शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंत जड वाहनांसाठी स्वतंत्र लेन; चंद्रकांत पाटील यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 18:42 IST

भविष्यातील अपघात टाळण्यासाठी आणखी प्रभावी उपाययोजना अमंलात आणण्यासाठी सेव्ह लाईफ या स्वयंसेवी संस्थेला काम देण्यात आले

पुणे: “राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने योजलेल्या उपायांमुळे गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत नवले पुलाजवळ यंदा अपघात कमी झाले आहे. मात्र, रविवारी झालेला अपघात भीषण होता. त्यामुळे भविष्यातील अपघात टाळण्यासाठी आणखी प्रभावी उपाययोजना अमंलात आणण्यासाठी सेव्ह लाईफ या स्वयंसेवी संस्थेला काम देण्यात आले आहे. येत्या आठवडाभरात त्यांचा अहवाल येईल. मात्र, त्यापूर्वी कात्रज बोगदा ते नवले पूल या सात किलोमीटरच्या परिसरात जड वाहनांसाठी उजव्या बाजुला स्वतंत्र लेन करण्यात येईल,” अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

नवले पुलाच्या अपघातानंतर पाटील यांनी सर्व संबंधितांची शुक्रवारी बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, “नवले पुलावर रविवारी झालेला अपघात हा नऊ महिन्यांनंतरचा मोठा अपघात आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा अपघातांत मोठी घट झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने योजलेल्या उपाययोजनांमुळे हे प्रमाण घटले आहे. मात्र, यापुढे अपघात होऊ नयेत यासाठी आणखी उपाययोजना योजण्यात येतील. त्यासाठी सेव्ह लाईफ या स्वयंसेवी संस्थेला अभ्यास करण्याचे करण्याचे सांगितले आहे. त्यांचा अहवाल आठवडाभरात येईल. त्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. आजच्या बैठकीत त्यांनी कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतच्या सात किलोमीटरच्या पट्ट्यात जड वाहनांसाठी उजव्या बाजुला स्वतंत्र लेन करावी. कारण काही अंतरानंतर डाव्या बाजुने शहरातील वाहतूक या महामार्गावर येते. त्यामुळे हा उपाय त्यांनी सुचविला आहे. तसेच बोगद्याच्या सुुरवातीला एक चेकपोस्ट तयार करण्याचे ठरले आहे. त्यात २४ तास पोलिसांची उपस्थिती राहील. तेथे चालकांना सुचना देण्यात येतील. या सात किलोमीटरच्या पट्ट्यात विविध भागांतील सुचना फलकही लावण्यात येतील. काही ठिकाणी चालकांना सुचना देण्यासाठी उद्घोषणा बुथ उभारण्यात येणार आहेत. वेगाला अडथळा आणण्यासाठी जास्त उंचीचे रम्बलर स्ट्रीप ठराविक अंतरात टाकण्यात येतील. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी स्कायवॉकही उभारण्यात येतील.”

अपघात कमी होण्याची आशा

नवले पुलावर जास्त उतार असल्याने अपघात होत आहेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तर हा उतार योग्य असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे म्हणणे आहे. या दोघांमध्ये मतभेद आहेत. मात्र, नवले पूल पाडणे हा त्यावरचा उपाय नाही, असे स्पष्ट करत पाटील यांनी सेव्ह लाईफ संस्थेकडून आलेल्या उपायांमुळे अपघात कमी होतील अशी आशा व्यक्त केली.

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गSocialसामाजिकchandrakant patilचंद्रकांत पाटीलAccidentअपघात