रुपये परीक्षा शुल्क भरून देखील विध्यार्थ्यांना परीक्षा देण्याआधी मानसिक त्रास सहन करावा लागतो ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. - महेश घरबुडे. कार्याध्यक्ष , स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, पुणे

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणexamपरीक्षाStudentविद्यार्थीMaharashtraमहाराष्ट्र